शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

भिवंडीत डाइंग सायजिंगना आशीर्वाद कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:16 IST

शहरात असलेल्या डाईंग कंपन्यांमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलरमध्ये केमिकल अ‍ॅसिड असलेल्या पाण्याचा वापर केला जातो.

- नितीन पंडित, भिवंडीशहरात असलेल्या डाईंग कंपन्यांमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलरमध्ये केमिकल अ‍ॅसिड असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. डाइंग कंपन्यांमध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साइड हा वायू चिमण्यांद्वारे (धुरांडी) हवेत सोडला जातो. सरकारी नियमानुसार या चिमण्यांची उंची ९० ते १२० फूट असणे आवश्यक आहे; मात्र येथील चिमण्यांची उंची फक्त ७० ते ८० फूट असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर कंपन्यांमध्ये असलेल्या बॉयलरमध्ये कोळसा टाकणे आवश्यक असताना काही डाइंग कंपन्या आर्थिक बचतीसाठी कोळशाऐवजी लाकूड वापरतात. लाकूड नीट जळत नसल्याने धुरातून काळे तंतू तयार होतात. हे तंतूमुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. डाइंग कंपन्यांमध्ये कापडावर रंगाची प्रक्रिया करण्यासाठी रासायनिक अ‍ॅसिडचा वापर केला जातो. प्रक्रियेनंतर हे अ‍ॅसिडयुक्त गरम पाणी थेट गटार-नाल्यांमध्ये सोडले जाते. तसेच, बॉयलरचे तापमान तपासणीसाठी तज्ज्ञ बॉयलर आॅपरेटरची आवश्यकता असते. काही ठिकाणी तज्ज्ञ आॅपरेटर नसतात. हे कामही कामगार किंवा बिगारी करतात. यामुळे बॉयलरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना घडून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. आगीच्याही घटना घडल्या आहेत.नदी-खाडीकिनारी असलेल्या डाइंग कंपन्यांचे पाणी थेट खाडी किंवा नदीत सोडले जात असल्यामुळे त्याचा त्रास किनाऱ्यावरील गावातील ग्रामस्थांना होत आहे. प्रदूषण करणाºया डाइंग कारखान्यांवर शहर परिसरात भिवंडी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतींनी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, आर्थिक हितसंबंधांमुळे ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत. डाइंग कंपन्यांमधून केमिकलमिश्रित धूर वातावरणात सोडल्याने मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण आणि केमिकलमिश्रित प्रदूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने जलप्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. ज्याचा थेट दुष्परिणाम स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच येथील अनेक डाइंग कंपन्या अनधिकृत थाटल्या असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नेते पुढारी तसेच शासकीय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना हाताशी धरून ‘ना हरकत’ दाखल्यावर अनेक डाइंग कंपन्या उभारल्या आहेत.त्यातच डाइंगमालक व शासकीय अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधाने या बेकायदा डाइंग कंपन्यांवर आतापर्यंत कोणतीही कारवाई होत नसल्याची बाबही समोर येत आहे. त्यामुळे प्रदूषण करणाºया या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांचे अधिकारी आणि कंपनीमालकांचे हितसंबंध कारवाईच्या आड येत असावेत, अशी चर्चा सुरू आहे.भिवंडी-पारोळ रोडवरील खेमिसती प्रोसेस या डाइंग कंपनीसमोर शालेय विद्यार्थी अंकित गुप्ता (१३) शनिवारी अपघाती मृत्यू झाला. डाइंग कंपन्यांसमोर रस्त्यावरच उभ्या राहणाºया वाहनांमुळे ही दुर्घटना घडली. नदीनाका येथील जीवनज्योती हिंदी हायस्कूल आहे. या शाळेत अंकित इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो मित्रांसोबत घरी पायी निघाला होता. खेमिसती डाइंगसमोर पाण्याचे टॅँकर नेहमीच उभे असतात. हे टॅँकर कंपनीला पाणीपुरवठा करतात. भिवंडीतील डाइंग आणि सायजिंगमुळे अगोदरच प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच बेकायदा पार्किंगचा गंभीर प्रश्न या घटनेनंतर समोर आला आहे. त्यामुळे शहरातील डाइंग सायजिंग कंपन्यांना नेमका आशीर्वाद तरी कुणाचा आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.