शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

डोंबिवली-बदलापूरमध्ये प्रदूषण वाढल्याने जलस्रोत होतात दूषित

By admin | Updated: November 15, 2016 04:37 IST

रासायनिक सांडपाणी सोडताना कारखानदार तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे निकषांची पूर्तता करत नाहीत. यासंदर्भात ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेची याचिका

मुरलीधर भवार / डोंबिवलीरासायनिक सांडपाणी सोडताना कारखानदार तसेच सांडपाणी प्रक्रिया केंद्रे निकषांची पूर्तता करत नाहीत. यासंदर्भात ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. जून २०१६ मध्ये प्रदूषणाची मात्रा कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता. मात्र, १५ दिवसांपूर्वी ‘वनशक्ती’ने डोंबिवली व बदलापूर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचे नमुने घेतले असता त्यात प्रदूषणाची मात्रा वाढल्याचे आढळले. कारखानदार व सांडपाणी प्रक्रिया केंद्रे धूळफेक करणारी माहिती देत आहेत. त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप करत ‘वनशक्ती’ने ही माहिती लवादाच्या निदर्शनास आणून दिली आहे. रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता प्रदूषित पाणी थेट कल्याण खाडी, उल्हास आणि वालधुनी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. हे प्रदूषण रोखण्याच्या मागणीसाठी ‘वनशक्ती’ने नोव्हेंबर २०१३ मध्ये याचिका दाखल केली. ‘वनशक्ती’ने सांडपाण्याचे नमुने गोळा केले. त्यात प्रदूषण होत आहे, अशी बाब त्यांनी याचिकेद्वारे लवादाकडे मांडली. ती सध्या न्यायप्रविष्ट आहे. लवादाने वारंवार महाराष्ट्र आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच सोयीसुविधा न पुरवणाऱ्या एमआयडीसीसही वारंवार विचारणा केली आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असा मुद्दा वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीने लवादासमोर मांडला आहे. तसेच प्रदूषणासंदर्भात प्रतिज्ञापत्रही लवादाकडे सादर केले आहे. लवादाने कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे आदेश एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले आहे. लवादाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र डोंबिवली, अंबरनाथ, औद्योगिक विकास महामंडळ, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर पालिका यांना एकत्रित असा १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याविरोधात कारखानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र, न्यायालयाने त्या आदेशाला स्थगिती दिली आहे. काही महापालिकांनी दंड भरण्याची तयारी दर्शवली आहे. दंडाच्या रकमेतून उल्हास नदी, कल्याण खाडी व वालधुनी नदीत होणारे प्रदूषण दूर करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा, असे सूचित केले होते. लवादाने केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह सगळ्यांना धारेवर धरल्यावर मंडळाने अंबरनाथ व डोंबिवलीतील एकूण १४४ रासायनिक कारखाने बंद केले. ही नोटीस २ जुलैपासून लागू आहे. त्यावरील स्थगिती लवादाने अद्याप उठवलेली नाही. डोंबिवली फेज टू मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद आहे. तर, अंबरनाथमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र तीन महिन्यांसाठी २५ टक्के चालवण्यास मुभा दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जून २०१६ मध्ये डोंबिवली फेज एकमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून प्रक्रिया करण्यात येणाऱ्या पाण्याची प्रदूषणाची मात्रा आटोक्यात आल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला होता. तसेच डोंबिवली फेज दोनमधील सांडपाण्यातील प्रदूषणाची मात्रा कमी झालेली नाही.