शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष

By पंकज पाटील | Updated: May 17, 2023 16:35 IST

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे.

बदलापूर: बदलापुरात उल्हास नदी पूर्णपणे प्रदूषित झाले असून आता या नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला आहे. महिन्याभरापूर्वी काही प्रमाणातच ही जलपर्णी नदीत होती. मात्र आता जलपर्णीने संपूर्ण उल्हास नदी ताब्यात घेतली आहे. जलपर्णीच्या या वाढता विस्तारामुळे नदीच्या प्रदूषणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे. बदलापुरातील सर्व नाले थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याने या वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णीचा विस्तार देखील वाढला आहे. जलपर्णीवर योग्य उपाययोजना केले जात नसल्याने आता संपूर्ण उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे. वालीवली गावाजवळील नदीवर जलपर्णीची हिरवी शाळ पांघरली गेली आहे. या जलपर्णीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

जलपदीचा विस्तार उल्हास नदीत केवळ बदलापूर शहरापूर्ती नसून हीच परिस्थिती अंबरनाथ ग्रामीण भागात देखील निर्माण झाली आहे. आपटी, रायता नदीपात्रात देखील जलपर्णीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हीच परिस्थिती रायता पूल ते शहाड पर्यंत निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने औषध फवारणी करून ही जलपर्णी नष्ट केली होती मात्र यंदाच्या वर्षी अशा कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरriverनदीthaneठाणे