शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

ढोलताशांच्या व्यवसायावर पावसामुळे फिरले पाणी; विसर्जन मिरवणुकांसाठी ऑर्डर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 00:46 IST

खान्देशातून आलेल्या पथकांची व्यथा; पूर, आर्थिक मंदीमुळे अनेकांंकडून खर्चात कपात

सचिन सागरे कल्याण : शेतमजुरी, मोलमजुरी करून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी गणेशोत्सवात दरवर्षी राज्यभरातून ढोलताशांसह वाजंत्री कल्याण-डोंबिवलीत येतात. अनेक गणेशभक्तही आपल्या लाडक्या बाप्पाला ढोलताशांच्या गजरात निरोप देण्यासाठी त्यांना आॅर्डर देतात. मात्र, यंदा पावसाने सर्वच विसर्जनाच्या दिवशी व्यवसायावर पाणी फिरल्याचे वाजंत्रींचे म्हणणे आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गावी शेतात फार काही कामे नसतात. त्यामुळे गणेशोत्सवात ढोलताशा वाजवून चांगली कमाई होईल, या आशेने गणेशोत्सवात दरवर्षी धुळे, जळगाव आणि नाशिक रोड येथून ढोलताशा पथके कल्याण-डोंबिवलीत येतात. यंदाही गणेशोत्सवाच्या आधल्या दिवशीपासून कल्याणमधील सहजानंद चौक, लालचौकी, शिवाजी चौक, अत्रे नाट्य मंदिर परिसर तर डोंबिवलीतील चाररस्ता, इंदिरा गांधी चौक, सम्राट चौक आदी परिसरांत धुळे, जळगाव आणि नाशिक रोड येथून ढोलताशा पथके आली आहेत. या पथकांतील मंडळींनी रस्त्यावरच आपला मुक्काम मांडला आहे. एका पथकात साधारण चार जण ढोलताशा वाजवण्यासाठी जातात. चार हजार रुपयांपासून सुरुवात होऊन माणसागणिक त्यांचा मोबदला वाढत जातो.

कल्याण-डोंबिवलीतील सार्वजनिक मंडळांबरोबर काही हौशी भाविक आपल्या घरगुती गणपतीची ढोलताशा, लेझीम पथक अथवा बॅण्ड पथकांसह भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक काढतात. मात्र, यंदा गणेशोत्सवात वरुणराजाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे फारशा विसर्जन मिरवणुका निघाल्या नाहीत. त्यामुळे व्यवसायावर पाणी फिरल्याचे काही वाजंत्रींनी ‘लोकमत’ला सांगितले.

मागील वर्षीही गणपतीत पाऊस होता. मात्र, तरीही ग्राहकांकडून वाजंत्रीसाठी ऑर्डर मिळाल्या होत्या. परंतु, यंदा त्याहीपेक्षा कमी व्यवसाय झाला आहे. आर्थिक मंदीमुळेही काहींनी हात आखडता घेतला आहे. काही सार्वजनिक मंडळांनी देखावे, मिरवणुकांवर होणारा खर्च कमी करून पूरग्रस्तांना मदत केली आहे. दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपतीचे विसर्जन तसेच सातव्या दिवशीपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने वाजंत्री ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळाले.

ढोल पथकातील एका व्यक्तीला दिवसभरात २०० रुपये खर्च येतो. त्यामुळे, एखाद्या ग्राहकाने घासाघीस केली तर कमी पैशांतही आॅर्डर स्वीकारली जात आहे. काही नाही त्यापेक्षा किमान जेवण आणि प्रवासाचा खर्च तरी निघेल, असा त्यामागचा आमचा उद्देश आहे. परंतु, परतीच्या प्रवासानंतर हातात केवळ दोन ते तीन हजार रुपयेच उरण्याची शक्यता काही वाजंत्री पथकांतील सदस्यांनी व्यक्त केली.पारंपरिक वाद्यांना महत्त्व देण्याबरोबरच रुढी-परंपरा जपण्यासाठी आम्ही वाजंत्रींना विसर्जन मिरवणुकीत आम्ही आणत असतो. मात्र, यंदा महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती पाहता अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, या हेतूने कोणत्याही प्रकारचे वाद्य ठेवले नाही.- शेखर पवार, गणेशभक्तराहण्याचेही मोठे हालनाशिक, जळगाव, धुळे येथून आलेल्या वाजंत्रींची येथे राहण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे ते दुकानाबाहेर अथवा रस्त्यावरच मुक्काम ठोकतात. परंतु, यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच ठिकाणी ओले असल्याने राहण्याचे मोठे हाल झाल्याचे काहींनी सांगितले.गणपतीच्या वेळी आम्ही शहरात येतो. परंतु, यंदाच्या वर्षी पाऊस पडत असल्याने अद्याप म्हणावी तशी कमाई झाली नाही. केवळ माणसांच्या खाण्यापिण्याचा खर्चच भागत आहे. - चेतन धोंगडे, साईनाथ ढोलवाले, नाशिक रोडतासाला आम्ही साधारणपणे तीन ते चार हजार रुपये घेतो. मात्र, यंदाच्या पावसामुळे ते पैसेही मिळणे मुश्कील झाले आहे. - सतीश, दीपक ढोलवाले

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019