शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

संजय राऊत बोलायला लागले की लोक टिव्ही बंद करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका; शंभूराज देसाई यांचा टोला

By अजित मांडके | Updated: February 22, 2023 16:28 IST

"ज्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, कष्ट घेतले, अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून जर शिवसेनेचे कामकाज चालत असेल तर त्याचपेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही."

ठाणे : पालकमंत्री शंभूराज देसाई हे बुधवारी ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. ज्याप्रकारे संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केलेला आहे, त्याप्रमाणे ते श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी, असे वक्तव्य करत आहेत, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच संजय राऊत बोलायला लागल्यानंतर लोक टीव्ही बंद करतात, असा टोलाही शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांना माध्यमांशी बोलताना लगावला. 

याच बरोबर, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. शासनाच्या उच्च पातळीवरून निर्णयाची माहिती एमपीएससी बोर्डाला दिली जाईल, असेही शंभूराजे देसाई यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणत्याही गुंडांचा वावर आढळून आला नसल्याचे स्पष्टीकरण ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाणचिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर प्रथमच कार्यकारणी बैठक पार पडली आणि या कार्यकारणी बैठकीत शिवसेनाप्रमुख कार्यालय म्हणून आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमाची निवड करण्यात आली आणि याच आनंद आश्रमामधून शिवसेनेचा पुढील कारभार चालवला जाणार आहे ज्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, कष्ट घेतले, अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून जर शिवसेनेचे कामकाज चालत असेल तर त्याचपेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही, असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :thaneठाणेShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाMPSC examएमपीएससी परीक्षाSanjay Rautसंजय राऊतJitendra Awhadजितेंद्र आव्हाड