शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

नुकसानभरपाईचा ‘तो’ ठराव कुठे बुडाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:11 IST

पावसात नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत मिळावी किंवा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करावा, असा ठराव मागील वर्षी ठाणे महापालिकेत झाला होता.

ठाणे : पावसात नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत मिळावी किंवा सहा महिन्यांचा मालमत्ताकर माफ करावा, असा ठराव मागील वर्षी ठाणे महापालिकेत झाला होता. परंतु, त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे त्या ठरावाचे नेमके काय झाले, असा सवाल केला जात आहे.आता तर असा ठराव झाला होता का, असा सवाल सत्ताधाऱ्यांनीच केला आहे. त्यामुळे ती केवळ प्रसिद्धीची स्टंटबाजी होती का, असा प्रश्न संतप्त ठाणेकर विचारू लागले आहेत.मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात एकाच दिवशी अतिवृष्टी झाली होती. यामध्ये काहींचा बळीही गेला होता. काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांचेदेखील नुकसान झाले होते. यानंतर श्रीरंग, वृंदावन भागातील सोसायटीधारकांनी यासंदर्भात पालिकेशी पत्रव्यवहार करून नुकसानभरपाई किंवा मालमत्ता करमाफीसाठीचे निवेदनसुद्धा दिले होते. शासनाच्या अध्यादेशाचा आधार घेऊन आयुक्तांना तसे अधिकार असल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले होते. त्यानंतर, झालेल्या १३ सप्टेंबर २०१७ च्या महासभेत यावर चर्चा झाली. अखेर, नुकसानभरपाई म्हणून शासनाकडून काही मदत मिळते का? महापालिकेच्या माध्यमातून ती देण्यात यावी किंवा त्यांना मालमत्ताकरात सवलत देता येऊ शकते का, याचा विचार व्हावा. मृत्युमुखी पडलेल्यांच्या घरच्यांनादेखील काही मोबदला देण्यात यावा. घनकचरा, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारी, अधिकाºयांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना एक पगारवाढ देण्यात यावी, असे ठरले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.अचानक या ठरावाची आठवण सत्ताधारी आणि विरोधकांना करून दिल्यानंतर हा ठराव झाला होता, त्याची अंमलबजावणी झाली का? तो आता कुठे आहे, कोणाच्या केबिनमध्ये आहे, याचा शोध मात्र सत्ताधाºयांकडून सुरू झाला आहे. यामध्ये दोषी कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे. परंतु, ही ठाणेकरांची फसवणूकआहे.-संदीप पाचंगे, मनसे, पदाधिकारीनुकसानभरपाई तसेच सहा महिन्यांपर्यंतचा मालमत्ताकर माफ करावा, असा ठराव झाला होता. परंतु, प्रशासनाने त्या ठरावाची अंमलबजावणी केलेली नाही. यात सत्ताधाºयांनी केवळ आपली पोळी भाजून घेण्याचेच काम केले आहे.-मिलिंद पाटणकर, भाजपा, गटनेतेअसे अनेक ठराव प्रसिद्धीसाठी होत असतात. परंतु, त्यांची अंमलबजावणी होतेच, असे नाही. यामध्ये सत्ताधारी आणि प्रशासन हे दोघेही दोषी आहेत.- विक्रांत चव्हाण,काँग्रेस, गटनेतेवास्तविक, अशा ठरावांची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासनाचे असते. आम्ही लोकप्रतिनिधी आमचे काम करत असतो तसेच राज्य शासनाकडूनदेखील नुकसानभरपाई मिळावी, ही अपेक्षा आहे. परंतु, तसे काहीच होताना दिसले नाही.- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपा

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाnewsबातम्या