शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

ऑपरेशन महालक्ष्मी : मृत्यूच्या दाढेतूनच झाली आमची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 00:20 IST

ऑपरेशन महालक्ष्मी : संदीप भाटलेकरने कथन केला थरार

निलेश धोपेश्वरकर

ठाणे : २६ जुलै ही तारीख मुंबईकर कधीही विसरू शकणार नाही. त्यावेळच्या आठवणी आजही मुंबईतील नागरिकांच्या मनात घर करून आहेत. याचीच पुनरावृत्ती २६ जुलैला मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांबाबतीत झाली. वरून धोधो कोसळणारा पाऊस आणि गाडीबाहेर डोकावले, तर नजर जाईल तिथपर्यंत केवळ पाणीच दिसत होते. रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने गाडी हलण्याचे नाव घेत नव्हती. त्यामुळे पाऊस थांबला नाही, तर आपले काही खरे नाही, अशी भावना प्रत्येक प्रवाशाच्या मनात आली आणि मग सुरू झाला देवाचा धावा. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आमची मृत्यूच्या दाढेतून सुटका झाली, अशा शब्दांत संदीप भाटलेकर या डहाणूच्या प्रवाशाने शनिवारच्या रात्रीचा थरार ‘लोकमत’शी बोलताना मांडला.

डहाणू येथे राहणारे भाटलेकर कोल्हापूर येथे एका कार्यक्रमासाठी जाण्याकरिता महालक्ष्मीच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करत होते. गाडी सीएसटीएम येथून सुटली, तेव्हा फारसा पाऊस नव्हता. कल्याण सोडले आणि पावसाचा जोर अधिक जाणवत होता, असे ते म्हणाले. अंबरनाथ, बदलापूर परिसरांत तुफान पाऊस सुरू होता. त्यामुळे आमची गाडी अंबरनाथ स्थानकाच्या अलीकडे दोन ते अडीच तास थांबली होती. पावसामुळे रेल्वेमार्गावर पाणी साचले असेल. ओसरले की गाडी सुटेल, असा प्रवाशांचा समज झाला. रात्रही झाली असल्याने प्रवासी झोपले होते.भाटलेकर म्हणाले, साधारण २ च्या सुमारास गाडी सुरू झाली. मी तोपर्यंत जागा होतो. त्यानंतर झोप लागली. गाडीने बदलापूर स्थानक सोडल्यावर ती थांबली. एसी डबा असल्याने बाहेर काय परिस्थिती होती, याचा अंदाजही येत नव्हता. पण, नंतर एसी बंद झाले. पंखे सुरू होते. मला पहाटे साडेपाचच्या सुमारास कोल्हापूरहून मित्राचा फोन आला, तेव्हा आपण कर्जतही पार केले नाही, हे लक्षात आले, आणि डोळ्यांवरची झोप खाडकन उडाली.चार किमी डोंगर उतरेपर्यंत जीवात जीव नव्हताशनिवारी सकाळी ८ च्या दरम्यान पाऊस कमी झाला. एनडीआरएफचे पथक आल्यावर जीवात जीव आला. तोपर्यंत हेलिकॉप्टरही येऊन परिस्थितीची पाहणी करत होते. एनडीआरएफच्या जवानांनी सांगितलेकी, चालत जाण्यासाठी पुरुष प्रवाशांसाठी गाडीपासून समोरील एका हॉटेलपर्यंत दोरी बांधली आहे. त्याला धरून जा, आमचे जवान, स्थानिक नागरिक मदतीसाठी आहेत. साधारण छातीभर पाण्यातून सामान घेतदोरीच्या मदतीने आम्ही चालू लागलो. डोंगर उतरून चामटोली गावात उतरल्यावर, तेथे अधिकारी, पोलीस, एनडीआरएफचे जवान होते. त्यांनी आमच्याकडील बॅगा घेतल्या. यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली.गाडी पुढे का सोडली?: मुसळधार पाऊस पडत होता, तर गाडी अंबरनाथच्या पुढे का नेली? अंबरनाथ किंवा बदलापूर स्थानकात ही गाडी थांबवली असती, तर ही परिस्थिती ओढवली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे