शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हल्ला करण्याची हिंमत येते कुठून?

By अजित मांडके | Updated: January 13, 2025 11:20 IST

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या साहाय्यक आयुक्ताला मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाण्यातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महापालिका हद्दीत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला.

- अजित मांडके प्रतिनिधी

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या साहाय्यक आयुक्ताला मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाण्यातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महापालिका हद्दीत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. फेरीवाल्यांना पोषक वातावरण निर्माण करण्यात तेथील राजकीय पुढारी, फेरीवाले दादा, दुकानदार आणि बऱ्याच अंशी पालिकेतील हप्ता घेणारे कर्मचारी जबाबदार आहेत. किंबहुना या साखळीमुळेच फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मागील कित्येक वर्षांपासून सर्वच महापालिकांचे फेरीवाला धोरण कागदावर आहे. अशा काही घटना घडल्यानंतर ते अंतिम करण्याची ग्वाही महापालिकेकडून दिली जाते. मात्र, पुन्हा हे धोरण लांबणीवर टाकले जाते.

फेरीवाल्यांची समस्या ही आजची नाही, मागील कित्येक वर्षांपासून ठाणे, कल्याण - डोंबिवली, मीरा - भाईंदर, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर या भागात फेरीवाल्यांचे बस्तान बसल्याचे दिसत आहे. स्टेशन परिसर, गर्दीची ठिकाणे, अरुंद रस्ते, मोकळे फुटपाथ, दुकानदारांसमोरील जागा आदी ठिकाणी फेरीवाले अधिक प्रमाणात दिसतात. ठाणे स्टेशनचा विचार केल्यास या ठिकाणी महापालिकेने तीन सत्रात फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पथक ठेवले. मात्र, तरीसुद्धा समस्या सुटताना दिसत नाही. बाजारपेठ, मासुंदा तलाव परिसर, वागळे इस्टेट, नौपाडा, कोपरी, लोकमान्यनगर आदींसह शहरातील सर्वच भागात फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. काही फेरीवाले कुर्ला, घाटकोपर येथून आले आहेत. त्यांची दादागिरी वाढताना दिसते. 

फेरीवाला दादा हा भाड्याने गाड्या किंवा जागा फेरीवाल्यांना देऊन त्यातून रोजच्या रोज १०० ते २०० रुपये हप्ता प्रत्येक गाडीमागे गोळा करतो. दुकानदार अशा फेरीवाल्यांकडून भाडे घेतात. अतिक्रमण विभागाची गाडी कारवाईसाठी केव्हा येणार, कशी येणार यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेतील काही कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून फेरीवाला दादा किंवा फेरीवाल्यांच्या प्रमुखाच्या मोबाइलवर मेसेज पाठविला जातो. 

पालिकेची गाडी कारवाईसाठी येण्यापूर्वीच फेरीवाले आपले सामानसुमान गल्लीत लपवतात. हीच साखळी गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत असल्याने फेरीवाल्यांचे फावते. एखाद्या अधिकाऱ्याने कारवाई केली तर हप्ता देऊनही कारवाई केल्याने मग फेरीवाला त्या अधिकाऱ्याला मारण्याची हिंमत करतो. 

रोजच नवनवीन फेरीवाले वाढत असल्याने त्यांच्यावर कारवाई करताना त्या भागात मागील कित्येक वर्षे बसत असलेल्या फेरीवाल्यावर नाहक कारवाईचा बडगा उगारला जातो. याला कारणीभूत पालिकेचे अंमलबजावणी न झालेले फेरीवाला धोरण हेच म्हणावे लागणार आहे. आता पालिका अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांवर कारवाई सुरू झाली. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहील आणि पुन्हा ‘जैसे थे’ चित्र दिसणार आहे. परंतु, हा अखेरचा पर्याय असू शकत नाही. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा देऊन फेरीवाल्यांचा प्रश्न कायमचा निकाली काढणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे असे हल्ले थोपवले जाऊ शकतात.

टॅग्स :thaneठाणे