शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील चार पाड्यांमध्ये पाणी टंचाई; उसगावचा बंधारा उशाला, पण कोरड घशाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 14:23 IST

भिवंडी तालूक्यातील गणेशपूरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या उसगावबंघारा, उसगाव, कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या आदिवासी कातकरीपाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देभिवंडी तालूक्यातील गणेशपूरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या उसगावबंघारा, उसगाव, कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या आदिवासी कातकरीपाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.तीव्र पाणी टंचाईकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपूरवठा विभागाध्यक्षा अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केल्याने या पाड्याला टंचाईचा सामना करावा लागत आहे.ठाणे जिल्हा परिषद भिवंडी पंचायत समिती पाणी पूरवठा विभागाच्या अंर्तगत येणाऱ्या गणेशपूरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कवाडपाडा बोरवेल आहे.

रोहिदास पाटील

अनगाव - भिवंडी तालूक्यातील गणेशपूरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या उसगावबंघारा, उसगाव, कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या आदिवासी कातकरीपाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या तीव्र पाणी टंचाईकडे भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपूरवठा विभागाध्यक्षा अधिकाऱ्यांनी दूर्लक्ष केल्याने या पाड्याला टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र उसगांव येथे तानसा, वैतरणा धरणाच्या धर्तीवर बंधारा आहे. या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा आहे. येथील पाणी वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा, विरार शहराला तसेच उसगांव या गावाला पाईपलाईनने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या कातकरी वाडीसह या टंचाईग्रस्त पाड्यांना पाणी मिळत नसल्याने धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषद भिवंडी पंचायत समिती पाणी पूरवठा विभागाच्या अंर्तगत येणाऱ्या गणेशपूरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कवाडपाडा बोरवेल आहे. पाण्याची टाकीही बसविण्यात आली आहे. शासन नियमानूसार दीडशे फूट बोअरवेल मारल्याने तिला पाणी लागलं नाही तर उसगांव बंधारा येथील कातकरी वाडीतील बोअरवेल आहे तिला पाणी नाही याच बंधाऱ्यामधून उसगाव गावात नळ पाईपलाईन टाकून उसगावात पाणी पूरवठा केला जात आहे. मात्र त्याच्या एक किमी अंतरावर असलेल्या कातकरीवाडीमधील नागरिक पाणी टंचाईचा सामना करीत आहेत.

भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यामध्ये नागरी सुविधांची वाणवा आहे. विशेष म्हणजे गणेशपूरी येथे स्वामी नित्यानंद महाराजांच समाधी मंदिर आहे. या ठिकाणी देशातील परदेशातील भक्त दर्शनाकरीता येतात अशा नित्यानंद महाराजाच्या पावनभूमीत आज ही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ही धक्कादायक गोष्ट आहे.

गणेशपूरी, वज्रेश्वरी, अकलोली या तीर्थक्षेत्राला शासनाने पर्यटनाचा दर्जा दिला आहे शासनाने हे क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. मात्र येथील सुविधा सोडविल्या नाहीत त्यामुळे पर्यटन क्षेत्र हे कागदोपत्री आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते याला काय म्हणायचे असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पाणी पूरवठा विभागाचे अधिकारी राऊत, शाखा अभियंता सुदेश भास्करराव यांच्याकडे पाणी टंचाईसंबधी लेखी निवेदन श्रमजीवी संघटनेच्या वतीने गेल्या वर्षी व यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिलेले आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त गाव पाड्याची नावे समाविष्ट आहेत. सहा महिने उलटून गेल्यावरही त्यावर पाणी पुरवठा विभागाने का उपाय योजना केल्या नाहीत असा प्रश्न संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते जयेश पाटील यानी उपस्थित केला आहे.

तीर्थक्षेत्र आसलेल्या गणेशपुरी गावालगत असणाऱ्या पाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने तालूका व जिल्हा प्रशासन काय करताय की पाण्याकरीता एखादा जीव गमावल्यावर ते येथील पाणी टंचाई दूर करणार आहेत असा सवाल संजय कामडी यांनी केला आहे.  या पाड्यांवर बोरवेल आहेत त्यांना पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलावरून पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. तर येथील पाड्यांना टॅंकरने पाणीपूरवठा सुरू करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.  

टॅग्स :bhiwandiभिवंडीWaterपाणी