शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष

By पंकज पाटील | Updated: May 17, 2023 16:35 IST

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे.

बदलापूर: बदलापुरात उल्हास नदी पूर्णपणे प्रदूषित झाले असून आता या नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला आहे. महिन्याभरापूर्वी काही प्रमाणातच ही जलपर्णी नदीत होती. मात्र आता जलपर्णीने संपूर्ण उल्हास नदी ताब्यात घेतली आहे. जलपर्णीच्या या वाढता विस्तारामुळे नदीच्या प्रदूषणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे. बदलापुरातील सर्व नाले थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याने या वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णीचा विस्तार देखील वाढला आहे. जलपर्णीवर योग्य उपाययोजना केले जात नसल्याने आता संपूर्ण उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे. वालीवली गावाजवळील नदीवर जलपर्णीची हिरवी शाळ पांघरली गेली आहे. या जलपर्णीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

जलपदीचा विस्तार उल्हास नदीत केवळ बदलापूर शहरापूर्ती नसून हीच परिस्थिती अंबरनाथ ग्रामीण भागात देखील निर्माण झाली आहे. आपटी, रायता नदीपात्रात देखील जलपर्णीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हीच परिस्थिती रायता पूल ते शहाड पर्यंत निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने औषध फवारणी करून ही जलपर्णी नष्ट केली होती मात्र यंदाच्या वर्षी अशा कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरriverनदीthaneठाणे