शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

डम्पिंगचा धंदा कोणामुळे?

By admin | Updated: December 10, 2015 01:55 IST

दिव्यातील डम्पिंगजवळच्या रसायनांच्या पिंपाला लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी वारंवार आंदोलने करूनही सीआरझेडच्या हद्दीत

ठाणे : दिव्यातील डम्पिंगजवळच्या रसायनांच्या पिंपाला लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी वारंवार आंदोलने करूनही सीआरझेडच्या हद्दीत नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने डम्पिंग सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. रसायनांच्या आगीमुळे झालेल्या वायुबाधेचा फटका बसलेल्या दिव्यातील रहिवाशांनी बुधवारी पालिकेच्या गाड्या अडवून धरत आपला संताप व्यक्त केला. दिवसाढवळ््या सर्व सरकारी यंत्रणांसमोर दिवावासीयांचा, आसपासच्या गावांचा जीव धोक्यात टाकणारे रसायनमाफिया राजरोस वावरत असूनही त्यांच्याकडे कानाडोळा केला जात असल्याबद्दल नागरिकांनी आक्रमक भावना व्यक्त केली. बेकायदा पद्धतीने रसायने ओतली जात असल्याने हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागल्याचे म्हणणेही स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मांडले. मंगळवारच्या दुर्घटनेवेळी ५८ पैकी तीन ड्रम फुटले. जर उरलेली पिंपेही फुटली असती तर भोपाळसारखी मोठी दुर्घटना घडली असती. डम्पिंगजवळच ही घटना घडली असली तरी पालिका सीआरझेडच्या जागेत बेकायदा डम्पिंग चालवित असल्याचे उघड झाले आहे. सततच्या विरोधानंतरही हे डम्पिंग ग्राऊंड सुरू असल्याने त्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या डम्पिंगवर २००५ पासून दररोज २०० मेट्रिक टन कचरा टाकला जातो. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेकांना श्वसनविकार जडले आहेत. याविरोधात अनेकवेळा रास्ता रोको, पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला, पण फरक पडलेला नाही.>आधारवाडीत कचरा बंद आंदोलनकल्याण : मनाई हुकूम असतानाही येथिल आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर केडीएमसीकडून कचरा टाकणे अद्यापही सुरूच आहे. याचा नाहक त्रास तेथील स्थानिक रहिवाशांना होत असून त्यात परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी देखील भरडले जात आहेत. या निषेधार्थ गुरूवारी डंपिंग ग्राऊंड येथे सकाळी ९ च्या सुमारास ते ‘कचरा बंद’ आंदोलन छेडणार आहेत.डंपिंगच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने केडीएमसीला फटकारून महापालिका क्षेत्रात नवीन बांधकाम करण्यास मनाई केली आहे. यावर घनकचरा विल्हेवाट लावण्यासंदर्भात निविदांच्या कार्यवाहीला प्रारंभ झाला असला तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी आजघडीलाही डंपिंगची समस्या जैसे थे च असून कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, पेटणाऱ्या कचऱ्याचे धुराचे लोट यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याठिकाणी अण्णा भाऊ साठे नगर वसले असून येथील लोकसंख्या हजारोंच्या आसपास आहे. तसेच या परिसरात महाविद्यालय आणि शाळादेखील आहेत. त्यामुळे या प्रदूषणाचा त्रास विद्यार्थ्यांनाही होत आहे. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून डंपिंग बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.