शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही मानत नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:45 IST

कोमसापतर्फे ठाण्यात रंगला वार्षिक पुरस्कार सोहळा, डॉ. अनंत देशमुख यांचा गौरव

ठाणे : आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेला (मसाप) मुळात मानतच नाही. जिथे भारताची घटना बदलली तिथे मसापची कालबाह्य झालेली १९०५ ची जुनी घटना कोण मानणार? आजची पिढी या कालबाह्य झालेल्या घटना मानणार नाही, ते स्वत:चे स्थान स्वत: निर्माण करणार आणि ते तुम्हाला मान्य करायला लावणार, असे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मसापला दिले.कोमसापतर्फे रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालयात वार्षिक वाड्.मयीन आणि वाड्.मयेतर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोलत होते. ते म्हणाले की, कोमसापमधून चांगले कवी, लेखक निर्माण होत आहेत. आम्हाला कोणाची मान्यता असो वा नसो आम्ही आमचे काम सुरूच ठेवणार आहोत. महाराष्ट्रात शंभर वर्षे पूर्ण झालेल्या साहित्य परिषदा आहेत. त्यांना जिथे केशवसुतांचा जन्म झाला अशा त्यांच्या मालगुंड या जन्मस्थानी जाऊन दर्शन घेण्याची बुद्धी झालेली नाही. मुळात साहित्याला पर्यायच नाही. जगातील कुरूपता निर्माण करण्याचे काम साहित्यिकच करू शकतो, कारण तो सौंदर्यवादी असतो. मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून का मागावी, तसे मागणे म्हणजे ती भाषा अभिजात नाही असे कबूल करणे. पण मराठी भाषा ही अभिजातच आहे. ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा निर्माण झाले तेथील भाषा अभिजात नाही का? महाराष्ट्र सरकारचे हजारो कोटींचे बजेट असताना मराठी भाषेसाठी ५०० कोटी काढता येत नाही का? अभिजात भाषेसाठी केंद्र सरकारकडे का जावे, तिथे ठामपणे सांगितले पाहिजे. आमची भाषा अभिजातच आहे. मराठी भाषेसाठी नियम झाला पाहिजे, पहिली पासून मराठी भाषा अनिवार्य झाली पाहिजे. मंत्रालयात सनदी अधिकारी, सल्लागार, सहसल्लागार, मुख्य सल्लागार, आयुक्त त्यातील ८० टक्के अधिकारी हे परप्रांतीय असताना ते उत्तम मराठी बोलतात कारण महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा कायदा आहे. मग उर्वरित मराठी अधिकारी आपली मातृभाषा का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.दरम्यान, ज्येष्ठ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल कोकण साहित्य भूषण पुरस्काराने तर निद्रानाश या कवितासंग्रहासाठी डॉ. महेश केळुस्कर यांना कविता राजधानी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, कोकणातील साहित्यिकांना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्.मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक-एकांकिका, दृकश्राव्य - कला - सिनेमाया साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले गेले. यावेळी नमिता कीर, रेखा नार्वेकर, अशोक ठाकूर, न्या. भास्कर शेट्ये, अरुण नेरुरकर, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते.नाटककाराला साहित्यिक न मानण्याची चूक - प्रेमानंद गज्वीनाटककाराला साहित्यिक न समजण्याची चूक आपल्याकडे वर्षानुवर्षे होत आहे, अशी खंत व्यक्त करीत साहित्य व नाट्यसंमेलन ही एकत्र व्हावीत अशी अपेक्षा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली. ही संमेलने एकत्र झाल्यास ती तीन दिवसांऐवजी पाच दिवसांची करावी, यामुळे मंडपाचा खर्चही वाचेल. संमेलनात असुविधा असतील तर ते पाहण्याचे काम संमेलनाच्या अध्यक्षाचे नसून महापालिकेचे आहे असेही ते म्हणाले. अ. भा. मराठी साहित्य परिषदेची मध्यवर्ती शाखेने कोमसापला समाविष्ट करून घ्यावे. जर घटना बदलली जाते, मग कोमसापला समाविष्ट का करून घेतले जात नाही? कोकण हा महाराष्ट्राचा भाग नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. आपल्याकडे साहित्याचे अनेक प्रकार आहेत. पण मी मनोरंजन, प्रयोगशील आणि बोधी हे तीनच प्रकार मानतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्य