शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

'महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही मानत नाही'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:45 IST

कोमसापतर्फे ठाण्यात रंगला वार्षिक पुरस्कार सोहळा, डॉ. अनंत देशमुख यांचा गौरव

ठाणे : आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेला (मसाप) मुळात मानतच नाही. जिथे भारताची घटना बदलली तिथे मसापची कालबाह्य झालेली १९०५ ची जुनी घटना कोण मानणार? आजची पिढी या कालबाह्य झालेल्या घटना मानणार नाही, ते स्वत:चे स्थान स्वत: निर्माण करणार आणि ते तुम्हाला मान्य करायला लावणार, असे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मसापला दिले.कोमसापतर्फे रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालयात वार्षिक वाड्.मयीन आणि वाड्.मयेतर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक बोलत होते. ते म्हणाले की, कोमसापमधून चांगले कवी, लेखक निर्माण होत आहेत. आम्हाला कोणाची मान्यता असो वा नसो आम्ही आमचे काम सुरूच ठेवणार आहोत. महाराष्ट्रात शंभर वर्षे पूर्ण झालेल्या साहित्य परिषदा आहेत. त्यांना जिथे केशवसुतांचा जन्म झाला अशा त्यांच्या मालगुंड या जन्मस्थानी जाऊन दर्शन घेण्याची बुद्धी झालेली नाही. मुळात साहित्याला पर्यायच नाही. जगातील कुरूपता निर्माण करण्याचे काम साहित्यिकच करू शकतो, कारण तो सौंदर्यवादी असतो. मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून का मागावी, तसे मागणे म्हणजे ती भाषा अभिजात नाही असे कबूल करणे. पण मराठी भाषा ही अभिजातच आहे. ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा निर्माण झाले तेथील भाषा अभिजात नाही का? महाराष्ट्र सरकारचे हजारो कोटींचे बजेट असताना मराठी भाषेसाठी ५०० कोटी काढता येत नाही का? अभिजात भाषेसाठी केंद्र सरकारकडे का जावे, तिथे ठामपणे सांगितले पाहिजे. आमची भाषा अभिजातच आहे. मराठी भाषेसाठी नियम झाला पाहिजे, पहिली पासून मराठी भाषा अनिवार्य झाली पाहिजे. मंत्रालयात सनदी अधिकारी, सल्लागार, सहसल्लागार, मुख्य सल्लागार, आयुक्त त्यातील ८० टक्के अधिकारी हे परप्रांतीय असताना ते उत्तम मराठी बोलतात कारण महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा कायदा आहे. मग उर्वरित मराठी अधिकारी आपली मातृभाषा का बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी केला.दरम्यान, ज्येष्ठ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल कोकण साहित्य भूषण पुरस्काराने तर निद्रानाश या कवितासंग्रहासाठी डॉ. महेश केळुस्कर यांना कविता राजधानी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, कोकणातील साहित्यिकांना कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाड्.मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक-एकांकिका, दृकश्राव्य - कला - सिनेमाया साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले गेले. यावेळी नमिता कीर, रेखा नार्वेकर, अशोक ठाकूर, न्या. भास्कर शेट्ये, अरुण नेरुरकर, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते.नाटककाराला साहित्यिक न मानण्याची चूक - प्रेमानंद गज्वीनाटककाराला साहित्यिक न समजण्याची चूक आपल्याकडे वर्षानुवर्षे होत आहे, अशी खंत व्यक्त करीत साहित्य व नाट्यसंमेलन ही एकत्र व्हावीत अशी अपेक्षा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केली. ही संमेलने एकत्र झाल्यास ती तीन दिवसांऐवजी पाच दिवसांची करावी, यामुळे मंडपाचा खर्चही वाचेल. संमेलनात असुविधा असतील तर ते पाहण्याचे काम संमेलनाच्या अध्यक्षाचे नसून महापालिकेचे आहे असेही ते म्हणाले. अ. भा. मराठी साहित्य परिषदेची मध्यवर्ती शाखेने कोमसापला समाविष्ट करून घ्यावे. जर घटना बदलली जाते, मग कोमसापला समाविष्ट का करून घेतले जात नाही? कोकण हा महाराष्ट्राचा भाग नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. आपल्याकडे साहित्याचे अनेक प्रकार आहेत. पण मी मनोरंजन, प्रयोगशील आणि बोधी हे तीनच प्रकार मानतो, असे ते म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्य