शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी बनणार आता स्वच्छतादूत; पहिल्या टप्प्यात ५० शाळांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 00:44 IST

शिक्षण विभागाचा अजब फंडा

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून आता शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतादूत बनवण्याचा घाट घातला जात आहे. प्रत्येक विभागातील शाळांनी आपल्या भागातील १०० मीटर परिसर दत्तक घ्यावा आणि त्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतादूताचे काम करावे, असे शिक्षण विभागाला अपेक्षित आहे. परंतु, विद्यार्थी कोणत्या वेळेत काम करतील, याचा कुठेही उल्लेख शिक्षण विभागाने केलेला नाही. याउलट, ठामपा शाळांबरोबरच खाजगी शाळांनाही या योजनेत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न असून पहिल्या टप्प्यात ५० शाळांचा सहभाग यामध्ये घेतला जाणार आहे. त्यानुसार, या शाळांच्या माध्यमातून स्वच्छतादूताबरोबरच परिसराची देखभाल करणे, कोणतेही मूल शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठीचा सर्व्हे करणे आदी कामे या विद्यार्थ्यांना करावी लागणार आहेत. दीपस्तंभ योजनेच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव येत्या २० जानेवारीच्या महासभेत शिक्षण विभागाच्या वतीने मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.हा प्रस्ताव जुलै २०१८ मध्ये महासभेतही मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला होता. परंतु, तो रद्द करण्यात आला होता. त्यानंतर, आता पुन्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक विभागातील शाळांनी आपल्या आजूबाजूचा १०० मीटरचा परिसर दत्तक घ्यायचा आहे. या योजनेला दीपस्तंभ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी त्यात्या परिसराचा सर्व्हे करणार असून स्वच्छतेचा दूत म्हणून महत्त्वाचे काम करणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. त्या परिसराची देखभाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

एकही मूल शाळाबाह्यराहू नये, यासाठीही प्रयत्न केला जाणार आहे. दिव्यांग मुले महापालिका शाळेतील योजनेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे, परिसरातील एकही मूल माध्यमिक शिक्षणपासून वंचित राहणार नाही, स्वच्छतादूत बनतानाच विद्यार्थ्यांनी त्या परिसरातील नागरिकांना स्वच्छतेविषयी महत्त्व सांगणे, याशिवाय शाळा तंबाखूमुक्त घोषित करताना परिसरही तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, अशा काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत शाळांकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्यासाठी समिती गठित केली जाणणार आहे. त्यानुसार वर्षभरात केलेल्या कामाचा अहवाल शाळांनी सादर करायचा असून त्यातून ५० शाळांचे मूल्यमापन केले जाणार आहे. त्यानंतर, या उपक्रमात अव्वल ठरणाºया शाळेला पहिल्या, दुसºया आणि तिसºया क्रमांकांचे बक्षीस दिले जाणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५० हजारांचे असणार आहे. या योजनेसाठी २५ लाखांची तरतूद केली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.महानगरपालिकेच्या दीपस्तंभ योजनेंतर्गत शालेय मुले कोणत्या सत्रात हे काम करणार, अभ्यास करून त्यांना ही कामे करता येणे शक्य होणार आहे का, या सर्व बाबींचा विचार मात्र या प्रस्तावात कुठेही झालेला दिसला नाही. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शाळेला तशा सूचना आणि परिपत्रक दिले जाणार आहे.शाळांनी राबविलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन आणि कामाच्या देखरेखीसाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीत शिक्षण विभागाचे सभापती, अतिरिक्त आयुक्त (२), शिक्षण विभागाचे उपायुक्त, समाजकल्याण अधिकारी, सहायक आयुक्त आणि गटअधिकारी राहतील.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका