शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

उपचारांत चालढकल का?; कोरोना रुग्णांसंदर्भात भाजप, मनसेने विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:57 IST

रुग्णांना योग्य त्या सोयीसुविधा पुरवण्याची मागणी करतानाच विविध सूचना केला.

कल्याण : कोरोना रुग्णांच्या उपचारात केडीएमसीकडून चालढकलपणा केला जात असल्याने भाजप व मनसेच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत जाब विचारला. यावेळी त्यांनी रुग्णांना योग्य त्या सोयीसुविधा पुरवण्याची मागणी करतानाच विविध सूचना केला. त्यावर आयुक्तांनी त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या तातडीच्या बैठकीस भाजप खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण व गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, मनसेचे आमदार राजू पाटील, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, भाजप नगरसेवक राहुल दामले, मनसेचे पदाधिकारी राजेश कदम, कौस्तुभ देसाई आदी उपस्थित होते.

डोंबिवलीतील रुग्णाला रुग्णालयापर्यंत चालत येण्याचा सल्ला दिला गेला. त्यानंतर कल्याण पूर्वेतील संशयिताला चौथ्या मजल्यावर सरपटत खाली यावे लागले. तसेच डोंबिवलीतील कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलेला रुग्णवाहिकेसाठी सहा तास वाट पाहावी लागली होती.रुग्णवाहिकांची योग्य व्यवस्था होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यावर काय उपाययोजना केली आहे, असा सवाल आ. पाटील यांनी केला. त्यावर आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सध्या ३३ रुग्णवाहिका आहेत. रुग्ण संख्या जास्त असल्याने त्या व्यस्त असताना रुग्णाचा फोन आला असेल. त्यामुळे गैरसोय झाली असावी. पण आता आरटीओच्या मदतीने १०० रुग्णवाहिका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांची परवड होणार नाही, असे स्पष्ट केले.

‘रुग्णांची परवड होऊ देऊ नका’

आ. गायकवाड म्हणाले, ‘रुग्णांना परवडणारे उपचार हवेत. त्यांना लाखो रुपयांचे बिल पाठविले जाऊ नये. महापालिकेने अधिग्रहित केलेल्या खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची परवड होता कामा नये. योग्य उपाययोजना केल्या गेल्यास रुग्णांना दिलासा मिळू शकतो.’च्केडीएमसी हद्दीत राहणारे, परंतु मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था का मुंबईत केली जात नाही, असा सवालही आ. पाटील यांनी केला. त्यावर आयुक्तांनी दीड हजार जणांची यादी तयार केली असून, त्यांची तेथे राहण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले.

च्कोरोना रुग्णांवर उपचार केल्यासंदर्भात महापालिका माहिती देते. मात्र, त्यातील वस्तुस्थिती वेगळीच दिसते. याबाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी येत आहेत, याकडे खा. पाटील यांनी विचारणा केली.

च्आ. चव्हाण म्हणाले, रुग्णांची कोरोना चाचणी व उपचार मोफत झाले पाहिजेत. केशरी व पिवळ्या रंगांच्या रेशनकार्डधारकांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ दिला पाहिजे. खाजगी रुग्णालयात तो दिला जात नसेल, तर ही बाब गंभीर आहे. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाºया गोळ्यांचे वाटप केले पाहिजे. आरोग्य सेवा पुरविण्यासाठी निधीची कमतरता असल्यास सदस्य त्यांचा निधी देण्यास तयार आहेत.’

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाRaju Patilराजू पाटील