शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

कल्याण-डोंबिवलीचा कचरा कल्याण पश्चिमेतच का? नगरसेवक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 01:09 IST

शहराच्या अन्य ठिकाणचा कचरा कल्याण पश्चिमेत नका आणू नका. कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण व डोंबिवलीतही प्रकल्प राबवा. अन्यथा कल्याण पश्चिमेतील प्रकल्प बंद पाडू

कल्याण : केडीएमसीने पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग बंद केलेले नाही. तेथील कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच उंबर्डे, बारावे, मांडा हे नवीन प्रकल्पही पश्चिमेत राबविले जात आहेत. शहराच्या अन्य ठिकाणचा कचरा कल्याण पश्चिमेत नका आणू नका. कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण व डोंबिवलीतही प्रकल्प राबवा. अन्यथा कल्याण पश्चिमेतील प्रकल्प बंद पाडू, असा संतप्त इशारा कल्याण पश्चिमेतील नगरसेवकांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे कल्याण पश्चिम विरुद्ध अन्य परिसर, असे चित्र सोमवारी महासभेत निर्माण झाले. यावेळी कल्याण पश्चिमेतील नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा प्रयत्न केला असता चर्चेतून प्रश्न सोडवा सभात्यागाने काही होणार नाही, असे आवाहन अन्य सदस्यांनी केल्याने याविषयावर चर्चा झाली.पश्चिमेतील शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांनी पाइंट आॅफ आॅर्डरचा मुद्दा मांडत उंबर्डे येथे राबवला जाणारा प्रकल्प हा सरकारी नियमावलीस व न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून नाही. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच त्याचा प्रचंड त्रास उंबर्डेतील नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा प्रकल्प बंद करा. तसेच केवळ पश्चिमेत प्रकल्प राबवू नका. अन्य ठिकाणच्या कचरा प्रकल्पांंचे काय झाले, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. ही सभा तहकूब करून तातडीने सगळ्यांनी प्रकल्पाच्या पाहणीसाठी चला. तेथे प्रकल्प किती त्रासदायक आहे की नाही, हे सदस्यांनी ठरवावे. पाहणीअंतीच हे ठरविणे शक्य होईल, याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर महापौर विनीता राणे यांनी पॉइंट आॅफ आॅर्डरवर सभा तहकूब केली जाऊ शकत नाही. चर्चा करता येते, असे सांगितले.सभागृह नेते श्रेयस समेळ म्हणाले, प्रकल्प नियमानुसार नसेल तर त्याचा त्रास नागरिकांनी का सहन करायचा. आधारवाडी डम्पिंग बंद न केल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात उंबर्डे प्रकल्पाची भर पडणार असेल तर भोईर यांची मागणी रास्त आहे. कचरा प्रकल्प कल्याण पूर्व, डोंबिवली आणि २७ गावातही राबविला जावा. अन्यथा तेथून येणा-या कचरा गाड्या पत्रीपुलावर रोखल्या जातील, असा इशारा त्यांनी दिला.उपमहापौर उपेक्षा भोईर म्हणाल्या की, विश्वनाथ राणे हे ज्येष्ठ सदस्य आहेत. मात्र, महापौर विनिता राणे या नव्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या त्रासाची जाण त्यांना अधिक नाही. उंबर्डेला इतका त्रास असेल तर मांड्याला प्रकल्प नकोच, अशी मागणी त्यांनी केली. तर, शिवसेना नगरसेविका शालीनी वायले म्हणाल्या, आधारवाडीच्या डम्पिंगच्या त्रासाने नागरिकांना कॅन्सर व क्षयरोगाचे आजार झाले आहेत. प्रशासन ठोस कारवाई कधी करणार आहे, याचे उत्तर द्यावे. डोंबिवलीतील कचºयाचा त्रास कल्याण पश्चिमेतील नागरिकांनीच का सहन करावा? त्यावर कल्याण पश्चिमेतील सदस्यांचा मुद्दा रास्त आहे, असे शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सांगितले. शिवसेना नगरसेवक मोहन उगले म्हणाले, कल्याण पश्चिमेतील नागरिकांनीच का हा त्रास सहन करावा, याकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. मात्र प्रशासनाकडून गांभीर्याने त्याची दखल घेतली जात नाही.दरम्यान, यावर प्रशासनाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने सदस्यांनी सभात्याग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शिवसेना नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी सभात्याग करून प्रश्न सुटणार नाही, असे सांगितले. त्यामुळे सदस्य पुन्हा सभागृहात आले. देवळेकर म्हणाले की, प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासन कमी पडते. आयुक्तांचा त्यांच्यावर वचक नाही. त्याचबरोबर १०७ कोटी रुपये खर्चाचे कचरा गोळा करण्याचे कंत्राट चार प्रभाग क्षेत्रात आर अ‍ॅण्ड डी कंपनीला दिले आहे. या कंपनीकडे पुरेशा गाड्या व मनुष्यबळ नाही. मग महापालिका त्यांना कोणत्या कामाचा मोबदला देत आहे? त्यांचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी केली. ओल्या कचºयाची विल्हेवाट लावली जात नसल्याने दुर्गंधीचा त्रासामुळे नागरिकांच्या रोषाला सदस्यांना समोरे जावे लागते, याकडे देवळेकर यांनी लक्ष वेधले.महापालिका आयुक्त गोविंद बोडके म्हणाले, प्रकल्प रद्द करता येणार नाही. त्यासाठी सरकारकडून पर्यावरण ना-हरकत दाखले मिळविले आहेत. त्यातील काही त्रुटी असतील त्यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल. उंबर्डे व बारावे प्रकल्प सुरू केल्यावर आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद होईल. उंबर्डे प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, तेथील त्रुटी दूर केल्या जातील. त्याचबरोबर १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात येत आहे. त्यापैकी पाच ठिकाणचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर, तीन ठिकाणी प्रक्रिया सुरू आहेत. या शिवाय सीएसआर फंडातून बारावे येथे प्रकल्प सुरू केला आहे. महापालिकेतील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यकडे बैठक होणार होती. मात्र, ती काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. या बैठकीच्या विषयांत कचºयाचा विषय समाविष्ट आहे. त्यावर तोडगा काढला जाईल. तसेच सदस्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तत्पूर्वी महापौरांसह सदस्यांना घेऊन चर्चा केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी सभेला दिले.आमदारांच्या पत्नीचाही सभात्यागाचा प्रयत्नकल्याण पश्चिमेत कचरा नको, याविषयावर आग्रही भूमिका मांडणारे नगरसेवक भोईर हे कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचे बंधू आहेत. त्याचबरोबर आमदार भोईर यांच्या पत्नी या देखील शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. यावेळी त्यांनीही सभात्याग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे कच-यावरून कल्याण पश्चिम विरुद्ध कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण २७ गावे आणि डोंबिवली पूर्व पश्चिम, असे चित्र तयार झाले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण