शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

माळशेज घाट परिसरात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:24 IST

तालुक्यातील माळशेजघाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागात भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून जमिनीत खड्डे खोदून तीन किमी अंतरावरून डोक्यावरून पाणी आणावे लागते आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते.

मुरबाड - तालुक्यातील माळशेजघाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागात भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून जमिनीत खड्डे खोदून तीन किमी अंतरावरून डोक्यावरून पाणी आणावे लागते आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते. मात्र, एप्रिल नुकताच सुरू झाला आहे, तरीही खेड्यापाड्यांत ही परिस्थिती दिसते आहे.मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या बाजूचा परिसर हा डोंगराळ, अतिदुर्गमअसून या परिसरात बहुतांश आदिवासी समाज राहतो. गावपाड्यांतील विहिरी, तलाव आटले असून उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने जवळपासच्या पाणवठ्याची ठिकाणे कोरडीठाक झाली आहेत. त्यामुळे आदिवासींना पाण्यासाठी दोन ते तीन किमी अंतरावर डोंगरदऱ्या चढउतार करून जमिनीत खड्डे खोदून त्यातील पाणी भांड्यामधून आणावे लागते आहे. पाणी आणण्यातच या आदिवासींचा अर्धा दिवस जात आहे. खड्डे खोदून आणलेले हे पाणी अशुद्ध असते. मात्र, पाणी शुद्धीकरण यंत्रणेअभावी त्यांना तसेच पाणी प्यावे लागते आहे. पाणीटंचाई भीषण असल्याने या आदिवासींना तीनतीन दिवस अंघोळही करता येत नाही.शासनाच्या स्वच्छता अभियानाचेही तीनतेरा वाजले आहेत. पाणीटंचाईमुळे बहुतांश आदिवासींनी शौचालयाचा वापरदेखील बंद केला आहे. पिण्यासाठीच पाणी नाही, तर शौचालयासाठी पाणी कोठून आणणार, असा सवाल हे आदिवासी करत आहेत. आदिवासी दुर्गम भागातील कुंभाळा, धारखिंड, केळेवाडी, मोधळवाडी, शिसेवाडी, डोंगरवाडी, करपटवाडी, पायरवाडी, आल्याचीवाडी आदी परिसरांत भीषण पाणीटंचाई आहे. पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने आणि अर्धा दिवस त्यातच जात असल्याने रोजगारासाठी वेळ मिळत नाही. तसेच अर्धा दिवस रोजगार मजुरी केल्याने मिळालेल्या उत्पन्नात कुटुंबाचा गाडा कसा चालवणार, या विवंचनेत सध्या हे आदिवासी आहेत. आदिवासींची उपासमार होत असल्याने त्यांनी घाटमाथ्यावर स्थलांतर केले आहे.लोकप्रतिनिधींना साकडेभीषण पाणीटंचाई सुरू झाल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तातडीने या परिसरात जाऊन पाहणी केली. बºयाच पाणीपुरवठा योजनांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने या योजना बंद आहेत. त्यामुळे विद्युतपुरवठा सुरू करून पाणीपुरवठादेखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आदिवासींनी पवार यांना साकडे घातले. पवार यांनीदेखील विद्युतपुरवठा सुरू करण्यासोबतच पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.ज्या ग्रामपंचायतींनी पाण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहे, त्यांना तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत.-सचिन चौधर, तहसीलदार, मुरबाड

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे