शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भिवंडीतील यंत्रमागांचा बंद होणार ?

By admin | Updated: August 15, 2015 23:13 IST

मार्केटमध्ये उचित भाव न मिळाल्याने शहरातील कापड व्यापाऱ्यांनी यंत्रमागधारकांना व राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून उद्या १६ आॅगस्टपासून जाहीर केलेल्या ‘यंत्रमाग बंद’ची

भिवंडी : मार्केटमध्ये उचित भाव न मिळाल्याने शहरातील कापड व्यापाऱ्यांनी यंत्रमागधारकांना व राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून उद्या १६ आॅगस्टपासून जाहीर केलेल्या ‘यंत्रमाग बंद’ची घोषणा हवेत विरण्याची चिन्हे आहेत. परंतु जे माग बंद राहतील त्यावरील कामगारांची मालकासह सरकारला चिंता नसल्याने ते रस्त्यावर येणार आहेत.राज्यात काही ठिकाणी दुष्काळ पडल्याने व कर्जबाजारी झाल्याने शेतकरी जसे आत्महत्या करीत आहेत. त्याचप्रमाणे येथील यंत्रमाग मालकांच्या मनमानी कारभारामुळे कामगारांवर आत्महत्येची पाळी आली आहे. राज्यात सत्तेवर येणारे सरकार नेहमी ‘यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ’ स्थापन करण्याची घोषणा करते. मात्र, ते स्थापन न झाल्याचा गैरफायदा घेऊन शासनाचे नियंत्रण नसलेला यंत्रमागमालक व कापड व्यापारी मनमानी व्यवहार करून कामगारांचे शोषण करीत आहे. क्रिकेटमधील सट्टाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होते. मात्र, यार्न व कापड मार्केटमध्ये राजरोसपणे सुरू असलेला सट्टाबाजार कोणतेही सरकार बंद करू शकले नाही. याचा फायदा घेऊन शहरातील राजकीय पक्षांचे काही पुढारी चमकोगिरी करून व्यापाऱ्यांना व यंत्रमागमालकांना बंदसाठी चेतवत आहेत. आजतागायत अनेक वेळा ‘यंत्रमाग बंद’ ठेवून हा प्रश्न सुटलेला नाही. मात्र, बंदमुळे शहराच्या जनजीवनावर व छोट्या-मोठ्या व्यवसायांवर विपरीत परिणाम होतो. स्थायिक झालेल्या कामगारांना रोजगार न मिळाल्याने ते कर्जबाजारी होतात. तर, जे स्थायिक नाहीत, त्यांना अवेळी आपल्या गावी जावे लागल्याने त्यांच्या खिशाला चाट बसते. ज्यांना काम नाही, असे हजारो कामगार रस्त्यावर येतात, असा आजवरचा अनुभव आहे.