शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी प्रकरणातून आम्ही खूप काही शिकलो- अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 03:00 IST

नेवाळी हिंसाचार प्रकरणात आम्ही कुठे कमी पडलो, असे म्हणण्यापेक्षा आम्ही या प्रकरणातून खूप काही शिकलो, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल, असे प्रतिपादन पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी कल्याणमध्ये केले.

कल्याण : नेवाळी हिंसाचार प्रकरणात आम्ही कुठे कमी पडलो, असे म्हणण्यापेक्षा आम्ही या प्रकरणातून खूप काही शिकलो, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल, असे प्रतिपादन पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी कल्याणमध्ये केले.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे शनिवारी बिर्ला महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या दिलखुलास संवाद कार्यक्रमात दिघावकर प्रमुख वक्तेम्हणून बोलत होते. या वेळी पत्रकारांनी त्यांना वैयक्तिक, शैक्षणिक आणि आतापर्यंत केलेल्या वाटचालीबाबत बोलते केले. पोलीस विभागात गुप्तचर विभाग कार्यरत असतो. परंतु, नेवाळी आंदोलन हिंसक होणार आहे. याची तयारी झाली आहे. त्याची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही. पोलीस या प्रकरणात कुठे कमी पडले का, असे प्रश्न दिघावकरांना या वेळी करण्यात आले. त्यावर प्रत्येक घडणारी घटना काहीना काही शिकवत असते. नेवाळी प्रकरणात आम्ही कुठे कमी पडलो, याचे आम्ही परीक्षण केले आहे. पण, यातून आम्ही खूप काही शिकलो. यामध्ये चौकशीतून जे चुकले आणि ज्यांनी हलगर्जी केली, त्यांच्यावर कारवाईही झाल्याचे दिघावकर म्हणाले.सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कायम त्यांच्या आवडत्या विषयात करिअर करायला हवे. त्यासाठी झपाटून जायला हवे. जेव्हा एखादे ध्येय नजरेसमोर ठेवता, तेव्हा तुम्ही शर्थीचे प्रयत्न केलेच पाहिजेत. ध्येयासाठी झपाटलेली व्यक्तीच इतिहास घडवते, असा विश्वास त्यांनी दिला.आपला जीवनपट उलगडताना दिघावकर पुढे म्हणाले, नाशिकजवळच्या एका छोठ्या गावात माझा जन्म झाला. आमच्या गावात केवळ एक प्राथमिक शाळा होती आणि गावातील लोकांना शेती हाच एकमेव व्यवसाय होता. पण, लहानपणापासूनच मला सरकारी सेवेत जाण्याचा ध्यास होता. तो खरोखर गमतीदार प्रसंग होता. लहानपणी ज्यावेळी मी आकाशात विमान पाहिले होते. मी माझ्या आईला विचारले की, या विमानाचे मालक कोण आहेत? आणि ती सहजतेने म्हणाली की, ‘सरकार’. त्या वेळेपासून मला सरकारचा भाग व्हावेसे वाटू लागले. मी दिवसरात्र अभ्यास केला आणि दहावी शालान्त परीक्षेला बसलो. त्यानंतर, मी २३ किलोमीटर दूर असलेल्या महाविद्यालयात जाऊ लागलो. पण, कधीही खाडा केला नाही, तरीही ८६ टक्के गुण मिळवूनही मला आमच्या गावातील महाविद्यालयात एका गुणासाठी प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला शिक्षण सोडून देऊन शेती करण्याचा सल्ला दिला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी मी पूर्णत: शेती करू लागलो. पण, वडिलांशी पटले नाही. मी माझ्या मनातील शिकण्याच्या छंदाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. मी आईकडून ३५० रु पये घेतले आणी दूरस्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी मी शेतीमध्ये राबत होतोच आणि पदवी घेण्यासाठी रात्री जागून अभ्यासही करत होतो. वयाच्या अठराव्या वर्षी मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यासाठी मला एक हजार २५० रु पये खर्च आला. त्यानंतर, मी पोलीस सेवा परीक्षा दिली. त्याचवेळी १९८७ मध्ये वयाच्या बाविसाव्या वर्षी संरक्षण विभागाचीही परीक्षा दिली. मी सहायक आयुक्तपदावर नियुक्त झालो, असे दिघावकर यांनी सांगितले.अनेकदा नागरिक पोलिसांबाबततक्र ारी करतात, पण ते हे लक्षात घेत नाहीत की, आम्ही आमचे कर्तव्य करत असतो. आम्ही सारा वेळ कुटुंबापासून दूर राहतो आणि सण रस्त्यावर साजरे करतो. आम्ही २४/७ तैनात असतो आणि आमच्या कर्तव्यापेक्षा जास्त काहीच नसते, असे दिघावकर म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत, सूत्रसंचालन निनाद करमरकर आणि आभार अरविंद म्हात्रे यांनी मानले.>१९९३ बॉम्बस्फोट कठीण प्रसंग१९९३ चे बॉम्बस्फोट आठवतात. हा माझ्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंग होता. या स्फोटाच्या तपासकार्यासाठी त्या काळात मी आणि माझे सहकारी सतत १८ तास काम करायचो, असे ते म्हणाले.>संयुक्त राष्ट्रातदिली भाषणे२००० मध्ये मी आयपीएस अधिकारी झालो. मी गावात शाळा बांधली. १० हजार पोलीस शिपायांसाठी रहिवासी वसाहत उभारली आणि संयुक्त राष्ट्रात जाऊन भाषणे दिली. कारण, ते माझे स्वप्न होते, असे दिघावकर म्हणाले.