शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

भिवंडीतील जीवघेण्या रस्त्याला वरदहस्त कुणाचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 00:29 IST

या मार्गावर असलेल्या मराठा पंजाब हॉटेलसमोरील अंजूर चौकात तर रस्त्याची अक्षरश: चाळन झाली असून भलेमोठे खड्डे या चौकात पडले आहेत.

नितीन पंडित, भिवंडीएखाद्या शहराचा विकास हा त्या शहराला जोडणाऱ्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. मात्र, या रस्त्यांची दुरवस्था होऊन जेव्हा नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो, त्यावेळी असे जीवघेणे रस्ते काय कामाचे? असा सवाल नागरिक नेहमीच विचारतात. भिवंडीत अशाच प्रकारचा जीवघेणा रस्ता सध्या निर्माण झाला असून या जीवघेण्या रस्त्याला नेमका वरदहस्त कुणाचा, असा सवाल येथील नागरिकांना पडला आहे. हा जीवघेणा रस्ता म्हणजे भिवंडी-वसई महामार्ग म्हणून ओळखला जाणारा चिंचोटी-अंजूरफाटा-माणकोली रस्ता. सध्या या रस्त्याची परिस्थिती एवढी दयनीय झाली आहे की, या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिक आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करतात. विशेष म्हणजे हा रस्ता बीओटी तत्त्वावर देण्यात आला असून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीकडून दिवसरात्र या रस्त्यावरून टोलवसुली होते. एकीकडे टोलवसुलीची सक्ती तर दुसरीकडे रस्त्याची दुरवस्था अशा दुहेरी कोंडीत येथील प्रवासी व वाहनचालक अडकले आहेत.

यावर नियंत्रण असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या रस्त्याच्या दुरु स्तीकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती व सुधारण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून अनेकवेळा रास्ता रोको आंदोलने केली. मात्र, आंदोलनाच्या प्रत्येकवेळी सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी रस्ता दुरुस्तीची आश्वासने देऊनही आजपर्यंत तो दुरुस्त झालेला नाही. सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यावर होणाºया अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा रस्ता २४ किलोमीटर लांबीचा असून २८ आॅगस्ट २००९ पासून रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात केली. हे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने कंपनीला दोन वर्षे सहा महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु, ही अडीच वर्षांची मुदत पूर्ण होऊनही कंपनीने रस्त्याची आवश्यक असलेली बरीचशी कामे आजपर्यंत अपूर्ण ठेवलेली आहेत. विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुप्रीम कंपनीकडून ही टोलवसुली केली जात आहे. टोलवसुली करता मग सुविधा का देत नाही, असा सवाल विचारला जात आहे.या मार्गावर असलेल्या मराठा पंजाब हॉटेलसमोरील अंजूर चौकात तर रस्त्याची अक्षरश: चाळन झाली असून भलेमोठे खड्डे या चौकात पडले आहेत. विशेष म्हणजे मानकोलीवरून ठाण्याच्या तसेच वसईच्या दिशेने येजा करणाºया वाहनांची गर्दी या चौकात जास्त असते. मात्र, तरीही या चौकात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांकडे सुप्रीम कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांचे लक्ष लागत नाही, हेच येथील नागरिकांचे खरे दुर्दैव आहे. या ठिकाणी नेहमीच प्रचंड वाहतूककोंडी होत असते. ही वाहतूककोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असते. सध्या अंजूरफाटानाका ते रेल्वेब्रिज असे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.

मात्र, या कामामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्याचबरोबर अंजूरफाटा ते खारबाव अशा सुमारे चार किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली असल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या अंजूरफाटानाक्यावर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून नागरिकांसह प्रवाशांच्या या गंभीर बाबीकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक वेळोवेळी करत आहेत. मात्र, नागरिकांच्या या मागणीकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या जीवघेण्या रस्त्यावर तो नादुरु स्त असूनही टोल वसूल करणाºया कंपनीला नेमका वरदहस्त कुणाचा, असा सवाल नागरिक करीत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी