शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कागदावरील हिरवळ काय कामाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:25 IST

आतापर्यंत तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात किती आणि नव्याने किती वृक्षलागवड केली गेली? त्यातली जगली किती? या व अशा प्रश्नांची उत्तरे पालिका व लोकप्रतिनिधींनीच दिली पाहिजेत.

- धीरज परबसनाच्या वृृक्षलागवड अभियानात २६ हजार २३० झाडे लावण्याच्या उद्दिष्टापेक्षा दोन हजार ६६७ इतक्या अतिरिक्त झाडांची लागवड केली गेली. मीरा-भार्इंदर महापालिकेने दिलेली आकडेवारी खरी असल्याचे मान्य करून त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. पण, पालिका व लोकप्रतिनिधींकडून सध्या सुरू असलेल्या पर्यावरणाच्या ºहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालिकेच्या आकडेवारीनुसार एकूण वृक्षलागवडीपैकी तब्बल २२ हजार रोपे कांदळवनाची, तर अन्य झाडांची सहा हजार रोपे लावली गेली. वृक्ष प्राधिकरण समितीचे अस्तित्व बेकायदेशीर असूनही ती हजारो झाडे तोडायला मंजुऱ्या देत सुटली आहे. समितीने दिलेल्या अनुमतीनुसार एक झाड तोडण्याच्या बदल्यात पाच झाडे लावायचे पालिकेने ठरवले आहे. मग, आतापर्यंत तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात किती आणि नव्याने किती वृक्षलागवड केली गेली? त्यातली जगली किती? या व अशा प्रश्नांची उत्तरे पालिका व लोकप्रतिनिधींनीच दिली पाहिजेत. झाडांची तोड व छाटणी करणे म्हणजे जणू फार मोठे सामाजिक कार्य करतोय, अशा आविर्भावात नगरसेवक फोटो काढून प्रसिद्धी घेत आहेत. सर्व कायदे गुंडाळून वृक्षछाटणीस परवानगी देणाºयांनी पर्यावरणाच्या मुळावर उठणे बंद करावे. मगच, हरित मीरा-भार्इंदर आणि पर्यावरणाच्या वल्गना कराव्यात.झाडांचे जतन करण्यासाठी असलेल्या अधिनियमात वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये त्या क्षेत्रातील अभ्यासू व पर्यावरणरक्षणाकरिता काम करणाºया सदस्यांची नियुक्ती बंधनकारक असतानाही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संगनमताने आजपर्यंत केवळ नगरसेवकांचीच या समितीवर वर्णी लावली. उच्च न्यायालयाने अन्य पालिकांचे कान पिळूनही प्रशासन व लोकप्रतिनिधी निलाजरेपणे बेकायदा समितीच्या बैठका घेऊन झाडांच्या कत्तलींना मंजुरी देत आहे.मुळात झाडांच्या छाटणीसाठी हरित लवादाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. नियमात त्यासाठीचे निकष आहेत. पूर्वी पावसाळ्याआधी झाडांची छाटणी केली जायची. आता बाराही महिने नगरसेवक छाटणीच्या मागे लागलेले असतात. खाजगी संकुलातील झाडांची छाटणी करण्यासाठी दबाव टाकतात. इमारतीच्या आवारात वा परिसरातील झाडांच्या तोडणीसाठी ही मंडळी तगादा लावतात. मतांच्या लाचारीसाठी निसर्ग व पर्यावरणाचा ºहास करतोय. त्यावर अवलंबून असणाºया असंख्य पक्षी, प्राणी, जीवांना उद्ध्वस्त करतोय, याची खंत या नगरसेवकांना नाही. झाडांच्या खोडांना काँक्रिट, डांबर लावल्याने झाडांना मिळणारा श्वास बंद होऊन फास आवळला जातो, त्याबद्दल यांना काही सोयरसुतक नसते. झाडे लावतानाचे फोटो काढून चमकोगिरी करणारे हे लोकप्रतिनिधी व त्यांचे चेलेचपाटे नंतर ते झाड जगले किंवा कसे, याकडे ढुंकूनही पहात नाहीत.आतापर्यंत तोडलेल्या हजारो झाडांच्या बदल्यात किती आणि कुठे झाडे लावली गेली, त्याचा थांगपत्ता नाही. किती झाडे तोडली गेली व त्याच्या बदल्यात किती नवीन झाडांची लागवड केली गेली, याचे त्रयस्थ संस्थेकडून सर्वेक्षण करून त्याची सविस्तर आकडेवारी जाहीर झालीच पाहिजे. तरच, खरे चित्र स्पष्ट होईल. आज शहरे भकास होत चालली आहेत. मोठी झाडे वाचवण्याऐवजी त्यांची कत्तल केली जात आहे. आकडेवारीचे खेळ करण्यात पालिका प्रशासन हुशार आहे. आकडेवारीच्या खेळात निसर्ग व पर्यावरण मात्र वजा होत चालले आहे.

टॅग्स :thaneठाणे