शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Ulhasnagar: उल्हासनगरात पाणी टंचाई, नागरिक त्रस्त, जलवाहिनी आणि जलकुंभाला गळती

By सदानंद नाईक | Updated: June 13, 2023 19:58 IST

Water shortage in Ulhasnagar:

- सदानंद नाईकउल्हासनगर - शहरातून बारामाही वाहणारी उल्हास नदी असूनही महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नाही. पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत असून शहरातील बहुतांश ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे.

उल्हासनगरच्या हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीवर संच्युरी कंपनीची स्वतःची पाणी पुरवठा योजना आहे. तसेच नदी पात्रातून एमआयडीसी पाणी उचलून शहराला पाणी पुरवठा करीत आहेत. शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी उल्हास नदीवरील पाणी पुरवठा योजना उल्हासनगर महापालिकेला हस्तांतरण करण्याची मागणी जुनी आहे. दरम्यान या प्रक्रियेला गती आली होती. मात्र नंतर ही योजना रेंगाळली आहे. तर शहर पूर्वेला एमआयडीसीच्या पालेगाव जलकुंभातून व जलवाहिनीतून पाणी पुरवठा होतो. दरम्यान महापालिकेने ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजने अंतर्गत ११ नवीन जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभ, पंपिंग स्टेशन उभारले आहे. त्याच बरोबर ५५ हजार पाणी मीटर बसविण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र ५५ हजार पाणी मीटर गेले कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

शहरातील सुभाष टेकडी परिसरातील नागसेननगर, आम्रपालीनगर, साईनगर, महात्मा फुले कॉलनी, कुर्ला कॅम्प परिसर, संतोषनगर, महादेवनगर, गायकवाड पाडा, गणेशनगर, ज्योती कॉलनी, राहुलनगर, शांतीनगर, इमली पाडा आदी ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून महिलांनी दोन दिवसांपूर्वी थेट पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक दिली होती. पाणी पुरवठा विभागाचे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकारी अभियंता पद रिक्त असून विभागात बहुतांश पदे प्रभारी आहेत. त्यामुळे विभागात सावळागोंधळ उडाल्याचे चित्र आहे. नव्याने हातपंप खोदणे व हातपंप दुरुस्तीवर दरवर्षी लाखोचा खर्च करूनही ३० टक्के पाणी गळती कायम आहे. तसे महापालिका अधिकारीच जाहीरपणे सांगत आहेत. एकूणच पाणी पुरवठा विभागाला सक्षम अधिकारी व कार्यकारी अभियंता पदाची गरज आहे. विभागात २५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करीत आहेत. मात्र कोणत्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करतात. हा संशोधनाचा विषय झाला आहे.

राजकीय नेत्यांनी बघायची भूमिका महापालिका निवडणुका येताच भावी नगरसेवकात वाढ होऊन नागरिकांचे कामे करतात. मात्र महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने, माजी नगरसेवकासह भावी नगरसेवकही आज पाहायला मिळत नसल्याने, नागरिकांचे पाणी टंचाई प्रश्न तसाच टांगलेला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातulhasnagarउल्हासनगरthaneठाणे