शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

डोंबिवली-बदलापूरमध्ये प्रदूषण वाढल्याने जलस्रोत होतात दूषित

By admin | Updated: November 15, 2016 04:37 IST

रासायनिक सांडपाणी सोडताना कारखानदार तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे निकषांची पूर्तता करत नाहीत. यासंदर्भात ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेची याचिका

मुरलीधर भवार / डोंबिवलीरासायनिक सांडपाणी सोडताना कारखानदार तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे निकषांची पूर्तता करत नाहीत. यासंदर्भात ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. जून २०१६ मध्ये प्रदूषणाची मात्रा कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता. मात्र, १५ दिवसांपूर्वी ‘वनशक्ती’ने डोंबिवली व बदलापूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचे नमुने घेतले असता त्यात प्रदूषणाची मात्रा वाढल्याचे आढळले. कारखानदार व सांडपाणी प्रक्रिया केंद्रे धूळफेक करणारी माहिती देत आहेत. त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप करत ‘वनशक्ती’ने ही माहिती लवादाच्या निदर्शनास आणून दिली आहे. रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी थेट कल्याण खाडी, उल्हास आणि वालधुनी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. हे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी ‘वनशक्ती’ने नोव्हेंबर २०१३ मध्ये याचिका दाखल केली. ‘वनशक्ती’ने सांडपाण्याचे नमुने गोळा केले. त्यात प्रदूषण होत आहे, अशी बाब त्यांनी याचिकेद्वारे लवादाकडे मांडली. ती सध्या न्यायप्रविष्ट आहे. लवादाने वारंवार महाराष्ट्र आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच सोयीसुविधा न पुरवणाऱ्या एमआयडीसीसही वारंवार विचारणा केली आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असा मुद्दा वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीने लवादासमोर मांडला आहे. तसेच प्रदूषणासंदर्भात प्रतिज्ञापत्रही लवादाकडे सादर केले आहे. लवादाने कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे आदेश एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले आहे. लवादाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र डोंबिवली, अंबरनाथ, औद्योगिक विकास महामंडळ, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर पालिका यांना एकत्रित असा १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याविरोधात कारखानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयाने त्या आदेशाला स्थगिती दिली आहे. काही महापालिकांनी दंड भरण्याची तयारी दर्शवली आहे. दंडाच्या रकमेतून उल्हास नदी, कल्याण खाडी व वालधुनी नदीत होणारे प्रदूषण दूर करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे सूचित केले होते. लवादाने केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह सगळ्यांना धारेवर धरल्यावर मंडळाने अंबरनाथ व डोंबिवलीतील एकूण १४४ रासायनिक कारखाने बंद केले. ही नोटीस २ जुलैपासून लागू आहे. त्यावरील स्थगिती लवादाने अद्याप उठवलेली नाही. डोंबिवली फेज टू मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद आहे. तर, अंबरनाथमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र तीन महिन्यांसाठी २५ टक्के चालवण्यास मुभा दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जून २०१६ मध्ये डोंबिवली फेज एकमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया करण्यात येणाऱ्या पाण्याची प्रदूषणाची मात्रा आटोक्यात आल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता. तसेच डोंबिवली फेज दोनमधील सांडपाण्यातील प्रदूषणाची मात्रा कमी झालेली नाही.