शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील नगरविकासाची कामे पूर्ण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहरांच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. मात्र, दोन वर्षे या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहरांच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. मात्र, दोन वर्षे या खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केडीएमसीशी संबंधित विषय अजूनही प्रलंबित ठेवले आहेत. वास्तविकपणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या शहरांनी आपल्याला व आपल्या पक्षाला २५ वर्षे एकहाती सत्ता दिली. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवन सुसह्य करणे आपले कर्तव्य ठरते, असा टोला डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला.

व्यस्त कार्यभारामुळे केडीएमसी हद्दीतील प्रश्नांकडे शिंदे यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरविकास खात्यांतर्गत मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचे चव्हाण म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी अपूर्ण प्रकल्पांच्या कामांची जंत्रीच मांडली.

सुतिकागृहाच्या पुनर्विकासाला २१ ऑक्टोबर २०१४ ला चालना मिळाली. मनपाच्या महासभेत २० नोव्हेंबर २०१६ ला ठराव झाला. चारवेळा स्वारस्य देकार काढले. अखेर २५ फेब्रुवारी २०२० ला एकच स्वारस्य देकार आला. रुबी हेल्थकेअर व आशर बिल्डर्स यांचा ९ नोव्हेंबर २०२० ला देकार देण्यात आला. परंतु, सुतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार?, असा सवाल चव्हाण यांनी केला.

मोठागाव-माणकोली पुलाच्या बांधकामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विशेषाधिकारात २२३ कोटींचा निधी दिला होता. या पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार? कल्याण-शीळ रस्त्याचे काँक्रिटीकरण व विस्तारासाठी ७७३ कोटींच्या निधीला मंजुरी दिला होती. मग अजूनही ते काम का पूर्ण होत नाही? राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या केडीएमसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या रिंगरोडच्या दुर्गाडी- मोठागाव-हेदुटणे मार्गाचे काम कधी होणार? महत्त्वाकांक्षी ऐरोली-काटई भुयारी व उन्नत मार्गाचे काम फडणवीसांच्या हस्ते सुरू झाले. या कामासाठी त्यांनीच ९४४ कोटींचा निधी मंजूर केला. या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असे प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले.

ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या जोशी हायस्कूलकडे उतरणाऱ्या मार्गाचे लोकार्पण आपल्याच हस्ते झाले. तर, ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यापर्यंत उन्नत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाला ३० कोटी निधी कधी मंजूर करणार? मोठागाव रेल्वे क्रॉसिंगच्या डीएफसीसी पुलाच्या ५० कोटींच्या खर्चापैकी २५ कोटींचा भार एमएमआरडीएने उचलण्याबाबतचा प्रश्न कोण सोडवणार? कल्याण तालुक्यासाठी महत्त्वाचे असलेल्या टिटवाळ्यातील मेडिकल कॉलेजसाठी जागा अधिग्रहित करण्याचे काम कधी करणार, असे सवालही चव्हाण यांनी केले.

मेट्रो मार्गाचा विसर पडला का?

कल्याण-तळोजादरम्यानच्या चार हजार ७३८ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो १२ प्रकल्पाचा सरकारला विसर तर पडला नाही ना? तसेच आठ हजार ४१६ कोटी खर्चाच्या मेट्रो ५ म्हणजेच भिवंडी-कल्याण मेट्रोचे काम प्रगतिपथावर कधी येणार? एमएमआरडीएच्या माध्यमातून ४७२ कोटींच्या निधीतून केडीएमसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे काम दीड वर्षांपासून प्रलंबित का ठेवले आहे?, असे प्रश्नही यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केले.

-----------