शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

ओला कचरा प्रक्रियेसाठी का जात नाही?; अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 01:44 IST

केडीएमसीच्या कचरा प्रक्रियेचा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे.

- मुरलीधर भवार कल्याण : केडीएमसीच्या कचरा प्रक्रियेचा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्यासाठी उभारलेल्या तीन प्रकल्पांची क्षमता ४५ टन आहे. मात्र, त्या प्रकल्पांत केवळ सहा टनच ओला कचरा जातो. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी चालत नाही. ओला कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी जात नसल्याने डम्पिंगवरील दुर्गंधीतून नागरिकांची कशी सुटका होणार, असा सवाल शनिवारी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी केला.

स्वच्छतेविषयी व कचरा प्रक्रिया प्रकल्प, आधारवाडी डम्पिंगला लागलेल्या आगीसंदर्भात म्हात्रे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी कचरा प्रक्रियेप्रकरणी म्हात्रे यांनी प्रभाग अधिकाºयांची कानउघाडणी केली. कचऱ्याच्या मुद्यावर महापालिका वादाच्या भोवºयात आहे. केवळ आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाºयांचीच शहर स्वच्छतेची जबाबदारी नाही, तर ती महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांतील १० प्रभाग अधिकाºयांचीही आहे. मात्र, प्रभाग अधिकाºयांकडून शहर स्वच्छतेवर देखरेख ठेवली जात नाही. प्रभाग अधिकारी हा प्रभागाचा प्रथम पालक असतो.

शहर स्वच्छतेवर त्याने देखरेख ठेवली पाहिजे, असे म्हात्रे यावेळी म्हणाले. ओल्या कचºयापासून बायोगॅस तयार करण्याचे १३ ठिकाणी प्रकल्प महापालिका उभारणार आहे. त्यापैकी उंबर्डे व बारावे येथे बायोगॅस प्रकल्प सुरू केले आहेत. उंबर्डेतील प्रकल्प हा १० टन क्षमतेचा तर, बारावे येथे गोदरेज कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारलेला प्रकल्प २५ टन क्षमतेचा आहे. तसेच महापालिकेने उभारलेला तिसरा प्रकल्प १० टन क्षमतेचा असून, तो कार्यान्वित केला आहे. मात्र, उंबर्डे प्रकल्पात केवळ दोन टन ओला कचरा व बारावे येथील २५ व १० टन क्षमतेच्या प्रकल्पात केवळ चार टन ओला कचरा प्रक्रियेसाठी जातो. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी चालत नाहीत.

तिन्ही प्रकल्पांत दिवसाला एकूण ४५ टन ओला कचरा गेला पाहिजे. तसे झाल्यास डम्पिंगवर ओला कचरा जाणार नाही. या कचºयामुळे दुर्गंधी पसरते, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. ओला कचरा प्रकल्पांना उपलब्ध झाला पाहिजे, असे आदेश म्हात्रे यांनी प्रभाग अधिकाºयांसह घनकचरा विभागाला दिले आहे. महापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०४ कोटींचे कंत्राट आर अ‍ॅण्ड डी या खाजगी कंत्राट कंपनीला दिले आहे. कंत्राटदाराने कचºयाचे वर्गीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, कंत्राटदार प्लास्टिक कचरा व विटा, माती, डेब्रिजही उचलून डम्पिंगवर आणून टाकतो. त्यावर प्रभाग अधिकारी व घनकचरा विभागाचे लक्ष नाही. चार प्रभाग क्षेत्रांत कचरा उचलण्याचे खाजगीकरण केल्यावर तेथील महापालिका कामगारांना अन्य प्रभागांत काम देणे अपेक्षित होते, असा मुद्दाही म्हात्रे यांनी उपस्थित केला.

पहिल्या १०मध्ये येण्यासाठी काम करा : म्हात्रे

स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या वेळी चार हजार शहरांच्या स्पर्धेतून केडीएमसीचा ९७ वा क्रमांक आला होता. त्यानंतर दुसºया वेळी पाच हजार शहरांच्या सर्वेक्षणातून महापालिकेचा ७७ वा क्रमांक आला आहे. हा क्रमांक पहिल्या १०मध्ये येण्यासाठी अधिकाºयांनी काम केले पाहिजे, असेही म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र