शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत डाइंग सायजिंगना आशीर्वाद कोणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:16 IST

शहरात असलेल्या डाईंग कंपन्यांमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलरमध्ये केमिकल अ‍ॅसिड असलेल्या पाण्याचा वापर केला जातो.

- नितीन पंडित, भिवंडीशहरात असलेल्या डाईंग कंपन्यांमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यासाठी बॉयलरमध्ये केमिकल अ‍ॅसिड असलेल्या पाण्याचा वापर केला जातो. डाइंग कंपन्यांमध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साइड हा वायू चिमण्यांद्वारे (धुरांडी) हवेत सोडला जातो. सरकारी नियमानुसार या चिमण्यांची उंची ९० ते १२० फूट असणे आवश्यक आहे; मात्र येथील चिमण्यांची उंची फक्त ७० ते ८० फूट असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर कंपन्यांमध्ये असलेल्या बॉयलरमध्ये कोळसा टाकणे आवश्यक असताना काही डाइंग कंपन्या आर्थिक बचतीसाठी कोळशाऐवजी लाकूड वापरतात. लाकूड नीट जळत नसल्याने धुरातून काळे तंतू तयार होतात. हे तंतूमुळे त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. डाइंग कंपन्यांमध्ये कापडावर रंगाची प्रक्रिया करण्यासाठी रासायनिक अ‍ॅसिडचा वापर केला जातो. प्रक्रियेनंतर हे अ‍ॅसिडयुक्त गरम पाणी थेट गटार-नाल्यांमध्ये सोडले जाते. तसेच, बॉयलरचे तापमान तपासणीसाठी तज्ज्ञ बॉयलर आॅपरेटरची आवश्यकता असते. काही ठिकाणी तज्ज्ञ आॅपरेटर नसतात. हे कामही कामगार किंवा बिगारी करतात. यामुळे बॉयलरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना घडून अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. आगीच्याही घटना घडल्या आहेत.नदी-खाडीकिनारी असलेल्या डाइंग कंपन्यांचे पाणी थेट खाडी किंवा नदीत सोडले जात असल्यामुळे त्याचा त्रास किनाऱ्यावरील गावातील ग्रामस्थांना होत आहे. प्रदूषण करणाºया डाइंग कारखान्यांवर शहर परिसरात भिवंडी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतींनी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, आर्थिक हितसंबंधांमुळे ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत. डाइंग कंपन्यांमधून केमिकलमिश्रित धूर वातावरणात सोडल्याने मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण आणि केमिकलमिश्रित प्रदूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने जलप्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. ज्याचा थेट दुष्परिणाम स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच येथील अनेक डाइंग कंपन्या अनधिकृत थाटल्या असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नेते पुढारी तसेच शासकीय तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना हाताशी धरून ‘ना हरकत’ दाखल्यावर अनेक डाइंग कंपन्या उभारल्या आहेत.त्यातच डाइंगमालक व शासकीय अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधाने या बेकायदा डाइंग कंपन्यांवर आतापर्यंत कोणतीही कारवाई होत नसल्याची बाबही समोर येत आहे. त्यामुळे प्रदूषण करणाºया या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांचे अधिकारी आणि कंपनीमालकांचे हितसंबंध कारवाईच्या आड येत असावेत, अशी चर्चा सुरू आहे.भिवंडी-पारोळ रोडवरील खेमिसती प्रोसेस या डाइंग कंपनीसमोर शालेय विद्यार्थी अंकित गुप्ता (१३) शनिवारी अपघाती मृत्यू झाला. डाइंग कंपन्यांसमोर रस्त्यावरच उभ्या राहणाºया वाहनांमुळे ही दुर्घटना घडली. नदीनाका येथील जीवनज्योती हिंदी हायस्कूल आहे. या शाळेत अंकित इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो मित्रांसोबत घरी पायी निघाला होता. खेमिसती डाइंगसमोर पाण्याचे टॅँकर नेहमीच उभे असतात. हे टॅँकर कंपनीला पाणीपुरवठा करतात. भिवंडीतील डाइंग आणि सायजिंगमुळे अगोदरच प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच बेकायदा पार्किंगचा गंभीर प्रश्न या घटनेनंतर समोर आला आहे. त्यामुळे शहरातील डाइंग सायजिंग कंपन्यांना नेमका आशीर्वाद तरी कुणाचा आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.