शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील नगरविकासाची कामे पूर्ण कधी करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहरांच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. मात्र, दोन वर्षे या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहरांच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. मात्र, दोन वर्षे या खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केडीएमसीशी संबंधित विषय अजूनही प्रलंबित ठेवले आहेत. वास्तविकपणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या शहरांनी आपल्याला व आपल्या पक्षाला २५ वर्षे एकहाती सत्ता दिली. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवन सुसह्य करणे आपले कर्तव्य ठरते, असा टोला डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला.

व्यस्त कार्यभारामुळे केडीएमसी हद्दीतील प्रश्नांकडे शिंदे यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरविकास खात्यांतर्गत मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचे चव्हाण म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी अपूर्ण प्रकल्पांच्या कामांची जंत्रीच मांडली.

सुतिकागृहाच्या पुनर्विकासाला २१ ऑक्टोबर २०१४ ला चालना मिळाली. मनपाच्या महासभेत २० नोव्हेंबर २०१६ ला ठराव झाला. चारवेळा स्वारस्य देकार काढले. अखेर २५ फेब्रुवारी २०२० ला एकच स्वारस्य देकार आला. रुबी हेल्थकेअर व आशर बिल्डर्स यांचा ९ नोव्हेंबर २०२० ला देकार देण्यात आला. परंतु, सुतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार?, असा सवाल चव्हाण यांनी केला.

मोठागाव-माणकोली पुलाच्या बांधकामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विशेषाधिकारात २२३ कोटींचा निधी दिला होता. या पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार? कल्याण-शीळ रस्त्याचे काँक्रिटीकरण व विस्तारासाठी ७७३ कोटींच्या निधीला मंजुरी दिला होती. मग अजूनही ते काम का पूर्ण होत नाही? राज्य सरकारने मंजुरी दिलेल्या केडीएमसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या रिंगरोडच्या दुर्गाडी- मोठागाव-हेदुटणे मार्गाचे काम कधी होणार? महत्त्वाकांक्षी ऐरोली-काटई भुयारी व उन्नत मार्गाचे काम फडणवीसांच्या हस्ते सुरू झाले. या कामासाठी त्यांनीच ९४४ कोटींचा निधी मंजूर केला. या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असे प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले.

ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या जोशी हायस्कूलकडे उतरणाऱ्या मार्गाचे लोकार्पण आपल्याच हस्ते झाले. तर, ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यापर्यंत उन्नत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाला ३० कोटी निधी कधी मंजूर करणार? मोठागाव रेल्वे क्रॉसिंगच्या डीएफसीसी पुलाच्या ५० कोटींच्या खर्चापैकी २५ कोटींचा भार एमएमआरडीएने उचलण्याबाबतचा प्रश्न कोण सोडवणार? कल्याण तालुक्यासाठी महत्त्वाचे असलेल्या टिटवाळ्यातील मेडिकल कॉलेजसाठी जागा अधिग्रहित करण्याचे काम कधी करणार, असे सवालही चव्हाण यांनी केले.

मेट्रो मार्गाचा विसर पडला का?

कल्याण-तळोजादरम्यानच्या चार हजार ७३८ कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो १२ प्रकल्पाचा सरकारला विसर तर पडला नाही ना? तसेच आठ हजार ४१६ कोटी खर्चाच्या मेट्रो ५ म्हणजेच भिवंडी-कल्याण मेट्रोचे काम प्रगतिपथावर कधी येणार? एमएमआरडीएच्या माध्यमातून ४७२ कोटींच्या निधीतून केडीएमसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे काम दीड वर्षांपासून प्रलंबित का ठेवले आहे?, असे प्रश्नही यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केले.

-----------