शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महिनाभर आधीच पाणीपट्टी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:40 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याची मंजुरी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विशेष महासभेत दिली.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने नागरिकांच्या पाणीपट्टीत वाढ करण्याची मंजुरी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विशेष महासभेत दिली. मात्र, वाढीव दरवसुली पालिकेने जानेवारीपासूनच चालवल्याने तब्ब्ल ३६ हजार ४१८ खातेदार नागरिकांना काही कोटींचा भुर्दंड बसला आहे. वाढीव पाण्याची बिले पाहून नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सभापती ध्रुवकिशोर पाटील व भाजपा सदस्यांनी बहुमताने दरवाढीस मंजुरी दिली होती. नागरिकांवर नव्याने आठ टक्के पाणीपुरवठा लाभकर, पाच टक्के मलप्रवाहकर व घरांना एक रु पया चौरस फुटाने, तर वाणिज्य आस्थापनांना जादा दराने घनकचरा शुल्क आकारणीसह पाणीपट्टीत तीन ते दहा रुपयांची वाढ तसेच मालमत्ताकर योग्य भाडेमूल्यदरातही ५० टक्के वाढ करण्याचे बहुमताने मंजूर केले होते.या अवास्तव दरवाढीला शिवसेना, मनसे, काँग्रेसने जोरदार विरोध केला होता. शिवाय, भाजपाच्या काही नगरसेवकांनीही करवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे २० फेब्रुवारीच्या महासभेत सत्ताधारी भाजपाने थोडी माघार घेत पाणीपट्टीत निवासीसाठी तीन रु पये, तर वाणिज्यवापरासाठी १० रु पये अशी प्रतिहजार लीटरसाठी वाढ केली. घनकचरा शुल्क घरासाठी एक रु पया प्रतिचौरस फूट, तर अन्य वाणिज्य संस्थांना वेगवेगळे दर मंजूर केले. शिवाय, नव्याने होणाऱ्या मालमत्तेवरही ५० टक्कयांपर्यंत करवाढ मंजूर केली होती. वास्तविक, दोन वर्षांआधीही सत्ताधाºयांनी पाणीपट्टी सात रुपयांवरून १० रुपये केली होती.पाणीपुरवठा विभागाचे ३६ हजार ४१८ खातेदार आहेत. त्यांना दर चार महिन्यांनी बिले पाठवली जातात. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांचे पाण्याचे आलेले बिल पाहून नागरिकांच्या चेहºयावरचा रंग उडाला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर २०१७ या चार महिन्यांच्या बिलात व जानेवारी ते एप्रिल २०१८ या चार महिन्यांच्या बिलात तब्बल अडीच ते सात हजार रुपये जास्त आले आहेत.मीटर बंद असल्यास सरासरी आकारले जाणारे बिलही अव्वाच्या सव्वा आहे. चालू मीटरच्या रीडिंगप्रमाणे त्यात १० टक्के वाढ करून बंद मीटरचे सरासरी बिल देणे अपेक्षित असताना त्यातही मनमानी वसुली सुरू आहे. भार्इंदर पश्चिमेच्या शमाइल कॉम्प्लेक्सचे पदाधिकारी तसेच भाजपा कार्यकर्ते आदेश अग्रवाल यांनी सांगितले की, आमच्या संकुलासनऊ नळजोडण्या आहेत. डिसेंबरपर्यंतचे बिल ७५ हजार होते. पण, जानेवारी ते एप्रिलचे बिल तब्बल ९७ हजार रुपये आले आहे.सरासरी बिलही मनमानीपणे लावले जात आहे.>सत्ताधारी, प्रशासनाच्या संगनमतातून सर्वसामान्यांची लूटविरोधी पक्षनेते राजू भोईर यांनी मात्र सत्ताधारी भाजपा व प्रशासनाने संगनमतानेच ही लूट चालवली असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांनी तक्र ारी केल्यानंतर आता हे उलट्या बोंबा मारत आहेत. भाजपाचे नेते व नगरसेवकांनीच नागरिकांवर कराचे ओझे लादायचे आणि बळजबरी लूट करायची. वरून आपण नागरिकांसोबत असल्याचा कांगावा करायचा, हे लाजिरवाणे असल्याची टीका केली आहे.व्याजासह पैसे परत करा : माजी महापौर गीता जैन यांनी वाढीव बिले रद्द करून सुधारित बिले द्या व नागरिकांनी भरलेले पैसे व्याजासह परत करा, अशी मागणी केली. रोहिदास पाटील यांनीही अधिकाºयांवर कारवाईची मागणी करत सरासरी बिलाची मनमानी वसुलीही रद्द करा, असे सांगितले.वाढीव दराने वसुलीची कबुली : पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी जानेवारीपासून वाढीव दराने नागरिकांना पाणीपट्टीआकारणी केली असल्याचे मान्य करत पुढील बिलांमध्ये ते कमी करून देऊ, असे सांगितले.सत्ताधारी व पालिका प्रशासनानेच नागरिकांवर करवाढ लादून आणखी त्यांची बेकायदा लूट चालवणे गंभीर आहे. याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक जाब विचारतील. करवाढ रद्द करून नागरिकांच्या लुटीतून वसूल केलेले पैसे त्यांना परत करा, अशी मागणी गटनेते जुबेर इनामदार यांनी केली आहे.