शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

यातून आमची सुटका होणार कधी?

By admin | Updated: September 24, 2015 00:05 IST

शहापूर तालुक्यातील कळमगाव कानविंदे या गावासह आदिवासी पाड्यांचा रेल्वेच्या वर्षानुवर्षे अरुंद होत चाललेल्या पूल व उड्डाणपुलाअभवी तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो आहे.

शहापूर तालुक्यातील कळमगाव कानविंदे या गावासह आदिवासी पाड्यांचा रेल्वेच्या वर्षानुवर्षे अरुंद होत चाललेल्या पूल व उड्डाणपुलाअभवी तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो आहे. वारंवार मागणी करूनही उड्डाणपूल होत नसल्याने या चक्रव्युहातून आमची सुटका होणार तरी कधी अशी म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे.मुंबई - कसारा या रेल्वे मार्गावर कानविंदे, कळमगाव, खरम्याचापाडा, हेदूपाडा, अंबतपाडा, पेंढरी या गावपाड्यातील शेकडो लोक विद्यार्थी दररोज कळमगाव, कानविंदे या गावातील रेल्वेपूलाखालून किंवा तो ओलांडून प्रवास करतात. तो करताना अपघात होऊन अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. ज्या पुलाखालून प्रवास करावा लागतो. त्या पुलाचे मजबूतीकरण करण्याच्या नावाखाली त्यांची रुंदी कमी झाल्याने चारचाकी मोठी वाहनेही जाणे बंद झाले आहे. परिवहन महामंडळाने बसही बंद केल्याने विद्यार्थ्यांसह नागरीकांना १ कि.मी. प्रवास पायीच करावा लागत आहे.या उड्डाणपुलासाठी १५ टक्के लोकवर्गणी भरण्यास ग्रामपंचायत भरण्यास तयार असताना व तशी निवेदने खासदार कै. प्रकाश परांजपे यांच्या पासून ते आजपर्यंतच्या खासदारांना देऊनही काही उपयोग झाला नाही. केवळ आश्वासना व्यतिरिक्त काहीही पदरी पडले नसल्याचे माजी उपसरपंच विरल भेरे यांनी सांगितले. वर्षानवर्ष जीव मुठीत घेऊन रेल्वे रुळ पार करावे लागत असल्यामुळे आता आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे ग्रामस्थ सांगतात. (वार्ताहर)