शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

डम्पिंगचा धंदा कोणामुळे?

By admin | Updated: December 10, 2015 01:55 IST

दिव्यातील डम्पिंगजवळच्या रसायनांच्या पिंपाला लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी वारंवार आंदोलने करूनही सीआरझेडच्या हद्दीत

ठाणे : दिव्यातील डम्पिंगजवळच्या रसायनांच्या पिंपाला लागलेली आग थोडक्यात आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी वारंवार आंदोलने करूनही सीआरझेडच्या हद्दीत नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने डम्पिंग सुरू आहे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. रसायनांच्या आगीमुळे झालेल्या वायुबाधेचा फटका बसलेल्या दिव्यातील रहिवाशांनी बुधवारी पालिकेच्या गाड्या अडवून धरत आपला संताप व्यक्त केला. दिवसाढवळ््या सर्व सरकारी यंत्रणांसमोर दिवावासीयांचा, आसपासच्या गावांचा जीव धोक्यात टाकणारे रसायनमाफिया राजरोस वावरत असूनही त्यांच्याकडे कानाडोळा केला जात असल्याबद्दल नागरिकांनी आक्रमक भावना व्यक्त केली. बेकायदा पद्धतीने रसायने ओतली जात असल्याने हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला लागल्याचे म्हणणेही स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मांडले. मंगळवारच्या दुर्घटनेवेळी ५८ पैकी तीन ड्रम फुटले. जर उरलेली पिंपेही फुटली असती तर भोपाळसारखी मोठी दुर्घटना घडली असती. डम्पिंगजवळच ही घटना घडली असली तरी पालिका सीआरझेडच्या जागेत बेकायदा डम्पिंग चालवित असल्याचे उघड झाले आहे. सततच्या विरोधानंतरही हे डम्पिंग ग्राऊंड सुरू असल्याने त्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. या डम्पिंगवर २००५ पासून दररोज २०० मेट्रिक टन कचरा टाकला जातो. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेकांना श्वसनविकार जडले आहेत. याविरोधात अनेकवेळा रास्ता रोको, पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला, पण फरक पडलेला नाही.>आधारवाडीत कचरा बंद आंदोलनकल्याण : मनाई हुकूम असतानाही येथिल आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर केडीएमसीकडून कचरा टाकणे अद्यापही सुरूच आहे. याचा नाहक त्रास तेथील स्थानिक रहिवाशांना होत असून त्यात परिसरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी देखील भरडले जात आहेत. या निषेधार्थ गुरूवारी डंपिंग ग्राऊंड येथे सकाळी ९ च्या सुमारास ते ‘कचरा बंद’ आंदोलन छेडणार आहेत.डंपिंगच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने केडीएमसीला फटकारून महापालिका क्षेत्रात नवीन बांधकाम करण्यास मनाई केली आहे. यावर घनकचरा विल्हेवाट लावण्यासंदर्भात निविदांच्या कार्यवाहीला प्रारंभ झाला असला तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी आजघडीलाही डंपिंगची समस्या जैसे थे च असून कचऱ्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी, पेटणाऱ्या कचऱ्याचे धुराचे लोट यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याठिकाणी अण्णा भाऊ साठे नगर वसले असून येथील लोकसंख्या हजारोंच्या आसपास आहे. तसेच या परिसरात महाविद्यालय आणि शाळादेखील आहेत. त्यामुळे या प्रदूषणाचा त्रास विद्यार्थ्यांनाही होत आहे. यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून डंपिंग बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.