शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

निष्काळजीपणा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 19:33 IST

खेळाचे मैदान सुरक्षित न ठेवणाºया ठाणे महापालिकेच्या त्या अधिकाºयांविरोधात आयुक्त कारवाई का करीत नाही असा सवाल मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देनिष्काळजीपणा करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई का नाही? : मनसेख्रिश्चन धर्मीयांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना निंदनीयच : संदीप पाचंगेभूखंड अन्य कोणत्याही कारणासाठी वापरला जावू नये

ठाणे: वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानासाठी असलेल्या आरक्षित भूखंडात काही दिवसांपुर्वी ख्रिश्चन धर्मीयांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना घडली होती. सदर बाब ही निंदनीयच आहे. परंतू तेवढीच चूक ही त्या जागेबाबत निष्काळजीपणा बाळगणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांची देखील आहे. या अधिकाºयांविरोधात महापालिका प्रशासन कोणती कारवाई करणार?असा सवाल मनसेने आपल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.           ठाणे शहरातील वर्तकनगर येथे खेळाचे मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडात ख्रिश्चन धर्र्मियांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण दूषित झाले आहे असा आरोप मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला. या घटनेत संबंधितांविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या जागेचा टी.डी.आर. हिरानंदानी विकासकाला मिळाल्यामुळे खेळाचे मैदान ठा.म.पा. च्या मालकीचे आहे. त्यामुळे सदर जागेची देखभाल करणे, त्या जागेभोवती कुंपण घालून त्याची काळजी घेणे हे पालिकेच्या संबंधित अधिकाºयांचे कर्तव्य आहे. पालिका अधिकाºयांच्या या निष्काळजीपणामुळे आज दफनविधी सारखा भयंकर प्रकार घडला आहे, ज्या अधिकाºयांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे ते देखील दफनविधी करणाºया एवढेच दोषी आहेत असे पाचंगे म्हणाले. तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी ख्रिश्चन धर्मीयांना लेखी पत्राद्वारे ३० हजार चौ. फूट क्षेत्र स्मशानभूमी करीता देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्यास संबंधित अधिकारी वर्ग, श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करणारे लोकप्रतिनिधी अकार्यक्षम ठरले आहेत. सर्व धर्मीयांना अंत्यविधी करिता जागा उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. दोन्ही समाजात संघर्ष होणार नाही याची काळजी पालिका आयुक्तांनी घेऊन कर्तव्यात कसूर करणाºया अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी व खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असलेला भूखंड अन्य कोणत्याही कारणासाठी वापरला जावू नये अशी मागणी मनविसेने पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेMumbaiमुंबई