शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

डोंबिवलीतील नगरविकासाची कामे पूर्ण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहरांच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. मात्र, दोन वर्षे या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहरांच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. मात्र, दोन वर्षे या खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केडीएमसीशी संबंधित विषय अजूनही प्रलंबित ठेवले आहेत. वास्तविकपणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या शहरांनी आपल्याला व आपल्या पक्षाला २५ वर्षे एकहाती सत्ता दिली. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवन सुसह्य करणे आपले कर्तव्य ठरते, असा टोला डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला.

व्यस्त कार्यभारामुळे केडीएमसी हद्दीतील प्रश्नांकडे शिंदे यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरविकास खात्यांतर्गत मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचे चव्हाण म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी अपूर्ण प्रकल्पांच्या कामांची जंत्रीच मांडली.

सुतिकागृहाच्या पुनर्विकासाला २१ ऑक्टोबर २०१४ ला चालना मिळाली. मनपाच्या महासभेत २० नोव्हेंबर २०१६ ला ठराव झाला. चारवेळा स्वारस्य देकार काढले. अखेर २५ फेब्रुवारी २०२० ला एकच स्वारस्य देकार आला. रुबी हेल्थकेअर व आशर बिल्डर्स यांचा ९ नोव्हेंबर २०२० ला देकार देण्यात आला. परंतु, सुतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार?, असा सवाल चव्हाण यांनी केला.

मोठागाव-माणकोली पुलाच्या बांधकामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विशेषाधिकारात २२३ कोटींचा निधी दिला होता. या पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार? कल्याण-शीळ रस्त्याचे काँक्रिटीकरण व विस्तारासाठी ७७३ कोटींच्या निधीला मंजुरी दिला होती. मग अजूनही ते काम का पूर्ण होत नाही? राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या केडीएमसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या रिंगरोडच्या दुर्गाडी- मोठागाव-हेदुटणे मार्गाचे काम कधी होणार? महत्त्वाकांक्षी ऐरोली-काटई भुयारी व उन्नत मार्गाचे काम फडणवीसांच्या हस्ते सुरू झाले. या कामासाठी त्यांनीच ९४४ कोटींचा निधी मंजूर केला. या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असे प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले.

ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या जोशी हायस्कूलकडे उतरणाऱ्या मार्गाचे लोकार्पण आपल्याच हस्ते झाले. तर, ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यापर्यंत उन्नत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाला ३० कोटी निधी कधी मंजूर करणार? मोठागाव रेल्वे क्रॉसिंगच्या डीएफसीसी पुलाच्या ५० कोटींच्या खर्चापैकी २५ कोटींचा भार एमएमआरडीएने उचलण्याबाबतचा प्रश्न कोण सोडवणार? कल्याण तालुक्यासाठी महत्त्वाचे असलेल्या टिटवाळ्यातील मेडिकल कॉलेजसाठी जागा अधिग्रहित करण्याचे काम कधी करणार, असे सवालही चव्हाण यांनी केले.

मेट्रो मार्गाचा विसर पडला का?

कल्याण-तळोजादरम्यानच्या चार हजार ७३८ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो १२ प्रकल्पाचा सरकारला विसर तर पडला नाही ना? तसेच आठ हजार ४१६ कोटी खर्चाच्या मेट्रो ५ म्हणजेच भिवंडी-कल्याण मेट्रोचे काम प्रगतिपथावर कधी येणार? एमएमआरडीएच्या माध्यमातून ४७२ कोटींच्या निधीतून केडीएमसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे काम दीड वर्षांपासून प्रलंबित का ठेवले आहे?, असे प्रश्नही यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केले.

-----------