शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

महत्त्वाचे काय, युतीधर्म की तडजोड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 02:58 IST

केडीएमसीची २०१५ ला निवडणूक पार पडली. त्यात शिवसेना ५३, भाजपा ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९, असे पक्षीय बलाबल आहे

प्रशांत माने, कल्याणकेडीएमसीची २०१५ ला निवडणूक पार पडली. त्यात शिवसेना ५३, भाजपा ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९, असे पक्षीय बलाबल आहे. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या शिवसेना-भाजपाने संख्याबळाच्या आधारावर सत्ता स्थापन केली. शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आल्याने त्यांना पहिल्या अडीच वर्षांचा महापौरपदाचा मान, तर उर्वरित अडीच वर्षांत भाजपाला एक वर्ष आणि दीड वर्ष शिवसेनेला, असा फॉर्म्युला त्यावेळी युतीने ठरवला. त्यानुसार १३ मे रोजी महापौरपदाचा अडीच वर्षांचा कालावधी संपत आहे. त्यामुळे ९ मे रोजी महापौरपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ५ मे रोजी उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत.फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेनेनंतर आता महापौरपद भाजपाच्या वाट्याला जाणार आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दिलेल्या अनपेक्षित धक्क्याने भाजपामध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच उल्हानगरमधील राजकारणाने वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. यात महापौरपदाचे मनसुबे धुळीला मिळतात की काय, अशी शंका केडीएमसीतील भाजपा नगरसेवकांना वाटते आहे. दुसरीकडे शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेले फर्मान भाजपाच्या गोटात अधिक चिंता वाढवणारे ठरले आहे. शिंदे यांनी परिपत्रकाद्वारे शिवसेनेच्या नगरसेवकांना २ ते १० मे दरम्यान कोणीही महापालिका क्षेत्राबाहेर जाऊ नये, असे बजावले आहे. एकंदरीतच हे वातावरण पाहता महापौर सेनेचाच होणार, असे संकेत सेना पदाधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे तर भाजपामध्ये नाराजीचा सूर आहे.यंदाचे महापौरपद खुल्या गटातील महिलेसाठी आरक्षित आहे. यात शिवसेनेतील इच्छुक महिलांची नावेही समोर आली आहेत. नगरसेविका भारती मोरे, विनीता राणे, वैशाली भोईर यांची नावे चर्चेत आहेत. परंतु, शिवसेनेकडे महापौरपद राहिल्यास ते डोंबिवलीच्या वाट्याला जाणार आहे. भाजपामध्ये चलबिचल पाहावयास मिळत असली तरी त्यांच्याकडून सेना युतीधर्म पाळेल, असा दावा केला जात आहे. जर भाजपाच्या वाट्याला पद गेल्यास खुशबू चौधरी, मनीषा धात्रक, डॉ. सुनीता पाटील, उपेक्षा भोईर या संभाव्य नगरसेविकांमधील एकीची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यंदाचे महापौरपद हे एक वर्षासाठी असणार आहे. यात २०१९ मे मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीची लागणारी आचारसंहिता विचारात घेता प्रत्यक्ष कामासाठी जेमतेम नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी नवीन महापौरांना मिळणार आहे. यामुळे हे महापौरपद घ्यायचे की उल्हासनगरमधील समीकरण पार पाडायचे, हे भाजपाला ठरवावे लागणार आहे. त्याच्यापुढील दीड वर्षाच्या महापौरपदाच्या कालावधीतही विधानसभा निवडणूक होणार आहे. पण त्या दीड वर्षात १४ ते १५ महिने तरी महापौरपद उपभोगायला मिळणार आह,े ही वस्तुस्थिती आहे.सध्या स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती, शिक्षण समिती सभापती अशी महत्त्वाची पदे भाजपाकडे असल्याने महापौरपद आपल्याकडे राहावे, असा आग्रह सेना नगरसेवकांचा आहे. पण महापौरपदाच्या बदल्यात स्थायीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांची सभापतीपदे भाजपाकडे आणखी एका वर्षासाठी देण्यास शिवसेनेचे नगरसेवक राजी होतील का, हा देखील सवाल आहे. दरम्यान, उल्हासनगरमधील राजकारणावर कल्याणचे गणित अवलंबून असल्याने नेमके काय होते, याकडे लक्ष आहे.उल्हासनगरमध्ये साई पक्ष आणि ओमी कलानी गट डोईजड होऊ लागल्याने भाजपा-शिवसेनेची नैसर्गिक युती हवी, असा सूर अप्रत्यक्षरीत्या का होईना, भाजपा पदाधिकारी आळवत आहेत. यात वैयक्तिक राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी ही भूमिका घेतली जात असली तरी त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. कल्याणमधील महापौरपद शिवसेनेला सोडले तर उल्हासनगरमध्ये सत्तांतर होण्याची दाट शक्यता व्यक्त होते आहे.यामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री व डोंबिवलीचे आ. रवींद्र चव्हाण यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दोघांनाही स्वत:चे वर्चस्व अबाधित ठेवायचे आहे. त्यात आमदारकी, खासदारकी पटकावण्याची गणिते बघता त्यांनाही तडजोडीशिवाय पर्याय नाही, असेही बोलले जाते आहे.