शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष

By पंकज पाटील | Updated: May 17, 2023 16:35 IST

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे.

बदलापूर: बदलापुरात उल्हास नदी पूर्णपणे प्रदूषित झाले असून आता या नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला आहे. महिन्याभरापूर्वी काही प्रमाणातच ही जलपर्णी नदीत होती. मात्र आता जलपर्णीने संपूर्ण उल्हास नदी ताब्यात घेतली आहे. जलपर्णीच्या या वाढता विस्तारामुळे नदीच्या प्रदूषणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे. बदलापुरातील सर्व नाले थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याने या वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णीचा विस्तार देखील वाढला आहे. जलपर्णीवर योग्य उपाययोजना केले जात नसल्याने आता संपूर्ण उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे. वालीवली गावाजवळील नदीवर जलपर्णीची हिरवी शाळ पांघरली गेली आहे. या जलपर्णीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

जलपदीचा विस्तार उल्हास नदीत केवळ बदलापूर शहरापूर्ती नसून हीच परिस्थिती अंबरनाथ ग्रामीण भागात देखील निर्माण झाली आहे. आपटी, रायता नदीपात्रात देखील जलपर्णीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हीच परिस्थिती रायता पूल ते शहाड पर्यंत निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने औषध फवारणी करून ही जलपर्णी नष्ट केली होती मात्र यंदाच्या वर्षी अशा कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरriverनदीthaneठाणे