शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विकास योजना डळमळीत निधीचे दायित्व कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 03:15 IST

केडीएमसीतून २७ गावे वगळण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात जाहीर केल्यावर डोंबिवली शहर, ग्रामीण भागात त्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत.

- मुरलीधर भवारमुंबई - केडीएमसीतून २७ गावे वगळण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात जाहीर केल्यावर डोंबिवली शहर, ग्रामीण भागात त्यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले आहेत. मात्र, गावे वगळल्यावर या गावांमध्ये मंजूर केलेल्या विकास योजनांचे पुढे काय होईल, या योजना पूर्ण होतील की रखडतील, त्यासाठी लागणारा निधी कुठून आणणार, तो कोण देणार, गावे वगळल्यावर महापालिका दायित्व घेणार नाही, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.१ जून २०१५ ला महापालिकेत २७ गावे समाविष्ट केल्यावर महापालिकेच्या प्रशासनाने गावांच्या विकासासाठी पाच वर्षांत सात हजार कोटींची आवश्यकता असल्याचे राज्य सरकारला कळवले होते. सरकारकडून हद्दवाढ अनुदानाची मागणी केली होती. मात्र, सरकारने हे अनुदान दिले नाही.सरकारने केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत २७ गावांच्या पाणीपुरवठ्याकरिता १८० कोटींची योजना मंजूर केली. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार ३५ टक्के निधी देणार होते. उर्वरित ६५ टक्के निधी महापालिकेने उभारायचा होता. मात्र, ५० टक्के केंद्र व राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी केली होती. त्याला राज्य सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली होती. योजनेची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढली. तिचाही पेच अद्याप कायम असल्याने निविदेचा प्रश्न सुटला नाही. गावे वगळल्यास महापालिकेच्या हिश्श्याचे ८० कोटी रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेपुढे निधीचा पेच तयार होईल. कल्याण-डोंबिवलीतील शहरी भागातील नागरिकांच्या करातून २७ गावे वेगळी होणार असतील, तर त्यांची तहान का भागवायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य व केंद्र सरकारकडून या योजनेसाठी एक रुपयाही अद्याप महापालिकेकडे आलेला नाही.अमृत योजनेंतर्गत २७ गावांच्या मलनि:सारण प्रकल्पासाठी १५३ कोटी रुपये खर्चाची योजना पहिल्या टप्प्यात मंजूर झाली आहे. त्यासाठी ४६ लाखांचा निधी सरकारकडून आला आहे. मात्र, या योजनेचे काम सुरू झालेले नाही. गावे वगळल्यास मलनि:सारण प्रकल्पासही महापालिका पैसा देणार नाही.कल्याण-मलंग रोडसाठी महापालिकेने ४४ कोटी रुपये खर्च केले आहेत. हा रस्ता २७ गावांतील नांदिवली, द्वारली, भाल, आडिवली, ढोकळी या गावांना फायदेशीर आहे. ४४ कोटी रुपये शहरी भागातील नागरिकांच्या करातून खर्च केले आहेत. ४४ कोटी रुपये सरकारने गावे वगळल्यास महापालिकेस द्यावेत. २७ गावांच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दोन वर्षांपासून १० कोटी रुपये खर्च केले आहेत. यंदाच्या वर्षी २७ गावांतील २१ नगरसेवकांच्या प्रभागात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्चाची कामे करण्यात येणार आहेत. मागच्या वर्षी प्रत्येक नगरसेवकाला ३५ लाख तर, त्याच्या मागच्या वर्षी २० लाखांचा निधी दिला गेला.२७ गावांच्या पाणीपुरवठ्यापोटी एमआयडीसीकडून ९१ कोटींची थकबाकी बिलाची मागणी केली जात होती. सुरुवातीच्या वर्षात महापालिकेने पाच कोटी तातडीने भरले. त्यानंतर दरमहिन्याला एक कोटी रुपये बिल गावांच्या पाणीपुरवठ्याच्या बदल्यात एमआयडीसीला भरले आहे. मात्र, या गावांतून पाणीबिलाची वसुली होत नाही. सोयीसुविधा मिळत नसल्याने २७ गावांतील नागरिकांनी कर न भरण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर त्याचा ताण आला. २७ गावांत ८० हजार बेकायदा बांधकामे आहेत. तसेच घनकचरा दररोज ७० मेट्रीक टन जमा होतो. यामुळे महापालिकेच्या नाचक्कीत भर पडली आहे.ग्रामपंचायतीचे ४९२ कर्मचारी महापालिकेत आले. गावे वगळल्यास पुन्हा त्यांची रवानगी ग्रामपंचायतीकडे होणार आहे. गावे वगळल्यास महापालिकेचे क्षेत्रफळ पुन्हा कमी होणार. तसेच कल्याण तालुक्याची हद्द पूर्ववत होणार आहे. २७ गावांची स्वतंत्र पालिका झाल्यास केडीएमसीला न मिळालेले हद्दवाढ अनुदान नवीन पालिकेस दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.७१ टक्के करदात्यांच्या पैशांतून सुविधा का पुरवायच्या?मुख्यमंत्र्यांनी २७ गावे वगळण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचवेळी जोपर्यंत ही गावे महापालिकेत आहेत, तोपर्यंत मालमत्ताकराची वसुली सक्तीने न करण्याचे निर्देश महापालिकेस दिले जातील, असे सांगितले आहे.त्यामुळे कराची वसुली न केल्यास किंवा कमी दराने केल्यास महापालिकेचे उत्पन्न बुडेल. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील ७१ टक्के करदात्यांच्या पैशांतून २७ गावांना सोयीसुविधा का पुरवायच्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाnewsबातम्या