शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ओला कचरा प्रक्रियेसाठी का जात नाही?; अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 01:44 IST

केडीएमसीच्या कचरा प्रक्रियेचा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे.

- मुरलीधर भवार कल्याण : केडीएमसीच्या कचरा प्रक्रियेचा विषय नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्यासाठी उभारलेल्या तीन प्रकल्पांची क्षमता ४५ टन आहे. मात्र, त्या प्रकल्पांत केवळ सहा टनच ओला कचरा जातो. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी चालत नाही. ओला कचरा प्रकल्पात प्रक्रियेसाठी जात नसल्याने डम्पिंगवरील दुर्गंधीतून नागरिकांची कशी सुटका होणार, असा सवाल शनिवारी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी केला.

स्वच्छतेविषयी व कचरा प्रक्रिया प्रकल्प, आधारवाडी डम्पिंगला लागलेल्या आगीसंदर्भात म्हात्रे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी कचरा प्रक्रियेप्रकरणी म्हात्रे यांनी प्रभाग अधिकाºयांची कानउघाडणी केली. कचऱ्याच्या मुद्यावर महापालिका वादाच्या भोवºयात आहे. केवळ आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाºयांचीच शहर स्वच्छतेची जबाबदारी नाही, तर ती महापालिकेच्या १० प्रभाग क्षेत्रांतील १० प्रभाग अधिकाºयांचीही आहे. मात्र, प्रभाग अधिकाºयांकडून शहर स्वच्छतेवर देखरेख ठेवली जात नाही. प्रभाग अधिकारी हा प्रभागाचा प्रथम पालक असतो.

शहर स्वच्छतेवर त्याने देखरेख ठेवली पाहिजे, असे म्हात्रे यावेळी म्हणाले. ओल्या कचºयापासून बायोगॅस तयार करण्याचे १३ ठिकाणी प्रकल्प महापालिका उभारणार आहे. त्यापैकी उंबर्डे व बारावे येथे बायोगॅस प्रकल्प सुरू केले आहेत. उंबर्डेतील प्रकल्प हा १० टन क्षमतेचा तर, बारावे येथे गोदरेज कंपनीच्या सीएसआर फंडातून उभारलेला प्रकल्प २५ टन क्षमतेचा आहे. तसेच महापालिकेने उभारलेला तिसरा प्रकल्प १० टन क्षमतेचा असून, तो कार्यान्वित केला आहे. मात्र, उंबर्डे प्रकल्पात केवळ दोन टन ओला कचरा व बारावे येथील २५ व १० टन क्षमतेच्या प्रकल्पात केवळ चार टन ओला कचरा प्रक्रियेसाठी जातो. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी चालत नाहीत.

तिन्ही प्रकल्पांत दिवसाला एकूण ४५ टन ओला कचरा गेला पाहिजे. तसे झाल्यास डम्पिंगवर ओला कचरा जाणार नाही. या कचºयामुळे दुर्गंधी पसरते, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. ओला कचरा प्रकल्पांना उपलब्ध झाला पाहिजे, असे आदेश म्हात्रे यांनी प्रभाग अधिकाºयांसह घनकचरा विभागाला दिले आहे. महापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०४ कोटींचे कंत्राट आर अ‍ॅण्ड डी या खाजगी कंत्राट कंपनीला दिले आहे. कंत्राटदाराने कचºयाचे वर्गीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र, कंत्राटदार प्लास्टिक कचरा व विटा, माती, डेब्रिजही उचलून डम्पिंगवर आणून टाकतो. त्यावर प्रभाग अधिकारी व घनकचरा विभागाचे लक्ष नाही. चार प्रभाग क्षेत्रांत कचरा उचलण्याचे खाजगीकरण केल्यावर तेथील महापालिका कामगारांना अन्य प्रभागांत काम देणे अपेक्षित होते, असा मुद्दाही म्हात्रे यांनी उपस्थित केला.

पहिल्या १०मध्ये येण्यासाठी काम करा : म्हात्रे

स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या वेळी चार हजार शहरांच्या स्पर्धेतून केडीएमसीचा ९७ वा क्रमांक आला होता. त्यानंतर दुसºया वेळी पाच हजार शहरांच्या सर्वेक्षणातून महापालिकेचा ७७ वा क्रमांक आला आहे. हा क्रमांक पहिल्या १०मध्ये येण्यासाठी अधिकाºयांनी काम केले पाहिजे, असेही म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र