शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

नेवाळी प्रकरणातून आम्ही खूप काही शिकलो- अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 03:00 IST

नेवाळी हिंसाचार प्रकरणात आम्ही कुठे कमी पडलो, असे म्हणण्यापेक्षा आम्ही या प्रकरणातून खूप काही शिकलो, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल, असे प्रतिपादन पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी कल्याणमध्ये केले.

कल्याण : नेवाळी हिंसाचार प्रकरणात आम्ही कुठे कमी पडलो, असे म्हणण्यापेक्षा आम्ही या प्रकरणातून खूप काही शिकलो, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल, असे प्रतिपादन पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. प्रताप दिघावकर यांनी कल्याणमध्ये केले.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघातर्फे शनिवारी बिर्ला महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या दिलखुलास संवाद कार्यक्रमात दिघावकर प्रमुख वक्तेम्हणून बोलत होते. या वेळी पत्रकारांनी त्यांना वैयक्तिक, शैक्षणिक आणि आतापर्यंत केलेल्या वाटचालीबाबत बोलते केले. पोलीस विभागात गुप्तचर विभाग कार्यरत असतो. परंतु, नेवाळी आंदोलन हिंसक होणार आहे. याची तयारी झाली आहे. त्याची माहिती पोलिसांना कशी मिळाली नाही. पोलीस या प्रकरणात कुठे कमी पडले का, असे प्रश्न दिघावकरांना या वेळी करण्यात आले. त्यावर प्रत्येक घडणारी घटना काहीना काही शिकवत असते. नेवाळी प्रकरणात आम्ही कुठे कमी पडलो, याचे आम्ही परीक्षण केले आहे. पण, यातून आम्ही खूप काही शिकलो. यामध्ये चौकशीतून जे चुकले आणि ज्यांनी हलगर्जी केली, त्यांच्यावर कारवाईही झाल्याचे दिघावकर म्हणाले.सभागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कायम त्यांच्या आवडत्या विषयात करिअर करायला हवे. त्यासाठी झपाटून जायला हवे. जेव्हा एखादे ध्येय नजरेसमोर ठेवता, तेव्हा तुम्ही शर्थीचे प्रयत्न केलेच पाहिजेत. ध्येयासाठी झपाटलेली व्यक्तीच इतिहास घडवते, असा विश्वास त्यांनी दिला.आपला जीवनपट उलगडताना दिघावकर पुढे म्हणाले, नाशिकजवळच्या एका छोठ्या गावात माझा जन्म झाला. आमच्या गावात केवळ एक प्राथमिक शाळा होती आणि गावातील लोकांना शेती हाच एकमेव व्यवसाय होता. पण, लहानपणापासूनच मला सरकारी सेवेत जाण्याचा ध्यास होता. तो खरोखर गमतीदार प्रसंग होता. लहानपणी ज्यावेळी मी आकाशात विमान पाहिले होते. मी माझ्या आईला विचारले की, या विमानाचे मालक कोण आहेत? आणि ती सहजतेने म्हणाली की, ‘सरकार’. त्या वेळेपासून मला सरकारचा भाग व्हावेसे वाटू लागले. मी दिवसरात्र अभ्यास केला आणि दहावी शालान्त परीक्षेला बसलो. त्यानंतर, मी २३ किलोमीटर दूर असलेल्या महाविद्यालयात जाऊ लागलो. पण, कधीही खाडा केला नाही, तरीही ८६ टक्के गुण मिळवूनही मला आमच्या गावातील महाविद्यालयात एका गुणासाठी प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला शिक्षण सोडून देऊन शेती करण्याचा सल्ला दिला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी मी पूर्णत: शेती करू लागलो. पण, वडिलांशी पटले नाही. मी माझ्या मनातील शिकण्याच्या छंदाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले. मी आईकडून ३५० रु पये घेतले आणी दूरस्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी मी शेतीमध्ये राबत होतोच आणि पदवी घेण्यासाठी रात्री जागून अभ्यासही करत होतो. वयाच्या अठराव्या वर्षी मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यासाठी मला एक हजार २५० रु पये खर्च आला. त्यानंतर, मी पोलीस सेवा परीक्षा दिली. त्याचवेळी १९८७ मध्ये वयाच्या बाविसाव्या वर्षी संरक्षण विभागाचीही परीक्षा दिली. मी सहायक आयुक्तपदावर नियुक्त झालो, असे दिघावकर यांनी सांगितले.अनेकदा नागरिक पोलिसांबाबततक्र ारी करतात, पण ते हे लक्षात घेत नाहीत की, आम्ही आमचे कर्तव्य करत असतो. आम्ही सारा वेळ कुटुंबापासून दूर राहतो आणि सण रस्त्यावर साजरे करतो. आम्ही २४/७ तैनात असतो आणि आमच्या कर्तव्यापेक्षा जास्त काहीच नसते, असे दिघावकर म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत, सूत्रसंचालन निनाद करमरकर आणि आभार अरविंद म्हात्रे यांनी मानले.>१९९३ बॉम्बस्फोट कठीण प्रसंग१९९३ चे बॉम्बस्फोट आठवतात. हा माझ्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंग होता. या स्फोटाच्या तपासकार्यासाठी त्या काळात मी आणि माझे सहकारी सतत १८ तास काम करायचो, असे ते म्हणाले.>संयुक्त राष्ट्रातदिली भाषणे२००० मध्ये मी आयपीएस अधिकारी झालो. मी गावात शाळा बांधली. १० हजार पोलीस शिपायांसाठी रहिवासी वसाहत उभारली आणि संयुक्त राष्ट्रात जाऊन भाषणे दिली. कारण, ते माझे स्वप्न होते, असे दिघावकर म्हणाले.