शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

वाकण-खोपोली रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:13 IST

वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे

पाली : वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ओव्हरलोड व अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. तेव्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देवून ओव्हरलोड वाहतूक करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होतआहे.या मार्गावरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच या खड्डेमय मार्गावरून दररोज प्रवास करणाºया दुचाकीस्वारांना कंबरेचे व मणक्याचे आजार होत आहेत. मात्र या सर्व गंभीर बाबींकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरती पाली व जांभूळपाडा येथे ब्रिटिशकालीन दोन पूल आहेत.या पुलांची भारवहनक्षमता फक्त १९ टन इतकीच असून आजघडीला येथून ५० ते ६० टन भारवहनक्षमतेच्या वाहनांची अवजड वाहतूक होत आहे. त्यामुळे या पुलाला धोका असून पुन्हा एकदा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.नेरळ : कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या नेरळ - कळंब जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना याच मार्गावरील नेरळ साईमंदिर परिसरातही रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच रस्ताही खचला आहे, परंतु याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.नेरळ-कळंब या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरूच असते, या रस्त्यावरील साईमंदिर परिसरात मागील वर्षी रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहाय्याने पाणी जाण्यासाठी नाल्या काढण्यात आल्या होत्या, परंतु यावर्षी पाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याने सर्व पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.याच रस्त्यावर पुढे काही भाग खचला आहे. त्याठिकाणी मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहे. परंतु येथून भरधाव वेगाने जाणाºया वाहनचालकांना हा खड्डा न दिसल्यास रात्रीच्या वेळी येथे अपघात घडू शकतो. त्यामुळे हा खचलेला रस्ता चांगल्या दर्जाचा कधी करणार असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना पडला आहे.या वाहतुकीमुळे अपघातात वाढसुप्रीम, जिंदाल, जेएसडब्लू या कंपनीच्या मालाची अवजड वाहतूक व वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक या मार्गावरून राजरोसपणे होत असल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक करताना त्या वाहनामधील माल रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे दुचाकी वाहने सरकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.