शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणामुळे संसार येणार रस्त्यावर , गवळी कुटुंब धास्तावले, बेताची परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:54 IST

भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणाºया भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. भुयारी मार्गाचे स्वप्न एकीकडे पूर्ण होत असताना येथील गवळी कुटुंबाचे मात्र ग्रामपंचायतीच्या काळापासून असलेले घर उद्ध्वस्त होणार, या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. गवळी कुटुंबाची तिसरी पिढी येथे राहत आहे.

- धीरज परबमीरा रोड : भार्इंदर पूर्व-पश्चिम जोडणा-या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. भुयारी मार्गाचे स्वप्न एकीकडे पूर्ण होत असताना येथील गवळी कुटुंबाचे मात्र ग्रामपंचायतीच्या काळापासून असलेले घर उद्ध्वस्त होणार, या भीतीने त्यांची झोप उडाली आहे. गवळी कुटुंबाची तिसरी पिढी येथे राहत आहे. तीन वर्षांपासून पक्षाघातामुळे पती अंथरुणाला खिळलेले, मुलगी दहावीला, तर धुणीभांडी करून कसेबसे घर चालवणा-या कमल गवळी यांचे राहते घर गेले, तर संसार रस्त्यावर येणार या कल्पनेने त्या हादरून गेल्या आहेत.जेसल पार्क ते भार्इंदर एसटी स्थानक असा रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग बनवण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. पण, कधी तांत्रिक तर कधी आर्थिक वा कधी लालफितीच्या कारभारात अडकलेला हा मार्ग पूर्ण झाला. भार्इंदर स्थानकासमोरील नारायण भुवन हॉटेल व जवळ बांधकाम असलेल्या वळणावर रस्ता अरुंद तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारा असल्याने तेथे पालिकेने कारवाई करून रुंदीकरण केले. हॉटेलचा पुढील भाग तोडण्यासाठी पालिकेने हेमंत शाह यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. स्वत: शाह यांनीही सहकार्य दाखवले आहे.या ठिकाणी वळणावरच ५६ वर्षीय वसंत गवळी कुटुंबीयांचे छोटेसे घर आहे. वसंत यांचे आजोबा रामचंद्र गवळी यांना २२ मार्च १९२२ रोजी तत्कालीन भार्इंदर ग्रामपंचायतीने गटई कामासाठी या ठिकाणी मंजुरी दिली होती. तशी नकाशाची प्रत आहे. ४ सप्टेंबर १९५६ रोजी ग्रामपंचायतीने दिलेल्या दाखल्यातदेखील गवळी यांचे राहते झोपडे व गटई कामाचा उल्लेख आहे. २ मार्च १९७८ रोजी तत्कालीन पोलीस पाटील यांनीही गवळी कुटुंबीयांच्या वास्तव्याबद्दलचा उल्लेख पत्रात केला होता. १९७७ पासूनच्या गवळी यांच्या नावे असलेल्या वीजदेयकांच्या प्रतीसुद्धा आहेत.२ जानेवारी १९९९ रोजी तत्कालीन नगरपालिका असताना भार्इंदर रेल्वे स्थानकासमोरील रुंदीकरणादरम्यान गवळी यांचे गटईकामाचे दुकान व घराचा भाग पाडला. त्यावेळीदेखील त्यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन दिले. परंतु, आजतागायत त्यांना कुठलाही मोबदला वा पुनर्वसन झालेले नाही.गवळी ३ वर्षांपासून पक्षाघाताच्या दुस-या झटक्याने अंथरुणाला खिळले आहेत. मुलगी हेमलता ही भार्इंदर सेकंडरी शाळेत दहावीत शिकत आहे. पतीच्या औषधांचा, घर व मुलीचा खर्च भागवण्यातच त्यांची पत्नी कमल यांची दमछाक होत आहे. धुणीभांडी करून त्या संसाराचा गाडा हाकत आहेत. पालिकेकडून अद्याप कोणते पत्र, नोटीस आली नसली, तरी चाललेल्या घडामोडींमुळे कमल व मुलगी हेमलताचा जीव टांगणीला लागला आहे.गवळी कुटुंबीयांकडील कागदपत्रे तपासून त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही.- डॉ. नरेश गीते, आयुक्तगवळी कुटुंबीयांची तिसरी पिढी येथे राहत आहे. त्यांची परिस्थिती बिकट असली, तरी महापालिकेच्या विकासकामांत सहकार्य करण्यास त्यांनी पुढाकार घेतला, हे महत्त्वाचे आहे. त्यांना पर्यायी घर दिले जाईल.- चंद्रकांत वैती, उपमहापौरगवळी कुटुंबाचे पुनर्वसन आधी करायला आपण पालिकेला सांगणार आहोत. त्यांचा संसार रस्त्यावर येऊ देणार नाही.- हेमंत शाह, जमीनमालक