शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील धोकादायक रासायनिक कारखाने कधी बंद होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 22:59 IST

एमआयडीसीतील रहिवासी संघटनेचा सवाल : ‘प्रोबेस’च्या अहवालाची अद्याप अंमलबजावणी नाही

मुरलीधर भवार कल्याण : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारने धोकादायक रासायनिक कारखाने बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, हा निर्णय केवळ तारापूरपुरता न घेता डोंबिवलीएमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कारखाने आधी बंद करा, अशी मागणी डोंबिवली औद्योगिक विभागातील रहिवासी संघटनेने केली आहे.

डोंबिवलीमधील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटासंदर्भात राज्य सरकारच्या चौकशी समितीने दिलेला अहवाल सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. तसेच त्याची अंमलबजावणीच केली नाही. अहवालाची अंमलबजावणी केली असती, तर कदाचित तारापूर येथील स्फोट टाळता आला असता, याकडे संघटनेचे पदाधिकारी व जागरूक नागरिक राजू नलावडे यांनी लक्ष वेधले.

प्रोबेस स्फोटानंतर डोंबिवलीतील धोकादायक रासायनिक कारखाने तातडीने स्थलांतरित करा, अशी मागणी नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली. मात्र, एखादा उद्योग तातडीने कुठे व कसा स्थलांतरित करायचा, कामगारांचे पुनर्वसन कसे व कुठे करायचे, शिवाय कारखान्याला जागा कुठून व कशी द्यायची. अन्य ठिकाणीही त्याला विरोध होणार नाही, याचीही हमी देता येत नाही. त्यामुळे कारखाने स्थलांतराची मागणी केवळ निवेदनापुरतीच राहिली.

प्रोबेसच्या स्फोटापश्चात डोंबिवली एमआयडीसीत किती धोकादायक कारखाने आहेत, याचा तपशील नलावडे यांनी माहितीच्या अधिकारात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाकडे मागितला होता. या कार्यालयाने नलावडे यांना दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील पाच मोठे कारखाने अतिधोकादायक आहेत. त्यामुळे हे कारखाने बंद करावेत किंवा ते अन्यत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी डोंबिवली रहिवासी संघटनेने केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, तारापूर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धोकादायक कारखाने बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. धोकादायक कारखान्यात सुरक्षितता पाळली जात आहे का, याची पाहणी करणे तसेच कारखान्यांच्या सेफ्टी आॅडिटची जबाबदारी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांची आहे. मात्र, ही पाहणी व सेफ्टी आॅडिट केवळ कागदावर केले जाते. त्यामुळेच स्फोटाच्या घटना घडल्यावर नागरिक व कामगारांना त्यांचा जीव गमाविण्याची वेळ येते. अनेक धोकादायक कारखान्यांना त्यांच्यातील त्रुटी दूर करण्याची संधी दिली जाते. मात्र, हे कारखाने त्यात काही सुधारणा न करता केवळ सुधारणा केल्याचे भासवतात. नागरिकांच्या जीवांचे गांभीर्य नसलेले कारखाने बंद केले जातील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण येथील कार्यालयात पुरेसे कर्मचारी नसल्याने भल्या मोठ्या कार्यक्षेत्रासाठी अपुरे कर्मचारी-अधिकारी असल्याने पाहणी करून सुरक्षितता कशी पाळणार, असा प्रश्न उपस्थित करत यंत्रणा हात वर करताना दिसतात.कारखाने अतिधोकादायक असले तरी स्फोटक नाहीत- कामाधोकादायक रासायनिक कारखाने बंद करण्याच्या निर्णयाप्रत सरकार आले असून, याबाबत कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले, डोंबिवलीत प्रोबेससारखे कारखाने आता नाहीत. सरकारी यंत्रणांनी माहितीच्या अधिकारात अतिधोकादायक कारखान्यांची यादी दिली असली, तरी तेथे रासायनिक प्रक्रिया करताना अतिदक्षता बाळगली जाते. कारखान्यांचे स्वत:चे सेफ्टी युनिट व सेल रासायनिक प्रक्रिया करताना त्यांची विशेष काळजी घेत आहेत. त्यामुळे आतापर्यंत धोकादायक कारखान्यांत स्फोटाची घटना घडलेली नाही. रासायनिक प्रक्रियेसाठी वापरला जाणारा लहान आकाराचा रिअ‍ॅक्टर १० मिलिमीटर जाडीचा तर, मोठ्या आकाराचा २० मिलिमीटर जाडीचा लोखंडी असतो. अन्य कारखान्यांत तर बॉयलरचा वापर केला जातो. कारखाने अतिधोकादायक असले तरी ते स्फोटक नाहीत, असा दावा सोनी यांनी केला आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी