शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या २४ गावाना केवळ एका टँकरने पाणी पुरवठा; सांगलीच्या टँकर चालकांचा यंदा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:21 IST

टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला

ठळक मुद्देमुंबई, ठाण्यासह जिल्ह्यात सर्वच शहराना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा तीव्र पाणी टंचाई समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्नसांगलीच्या टँकरचालकाना आजपर्यंतही बील मिळाले नसल्याने ते यंदा पाणी पुरवठा करण्यास नकार

ठाणे: यदांच्या कडकडीत उन्हाळ्यात शहापूर तालुक्यात पाणी टंचाईने पुन्हा डोकेवर काढले. तालुक्यात ठिकठिकाणच्या २४ गावांमध्ये सध्या तीव्र पाणी समस्या सुरू आहे. त्या गावाना केवळ एक टॅकर पाणी पुरवठा करीत आहे. मागील वर्षाच्या टंचाईत पाणी पुरवठा करणाऱ्या सांगलीच्या टँकरचालकाना आजपर्यंतही बील मिळाले नसल्याने ते यंदा पाणी पुरवठा करण्यास नकार देत असल्याचे वास्तव शहापूर येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा मेंगाळ यांनी उघड केले.मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यात सर्वच शहराना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा तीव्र पाणी टंचाई सुरू झाली. या टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला. टंचाई सुरू होताच टँकरची मागणी करण्याचे आावहन केले. परंतु सतत फे-या मारूनही टंकर मिळत नसल्याचे वास्तव मेंगाळ यांनी उघड केले. एवढेच नव्हे तर बोरिंगचा पाँईट देण्यासाठी देखील अभियंते फिरकत नसल्याची खंत मुरबाडचे सुभाष घरत यांनी व्यक्त केली. टंचाई संपेपर्यंत टँकर हो म्हणणारे अधिकारी शेवटी टँकर सुरू करता येणार नसल्याचे सांगून मोकळे होत असल्याचा अनुभवही घरत यांनी सीईओना ऐकावला.खर्डीजवळील शिवळ, अजरूप, टेंभ्याचा पाडा, आंब्याचा पाडा आदी परिसरातील नागरिक विहिरीतील थेंबथेब पाणी गोळा करीत आहेत. तर काही रहिवाशी हंडे,ड्रम, टाक्या लोकलमध्ये टाकून कसा-याहून पाणी आणत असल्याचे चंदे या सदस्याने सांगितले. तर सपाटपाडा, हिव, अनदाड, कासगाव, धसई, सरड्याचा पाडा या गावांमध्ये देखील तीव्र पाणी टंचाई सुरू असल्याचे वंदना भांडे यांनी सीईओंच्या निदर्शनात आणून देत जिल्ह्यातील पाणी टंचाई उग्र रूप धारण करीत असल्याचे या सदस्यांकडून ऐकायला मिळाले. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून काय हालचाली होणार याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद