शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

माळशेज घाट परिसरात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:24 IST

तालुक्यातील माळशेजघाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागात भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून जमिनीत खड्डे खोदून तीन किमी अंतरावरून डोक्यावरून पाणी आणावे लागते आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते.

मुरबाड - तालुक्यातील माळशेजघाट परिसरातील दुर्गम आदिवासी भागात भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून जमिनीत खड्डे खोदून तीन किमी अंतरावरून डोक्यावरून पाणी आणावे लागते आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या दुर्गम भागात पाण्याचे दुर्भिक्ष नेहमीच जाणवते. मात्र, एप्रिल नुकताच सुरू झाला आहे, तरीही खेड्यापाड्यांत ही परिस्थिती दिसते आहे.मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या बाजूचा परिसर हा डोंगराळ, अतिदुर्गमअसून या परिसरात बहुतांश आदिवासी समाज राहतो. गावपाड्यांतील विहिरी, तलाव आटले असून उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने जवळपासच्या पाणवठ्याची ठिकाणे कोरडीठाक झाली आहेत. त्यामुळे आदिवासींना पाण्यासाठी दोन ते तीन किमी अंतरावर डोंगरदऱ्या चढउतार करून जमिनीत खड्डे खोदून त्यातील पाणी भांड्यामधून आणावे लागते आहे. पाणी आणण्यातच या आदिवासींचा अर्धा दिवस जात आहे. खड्डे खोदून आणलेले हे पाणी अशुद्ध असते. मात्र, पाणी शुद्धीकरण यंत्रणेअभावी त्यांना तसेच पाणी प्यावे लागते आहे. पाणीटंचाई भीषण असल्याने या आदिवासींना तीनतीन दिवस अंघोळही करता येत नाही.शासनाच्या स्वच्छता अभियानाचेही तीनतेरा वाजले आहेत. पाणीटंचाईमुळे बहुतांश आदिवासींनी शौचालयाचा वापरदेखील बंद केला आहे. पिण्यासाठीच पाणी नाही, तर शौचालयासाठी पाणी कोठून आणणार, असा सवाल हे आदिवासी करत आहेत. आदिवासी दुर्गम भागातील कुंभाळा, धारखिंड, केळेवाडी, मोधळवाडी, शिसेवाडी, डोंगरवाडी, करपटवाडी, पायरवाडी, आल्याचीवाडी आदी परिसरांत भीषण पाणीटंचाई आहे. पाणी आणण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याने आणि अर्धा दिवस त्यातच जात असल्याने रोजगारासाठी वेळ मिळत नाही. तसेच अर्धा दिवस रोजगार मजुरी केल्याने मिळालेल्या उत्पन्नात कुटुंबाचा गाडा कसा चालवणार, या विवंचनेत सध्या हे आदिवासी आहेत. आदिवासींची उपासमार होत असल्याने त्यांनी घाटमाथ्यावर स्थलांतर केले आहे.लोकप्रतिनिधींना साकडेभीषण पाणीटंचाई सुरू झाल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तातडीने या परिसरात जाऊन पाहणी केली. बºयाच पाणीपुरवठा योजनांचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने या योजना बंद आहेत. त्यामुळे विद्युतपुरवठा सुरू करून पाणीपुरवठादेखील लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आदिवासींनी पवार यांना साकडे घातले. पवार यांनीदेखील विद्युतपुरवठा सुरू करण्यासोबतच पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.ज्या ग्रामपंचायतींनी पाण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहे, त्यांना तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या आहेत.-सचिन चौधर, तहसीलदार, मुरबाड

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे