शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

उल्हास नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला; जिल्हा प्रशासनाचे उल्हास नदीकडे दुर्लक्ष

By पंकज पाटील | Updated: May 17, 2023 16:35 IST

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे.

बदलापूर: बदलापुरात उल्हास नदी पूर्णपणे प्रदूषित झाले असून आता या नदीत जलपर्णीचा विस्तार वाढला आहे. महिन्याभरापूर्वी काही प्रमाणातच ही जलपर्णी नदीत होती. मात्र आता जलपर्णीने संपूर्ण उल्हास नदी ताब्यात घेतली आहे. जलपर्णीच्या या वाढता विस्तारामुळे नदीच्या प्रदूषणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करीत आहे. बदलापुरातील सर्व नाले थेट उल्हास नदीत सोडले जात असल्याने या वाढत्या प्रदूषणामुळे जलपर्णीचा विस्तार देखील वाढला आहे. जलपर्णीवर योग्य उपाययोजना केले जात नसल्याने आता संपूर्ण उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे. वालीवली गावाजवळील नदीवर जलपर्णीची हिरवी शाळ पांघरली गेली आहे. या जलपर्णीवर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

जलपदीचा विस्तार उल्हास नदीत केवळ बदलापूर शहरापूर्ती नसून हीच परिस्थिती अंबरनाथ ग्रामीण भागात देखील निर्माण झाली आहे. आपटी, रायता नदीपात्रात देखील जलपर्णीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, हीच परिस्थिती रायता पूल ते शहाड पर्यंत निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने औषध फवारणी करून ही जलपर्णी नष्ट केली होती मात्र यंदाच्या वर्षी अशा कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने उल्हास नदीचा ताबा जलपर्णीने घेतला आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरriverनदीthaneठाणे