शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या २४ गावाना केवळ एका टँकरने पाणी पुरवठा; सांगलीच्या टँकर चालकांचा यंदा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:21 IST

टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला

ठळक मुद्देमुंबई, ठाण्यासह जिल्ह्यात सर्वच शहराना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा तीव्र पाणी टंचाई समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्नसांगलीच्या टँकरचालकाना आजपर्यंतही बील मिळाले नसल्याने ते यंदा पाणी पुरवठा करण्यास नकार

ठाणे: यदांच्या कडकडीत उन्हाळ्यात शहापूर तालुक्यात पाणी टंचाईने पुन्हा डोकेवर काढले. तालुक्यात ठिकठिकाणच्या २४ गावांमध्ये सध्या तीव्र पाणी समस्या सुरू आहे. त्या गावाना केवळ एक टॅकर पाणी पुरवठा करीत आहे. मागील वर्षाच्या टंचाईत पाणी पुरवठा करणाऱ्या सांगलीच्या टँकरचालकाना आजपर्यंतही बील मिळाले नसल्याने ते यंदा पाणी पुरवठा करण्यास नकार देत असल्याचे वास्तव शहापूर येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा मेंगाळ यांनी उघड केले.मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यात सर्वच शहराना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा तीव्र पाणी टंचाई सुरू झाली. या टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला. टंचाई सुरू होताच टँकरची मागणी करण्याचे आावहन केले. परंतु सतत फे-या मारूनही टंकर मिळत नसल्याचे वास्तव मेंगाळ यांनी उघड केले. एवढेच नव्हे तर बोरिंगचा पाँईट देण्यासाठी देखील अभियंते फिरकत नसल्याची खंत मुरबाडचे सुभाष घरत यांनी व्यक्त केली. टंचाई संपेपर्यंत टँकर हो म्हणणारे अधिकारी शेवटी टँकर सुरू करता येणार नसल्याचे सांगून मोकळे होत असल्याचा अनुभवही घरत यांनी सीईओना ऐकावला.खर्डीजवळील शिवळ, अजरूप, टेंभ्याचा पाडा, आंब्याचा पाडा आदी परिसरातील नागरिक विहिरीतील थेंबथेब पाणी गोळा करीत आहेत. तर काही रहिवाशी हंडे,ड्रम, टाक्या लोकलमध्ये टाकून कसा-याहून पाणी आणत असल्याचे चंदे या सदस्याने सांगितले. तर सपाटपाडा, हिव, अनदाड, कासगाव, धसई, सरड्याचा पाडा या गावांमध्ये देखील तीव्र पाणी टंचाई सुरू असल्याचे वंदना भांडे यांनी सीईओंच्या निदर्शनात आणून देत जिल्ह्यातील पाणी टंचाई उग्र रूप धारण करीत असल्याचे या सदस्यांकडून ऐकायला मिळाले. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून काय हालचाली होणार याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद