शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

वाकण-खोपोली रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:13 IST

वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे

पाली : वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ओव्हरलोड व अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. तेव्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देवून ओव्हरलोड वाहतूक करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होतआहे.या मार्गावरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच या खड्डेमय मार्गावरून दररोज प्रवास करणाºया दुचाकीस्वारांना कंबरेचे व मणक्याचे आजार होत आहेत. मात्र या सर्व गंभीर बाबींकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरती पाली व जांभूळपाडा येथे ब्रिटिशकालीन दोन पूल आहेत.या पुलांची भारवहनक्षमता फक्त १९ टन इतकीच असून आजघडीला येथून ५० ते ६० टन भारवहनक्षमतेच्या वाहनांची अवजड वाहतूक होत आहे. त्यामुळे या पुलाला धोका असून पुन्हा एकदा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.नेरळ : कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या नेरळ - कळंब जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना याच मार्गावरील नेरळ साईमंदिर परिसरातही रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच रस्ताही खचला आहे, परंतु याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.नेरळ-कळंब या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरूच असते, या रस्त्यावरील साईमंदिर परिसरात मागील वर्षी रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहाय्याने पाणी जाण्यासाठी नाल्या काढण्यात आल्या होत्या, परंतु यावर्षी पाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याने सर्व पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.याच रस्त्यावर पुढे काही भाग खचला आहे. त्याठिकाणी मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहे. परंतु येथून भरधाव वेगाने जाणाºया वाहनचालकांना हा खड्डा न दिसल्यास रात्रीच्या वेळी येथे अपघात घडू शकतो. त्यामुळे हा खचलेला रस्ता चांगल्या दर्जाचा कधी करणार असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना पडला आहे.या वाहतुकीमुळे अपघातात वाढसुप्रीम, जिंदाल, जेएसडब्लू या कंपनीच्या मालाची अवजड वाहतूक व वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक या मार्गावरून राजरोसपणे होत असल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक करताना त्या वाहनामधील माल रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे दुचाकी वाहने सरकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.