शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

भारनियमनाने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 03:56 IST

दहा ते बारा तास काळोख; विद्यार्थ्यांना मेणबत्तीचा आधार, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

पालघर : जिल्ह्यात १० ते १२ तासाचे भारनियमन लादण्यात आल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले असून एन परिक्षामध्ये विद्यार्थ्यांवर दिवा लावून अभ्यास करण्याची वेळ आली आहे. हे भारिनयमन रद्द करण्यासाठी सत्ताधारी आमदारानाच आपल्या सरकारविरोधात उपोषणाला बसण्याची वेळ आल्याची टीका शुक्रवारी विधानपरिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांनी केली आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.जिल्ह्यातील वाढते भारनियमन आणि अन्य वीज समस्याचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित,जिप अध्यक्ष विजय खरपडे,आमदार अमति घोडा, जिल्हाधिकारीडॉ.प्रशांत नारनवरे, मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, विद्युत वितरण च्या अधीक्षक अभियंत्या किरण नगावकर, निलेश अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.वर्ष १९७४ पासून वसई ते झाई-बोर्डी या किनारपटटीभागासह दगडधोंड आदी ग्रामीण भागात भागात बसविण्यात आलेले विद्युत खांब, तारा जीर्ण झाल्याने अनेक वेळा अपघात होत विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नवीन खांब, तारा बद्लण्याबाबत कार्यवाही व्हावी असे खासदार गावित यांनी सांगितले. त्यावर सदर भागाचे सर्वेक्षण करण्यात यावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना सांगितले.सर्व तालुक्यात १० ते १२ तासांचे भारनियमन रद्द करण्या बरोबरच मीटर रिडींगसाठी नेमलेल्या एजन्सीकडून दोन दोन वर्षे रीडिंगच घेतली जात नसल्याचा आरोप जिप अध्यक्ष खरपडे यांनी केला.महावितरणला प्रस्ताव सादर करण्याचे सवरांचे निर्देशसागरी किनारा तसेच जुलै महिन्यात उद्भवलेली पूर परिस्थिती यामुळे विजेचे खांब, तारा यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी फिडर, सबस्टेशन यांची उंची वाढविणे आवश्यक आहे.अर्नाळा भागात नवीन सबस्टेशन उभारणे, जव्हार-डहाणू या भागात नवीन लाईन उभारणे आदी मागण्या यावेळी महावितरणने केल्या. यावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :electricityवीजpalgharपालघर