शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

वाकण-खोपोली रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:13 IST

वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे

पाली : वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ओव्हरलोड व अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. तेव्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देवून ओव्हरलोड वाहतूक करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होतआहे.या मार्गावरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच या खड्डेमय मार्गावरून दररोज प्रवास करणाºया दुचाकीस्वारांना कंबरेचे व मणक्याचे आजार होत आहेत. मात्र या सर्व गंभीर बाबींकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरती पाली व जांभूळपाडा येथे ब्रिटिशकालीन दोन पूल आहेत.या पुलांची भारवहनक्षमता फक्त १९ टन इतकीच असून आजघडीला येथून ५० ते ६० टन भारवहनक्षमतेच्या वाहनांची अवजड वाहतूक होत आहे. त्यामुळे या पुलाला धोका असून पुन्हा एकदा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.नेरळ : कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या नेरळ - कळंब जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना याच मार्गावरील नेरळ साईमंदिर परिसरातही रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच रस्ताही खचला आहे, परंतु याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.नेरळ-कळंब या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरूच असते, या रस्त्यावरील साईमंदिर परिसरात मागील वर्षी रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहाय्याने पाणी जाण्यासाठी नाल्या काढण्यात आल्या होत्या, परंतु यावर्षी पाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याने सर्व पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.याच रस्त्यावर पुढे काही भाग खचला आहे. त्याठिकाणी मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहे. परंतु येथून भरधाव वेगाने जाणाºया वाहनचालकांना हा खड्डा न दिसल्यास रात्रीच्या वेळी येथे अपघात घडू शकतो. त्यामुळे हा खचलेला रस्ता चांगल्या दर्जाचा कधी करणार असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना पडला आहे.या वाहतुकीमुळे अपघातात वाढसुप्रीम, जिंदाल, जेएसडब्लू या कंपनीच्या मालाची अवजड वाहतूक व वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक या मार्गावरून राजरोसपणे होत असल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक करताना त्या वाहनामधील माल रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे दुचाकी वाहने सरकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.