शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रस्ता रुंदीकरणामुळे संसार येणार रस्त्यावर , गवळी कुटुंब धास्तावले, बेताची परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:54 IST

भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणाºया भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. भुयारी मार्गाचे स्वप्न एकीकडे पूर्ण होत असताना येथील गवळी कुटुंबाचे मात्र ग्रामपंचायतीच्या काळापासून असलेले घर उद्ध्वस्त होणार, या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. गवळी कुटुंबाची तिसरी पिढी येथे राहत आहे.

- धीरज परबमीरा रोड : भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. भुयारी मार्गाचे स्वप्न एकीकडे पूर्ण होत असताना येथील गवळी कुटुंबाचे मात्र ग्रामपंचायतीच्या काळापासून असलेले घर उद्ध्वस्त होणार, या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. गवळी कुटुंबाची तिसरी पिढी येथे राहत आहे. तीन वर्षांपासून पक्षाघातामुळे पती अंथरुणाला खिळलेले, मुलगी दहावीला, तर धुणीभांडी करून कसेबसे घर चालवणा-या कमल गवळी यांचे राहते घर गेले, तर संसार रस्त्यावर येणार या कल्पनेने त्या हादरून गेल्या आहेत.जेसल पार्क ते भार्इंदर एसटी स्थानक असा रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग बनवण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. पण, कधी तांत्रिक तर कधी आर्थिक वा कधी लालफितीच्या कारभारात अडकलेला हा मार्ग पूर्ण झाला. भार्इंदर स्थानकासमोरील नारायण भुवन हॉटेल व जवळ बांधकाम असलेल्या वळणावर रस्ता अरुंद तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारा असल्याने तेथे पालिकेने कारवाई करून रुंदीकरण केले. हॉटेलचा पुढील भाग तोडण्यासाठी पालिकेने हेमंत शाह यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. स्वत: शाह यांनीही सहकार्य दाखवले आहे.या ठिकाणी वळणावरच ५६ वर्षीय वसंत गवळी कुटुंबीयांचे छोटेसे घर आहे. वसंत यांचे आजोबा रामचंद्र गवळी यांना २२ मार्च १९२२ रोजी तत्कालीन भार्इंदर ग्रामपंचायतीने गटई कामासाठी या ठिकाणी मंजुरी दिली होती. तशी नकाशाची प्रत आहे. ४ सप्टेंबर १९५६ रोजी ग्रामपंचायतीने दिलेल्या दाखल्यातदेखील गवळी यांचे राहते झोपडे व गटई कामाचा उल्लेख आहे. २ मार्च १९७८ रोजी तत्कालीन पोलीस पाटील यांनीही गवळी कुटुंबीयांच्या वास्तव्याबद्दलचा उल्लेख पत्रात केला होता. १९७७ पासूनच्या गवळी यांच्या नावे असलेल्या वीजदेयकांच्या प्रतीसुद्धा आहेत.२ जानेवारी १९९९ रोजी तत्कालीन नगरपालिका असताना भार्इंदर रेल्वे स्थानकासमोरील रुंदीकरणादरम्यान गवळी यांचे गटईकामाचे दुकान व घराचा भाग पाडला. त्यावेळीदेखील त्यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले. परंतु, आजतागायत त्यांना कुठलाही मोबदला वा पुनर्वसन झालेले नाही.गवळी ३ वर्षांपासून पक्षाघाताच्या दुस-या झटक्याने अंथरुणाला खिळले आहेत. मुलगी हेमलता ही भार्इंदर सेकंडरी शाळेत दहावीत शिकत आहे. पतीच्या औषधांचा, घर व मुलीचा खर्च भागवण्यातच त्यांची पत्नी कमल यांची दमछाक होत आहे. धुणीभांडी करून त्या संसाराचा गाडा हाकत आहेत. पालिकेकडून अद्याप कोणते पत्र, नोटीस आली नसली, तरी चाललेल्या घडामोडींमुळे कमल व मुलगी हेमलताचा जीव टांगणीला लागला आहे.गवळी कुटुंबीयांकडील कागदपत्रे तपासून त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.- डॉ. नरेश गीते, आयुक्तगवळी कुटुंबीयांची तिसरी पिढी येथे राहत आहे. त्यांची परिस्थिती बिकट असली, तरी महापालिकेच्या विकासकामांत सहकार्य करण्यास त्यांनी पुढाकार घेतला, हे महत्त्वाचे आहे. त्यांना पर्यायी घर दिले जाईल.- चंद्रकांत वैती, उपमहापौरगवळी कुटुंबाचे पुनर्वसन आधी करायला आपण पालिकेला सांगणार आहोत. त्यांचा संसार रस्त्यावर येऊ देणार नाही.- हेमंत शाह, जमीनमालक