शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

बजरंगबलीच्या नावाचा निवडणुकीत वापर का?; बागेश्वर महाराजांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 08:20 IST

निवडणुकीत धार्मिक प्रचाराचे महत्त्व वाढले असून, राजकीय व्यक्तींच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत बागेश्वर महाराज यांनी व्यक्त केले.

अंबरनाथ : निवडणुकीत धार्मिक प्रचाराचे महत्त्व वाढले असून, राजकीय व्यक्तींच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत बागेश्वर महाराज यांनी व्यक्त केले. राजकीय प्रश्नांना बगल देत महाराजांनी निवडणुकीमध्ये बजरंगबलीच्या नावाचा वापर करण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांचा तीन दिवसीय हनुमान कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी बागेश्वर महाराज यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. 

...ते दिवस विसरणे कठीणच'; मणिपूरमधील महाराष्ट्राचे विद्यार्थी संध्याकाळी मुंबईत दाखल

कर्नाटकमधील बजरंग दलावर बंदी घालण्याच्या विषयावर विचारले असता बजरंग दल ही एक विचारसरणी असून, त्या विचारसरणीला समाजातील काही घटक विरोध करू शकतील. मात्र तेच घटक बजरंगबलीला प्रत्यक्षात विरोध करणार नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असून, त्याचाच पुढचा टप्पा आता हिंदू राष्ट्र स्थापन होणे गरजेचे आहे. पूर्वी ईश्वराच्या प्रचारासाठी व्यक्तीचा माध्यम म्हणून वापर केला जात होता. हल्ली ईश्वराला माध्यम करून व्यक्तीचा प्रचार करण्याची प्रथा सुरू झाली आहे. ती प्रथा बंद करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सर्व धर्माच्या लोकांना महत्त्व

हिंदू राष्ट्रामध्ये इतर धर्माच्या लोकांना तेवढेच महत्त्वाचे स्थान राहणे हीदेखील गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यास जातीयवादी शक्तींना स्थान राहणार नाही आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होणार नाही. 

हल्ली देवांच्या नावावरच सर्व निवडणुका लढवल्या जातात, मात्र भविष्यात हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्यास देवाच्या नावावर निवडणूक लढवण्याची गरजच भासणार नाही आणि केवळ विकासाच्या नावावर निवडणूक लढवल्या जातील, अशी भूमिका त्यांनी मांडली. देशात हिंदू बहुसंख्य असताना राम मंदिर उभारण्यासाठी ५० वर्षे वाट का पाहावी लागली, आजही कृष्ण जन्मभूमीबाबत निर्णय घेता येत नाही ही शोकांतिका आहे. सनातन हिंदू धर्म वाचवायचा असेल तर शिक्षणासोबत धार्मिक शिक्षणाचीही गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम