शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

...आम्हाला ईडीची भीती - रामदास फुटाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 01:52 IST

कोणताही पक्ष हा धुतल्या तांदळासारखा नाही. काँग्रेसचे उतारे आता भाजपमध्ये आले आहेत. प्रत्येकाला आपल्या संपत्तीच्या चौकशीची भीती आहे.

ठाणे : कोणताही पक्ष हा धुतल्या तांदळासारखा नाही. काँग्रेसचे उतारे आता भाजपमध्ये आले आहेत. प्रत्येकाला आपल्या संपत्तीच्या चौकशीची भीती आहे. ‘शूर आम्ही आमदार आम्हाला फक्त ईडीची भीती’ असे विडंबन काव्य विडंबनकार रामदास फुटाणे यांनी मंगळवारी सादर केले.आत्रेय आयोजित साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त फुटाणे यांना आचार्य अत्रे मानचिन्हाने गौरविण्यात आले. गडकरी रंगायतनमध्ये मंगळवारी हा सोहळा पार पडला. यावेळी फुटाणे म्हणाले की, आज परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की, आज अत्रे असते तर सर्वांना झोडपले असते. आज त्यांच्या लेखणीची गरज होती, पुन्हा एकदा मराठ्याची गरज होती. देशात अस्थिरता असून हिंसाचार वाढला आहे.प्रत्येक पक्षातील तरुण पिढी हिंसक झाली आहे, उद्या निवडणुकीत काय घडेल हे सांगता येत नाही. कारण माणसातले जनावर जागे झाले आहे आणि हे पशुत्व वाढवण्यात प्रत्येक पक्षाचा हात आहे. हल्ली कोण कोणत्या पक्षाचा आहे हे राजकारणात असूनही मला कळत नाही. काही सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतात. सगळ््या पक्षातल्या लोकांची भूक सारखीच आहे. देशातील अस्थिरतेमुळे जात, धर्म मजबूत झाले आहेत. आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अंबानीच्या मुलाच्या लग्नाला होणा-या खर्चाचे आकडे मोजण्यासाठीच आपण जन्माला आलो की काय असे वाटत आहे. या लोकांना झोडपणार कोण म्हणून अत्रेंची आठवण होते. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर स्वप्न विकणाऱ्यांची गर्दी झाली आहे. निर्भय पत्रकारितेची गरज असताना वृत्तपत्र, चॅनेलमध्ये कोणता संपादक ठेवायचा हे फक्त दोनच लोक ठरवतात.अत्रे यांनी ओघवत्या मराठी भाषा शैलीत लेखन केल्याचे नमूद करुन फुटाणे म्हणाले की, साहित्यिकांचीच मुले मराठीपासून दूर चालली आहेत. साहित्यिकांचीच मुले मराठी वाचत नाहीत. मराठीची अवस्था वाईट झाली असून मराठीचा पुन्हा जागर करण्यासाठी साहित्यिकांनी एकत्र येण्याची गरज आहे.ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आणि मधुकर भावे यांनी अत्रेंच्या आठवणी सांगितल्या. यावेळी आ. प्रताप सरनाईक, अत्रेंच्या कन्या मीना देशपांडे, अत्रेंचे नातू राजेंद्र पै, प्रकाशक अशोक मुळ््ये उपस्थित होते. यावेळी आचार्य अत्रे लिखित ‘हंशा आणि टाळ््या’, ‘आमदार अत्रे’, ‘अत्रे वेद अत्रे विचार’, ‘अत्रे वंदन’, शिरीष पै लिखित ‘माझे नाव हायकू’ आणि मीना देशपांडे लिखित ‘अश्रूंचे नाते’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. 

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारण