शहरं
Join us  
Trending Stories
1
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
2
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
3
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
4
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
5
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
6
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?
7
तामिळनाडूत हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी; स्टॅलिन सरकारने आणले विधेयक
8
AFG vs BAN : वयाच्या चाळीशीत नबीनं रचला इतिहास; पाक खेळाडूच्या वर्ल्ड रेकॉर्डला लावला सुरुंग
9
Good News: महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
10
'निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरुन कोण तर चालवतंय', जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
12
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
13
“राहुल गांधींनी मतदारयादीतील घोळ देश पातळीवर मांडला, हे निकोप लोकशाहीला घातक”: थोरात
14
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा फ्लॉप शो! मुंबईकरासह चौघांच्या पदरी भोपळा पडल्यानं महाराष्ट्र संघ अडचणीत
15
"पत्नीला म्हणाले, बसमध्ये बसलोय", तो कॉल ठरला शेवटचा, जितेशचा होरपळून गेला जीव; ओळखही पटेना
16
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
17
Pankaj Dheer Death: 'महाभारत'मधील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगानं निधन
18
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
19
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
20
Priyal Yadav : प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?

वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मार्गी लागणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 23:59 IST

प्रस्ताव तीन महिन्यांपासून महासभेत रखडला : कचऱ्याची १०० टक्के लागणार विल्हेवाट

कल्याण : कचºयाचे वर्गीकरण न करता कचºयापासून वीजनिर्मिती अर्थात वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. जुलैमध्ये महासभेच्या पटलावर ठेवलेल्या या विषयाला पुढे गती मिळालेली नाही. जुलैपासून आतापर्यंत तीन महिने उलटले आहेत. येत्या महासभेत हा विषय मार्गी लावणे अपेक्षित आहे. मात्र, त्यापूर्वी कंत्राटदार कंपनीने सादरीकरण केल्यानंतरच प्रकल्पास मंजुरी देण्याविषयीचा निर्णय महासभेकडून घेतला जाणार आहे.

प्रकल्प मंजुरीसाठी महासभेसमोर दोन पर्याय सुचवले आहेत. महापालिकेने त्यासाठी कंत्राटदाराला अर्थसाहाय्य करण्याचा एक पर्याय आहे. अन्यथा, राज्य सरकारने केलेल्या सामंजस्य करारानुसार कचरा क्लस्टरमध्ये त्याचा समावेश होईपर्यंत वाट पाहणे, हा दुसरा पर्याय आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ राबविण्याचे केडीएमसीचे २००८ पासून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने या प्रकल्पासाठी १० एकरची जागा उंबर्डे येथे राखीव ठेवली आहे. इंडिया पॉवर व हिताची या जॉइंट व्हेंचर कंपन्यांची निविदा महापालिकेने स्वीकारली आहे. कंपनी जवळपास २५६ कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारणार आहे. महापालिकेस त्यासाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. महापालिकेने केवळ जागा द्यायची आहे. या प्रकल्पात ५७० मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया केली जाणार आहे. ओला-सुका कचºयाच्या वर्गीकरणाची गरज या प्रकारच्या प्रकल्पात भासत नाही.कंपनीने महापालिकेस कचरा वाहून नेण्याचा दर (टिपिंग फी) प्रतिटनाला ६९६ रुपये दिला आहे. हा प्रकल्प २० वर्षांसाठी असल्याने दुसºया वर्षापासून ६९६ रुपये दरात प्रतिवर्षी तीन टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या वर्षाला १२ कोटी ७० लाखांचा कचरा वाहतुकीचा खर्च हा विसाव्या वर्षी तीन टक्केवाढीनुसार ५० कोटी ३८ लाखांच्या घरात जाऊ शकतो. त्याचे गणित कंत्राटदार कंपनीने प्रस्तावात नमूद केले आहे.प्रकल्पात कचºयाची विल्हेवाट लावण्याची १०० टक्के हमी दिली आहे. कंत्राटदारास महापालिकेने ५० कोटींपर्यंतचे अर्थसाहाय्य केल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो. अर्थसाहाय्य करण्याचा एक प्रस्ताव महासभेच्या पटलावर आहे. त्याचबरोबर दुसरा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाविषयी राज्य सरकारने सिटी आॅफ अ‍ॅमस्टरडॅम किंगडम आॅफ नेदरलॅण्डशी सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि बदलापूर व अंबरनाथ पालिका यांच्यासाठी एकत्रित कचरा प्रक्रिया प्रकल्पाकरिता क्लस्टर योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कलस्टर योजनेत ‘वेस्ट टू एनर्जी’ समाविष्ट होऊ शकतो. यापैकी कोणता पर्याय महासभेला सोयीचा वाटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे....तर १०७ कोटींचा खर्च वाचणारप्रकल्प अस्तित्वात आल्यास उंबर्डे, बारावे, मांडा घनकचरा प्रकल्पांची गरज भासणार नाही. तसेच आधारवाडी डम्पिंगही बंद होऊ शकते. त्याचबरोबर कचरा उचलण्यासाठी करण्यात आलेल्या खाजगीकरणावर १०७ कोटी रुपयांचा खर्चही वाचू शकतो.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे