शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

यातून आमची सुटका होणार कधी?

By admin | Updated: September 24, 2015 00:05 IST

शहापूर तालुक्यातील कळमगाव कानविंदे या गावासह आदिवासी पाड्यांचा रेल्वेच्या वर्षानुवर्षे अरुंद होत चाललेल्या पूल व उड्डाणपुलाअभवी तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो आहे.

शहापूर तालुक्यातील कळमगाव कानविंदे या गावासह आदिवासी पाड्यांचा रेल्वेच्या वर्षानुवर्षे अरुंद होत चाललेल्या पूल व उड्डाणपुलाअभवी तालुक्याशी असलेला संपर्क तुटतो आहे. वारंवार मागणी करूनही उड्डाणपूल होत नसल्याने या चक्रव्युहातून आमची सुटका होणार तरी कधी अशी म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे.मुंबई - कसारा या रेल्वे मार्गावर कानविंदे, कळमगाव, खरम्याचापाडा, हेदूपाडा, अंबतपाडा, पेंढरी या गावपाड्यातील शेकडो लोक विद्यार्थी दररोज कळमगाव, कानविंदे या गावातील रेल्वेपूलाखालून किंवा तो ओलांडून प्रवास करतात. तो करताना अपघात होऊन अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. ज्या पुलाखालून प्रवास करावा लागतो. त्या पुलाचे मजबूतीकरण करण्याच्या नावाखाली त्यांची रुंदी कमी झाल्याने चारचाकी मोठी वाहनेही जाणे बंद झाले आहे. परिवहन महामंडळाने बसही बंद केल्याने विद्यार्थ्यांसह नागरीकांना १ कि.मी. प्रवास पायीच करावा लागत आहे.या उड्डाणपुलासाठी १५ टक्के लोकवर्गणी भरण्यास ग्रामपंचायत भरण्यास तयार असताना व तशी निवेदने खासदार कै. प्रकाश परांजपे यांच्या पासून ते आजपर्यंतच्या खासदारांना देऊनही काही उपयोग झाला नाही. केवळ आश्वासना व्यतिरिक्त काहीही पदरी पडले नसल्याचे माजी उपसरपंच विरल भेरे यांनी सांगितले. वर्षानवर्ष जीव मुठीत घेऊन रेल्वे रुळ पार करावे लागत असल्यामुळे आता आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे ग्रामस्थ सांगतात. (वार्ताहर)