शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

...आम्हाला ईडीची भीती - रामदास फुटाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 01:52 IST

कोणताही पक्ष हा धुतल्या तांदळासारखा नाही. काँग्रेसचे उतारे आता भाजपमध्ये आले आहेत. प्रत्येकाला आपल्या संपत्तीच्या चौकशीची भीती आहे.

ठाणे : कोणताही पक्ष हा धुतल्या तांदळासारखा नाही. काँग्रेसचे उतारे आता भाजपमध्ये आले आहेत. प्रत्येकाला आपल्या संपत्तीच्या चौकशीची भीती आहे. ‘शूर आम्ही आमदार आम्हाला फक्त ईडीची भीती’ असे विडंबन काव्य विडंबनकार रामदास फुटाणे यांनी मंगळवारी सादर केले.आत्रेय आयोजित साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त फुटाणे यांना आचार्य अत्रे मानचिन्हाने गौरविण्यात आले. गडकरी रंगायतनमध्ये मंगळवारी हा सोहळा पार पडला. यावेळी फुटाणे म्हणाले की, आज परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की, आज अत्रे असते तर सर्वांना झोडपले असते. आज त्यांच्या लेखणीची गरज होती, पुन्हा एकदा मराठ्याची गरज होती. देशात अस्थिरता असून हिंसाचार वाढला आहे.प्रत्येक पक्षातील तरुण पिढी हिंसक झाली आहे, उद्या निवडणुकीत काय घडेल हे सांगता येत नाही. कारण माणसातले जनावर जागे झाले आहे आणि हे पशुत्व वाढवण्यात प्रत्येक पक्षाचा हात आहे. हल्ली कोण कोणत्या पक्षाचा आहे हे राजकारणात असूनही मला कळत नाही. काही सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतात. सगळ््या पक्षातल्या लोकांची भूक सारखीच आहे. देशातील अस्थिरतेमुळे जात, धर्म मजबूत झाले आहेत. आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अंबानीच्या मुलाच्या लग्नाला होणा-या खर्चाचे आकडे मोजण्यासाठीच आपण जन्माला आलो की काय असे वाटत आहे. या लोकांना झोडपणार कोण म्हणून अत्रेंची आठवण होते. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर स्वप्न विकणाऱ्यांची गर्दी झाली आहे. निर्भय पत्रकारितेची गरज असताना वृत्तपत्र, चॅनेलमध्ये कोणता संपादक ठेवायचा हे फक्त दोनच लोक ठरवतात.अत्रे यांनी ओघवत्या मराठी भाषा शैलीत लेखन केल्याचे नमूद करुन फुटाणे म्हणाले की, साहित्यिकांचीच मुले मराठीपासून दूर चालली आहेत. साहित्यिकांचीच मुले मराठी वाचत नाहीत. मराठीची अवस्था वाईट झाली असून मराठीचा पुन्हा जागर करण्यासाठी साहित्यिकांनी एकत्र येण्याची गरज आहे.ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आणि मधुकर भावे यांनी अत्रेंच्या आठवणी सांगितल्या. यावेळी आ. प्रताप सरनाईक, अत्रेंच्या कन्या मीना देशपांडे, अत्रेंचे नातू राजेंद्र पै, प्रकाशक अशोक मुळ््ये उपस्थित होते. यावेळी आचार्य अत्रे लिखित ‘हंशा आणि टाळ््या’, ‘आमदार अत्रे’, ‘अत्रे वेद अत्रे विचार’, ‘अत्रे वंदन’, शिरीष पै लिखित ‘माझे नाव हायकू’ आणि मीना देशपांडे लिखित ‘अश्रूंचे नाते’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण