शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडी वाढून पाणीटंचाई तीव्र होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:42 IST

नागरी समस्यांनी त्रस्त असलेली एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरे पाणीटंचाई, वाहतूककोंडीसह इतर पायाभूत सुविधांअभावी त्रस्त होणार आहेत.

- नारायण जाधव ठाणे : रायगड आणि ठाणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या पाच (इंटिग्रेटेड टाउनशिप) अर्थात खासगी एकात्मिक नगरवसाहतींमुळे आधीच नागरी समस्यांनी त्रस्त असलेली एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरे पाणीटंचाई, वाहतूककोंडीसह इतर पायाभूत सुविधांअभावी त्रस्त होणार आहेत. सध्या या पाच वसाहतींच्या पार्श्वभूमीवर विकासक आणि सरकार प्रदेशातील जागांचे भाव वाढणार असल्याचे सांगत असले तरीसर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसणार असून एमएमआरडीएचे नियोजन कागदावरच आहे.पनवेल, पेण-अलिबागसह भिवंडी आणि कल्याण-डोंबिवलीच्या शीळफाटा परिसरात सध्या मोठ्या वेगाने लोकसंख्या वाढत असून वाढत्या लोकसंख्येनुसार या परिसरात वाहतूककोंडी, आरोग्य सुविधा, प्रदूषण यासह शैक्षणिक सुविधांची वानवा यासारख्या अनेक समस्या आहेत. यातजेएनपीटीतून देशातील अन्य भागांत जाणारे कंटेनर या मार्गांवरून धावतात. त्यामुळे येथे वाहतूककोंडी, ध्वनी आणि वायुप्रदूषण नित्याचे आहे. आता वसाहतींमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.पाणीटंचाई तीव्र होणारसध्या महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा असल्याचे एमएमआरडीएने आपल्या २०१६-३६ च्या विकास आराखड्यात म्हटले आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ ते आता २०१७ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. बारवीची उंची आणि मध्य वैतरणा वगळता पाण्याचे स्रोतात तसूभरही वाढ झालेली आहे. सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी जी धरणे प्रस्तावित केली आहेत. त्यांच्यासाठी जमीनच संपादित झालेली नाही.सध्या वसई-विरार आणि मीरा-भार्इंदरला ३०८ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर पाण्याची गरज १३०७ दशलक्ष लीटर आहे. मात्र, सध्या भातसा, तानसा, वैतरणा, बारवी, चिखलोली आणि शहाड -टेमघरमधून १२१२ लीटरच पाणी मिळत आहे. शिवाय कर्जत-खालापूर परिसराला १२ दशलक्ष तर नवी मुंबई विमानतळा परिसरात २७ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. नव्या पाच एकात्मिक वसाहतींमुळे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवणार आहे. (उत्तरार्ध)>कॉरिडोर, मेट्रोवरनजर ठेवून जागाखरेदीएमएमआरडीए क्षेत्रातील ज्या भागांत या पाच टाउनशिप येत आहेत. त्याच भागांतून ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो, कल्याण-तळोजा मेट्रो जाणार आहेत. शिवाय, केंद्र सरकारचा जेएनपीटी ते नवी दिल्ली फ्रेट कॉरिडोर आणि एमएमआरडीएचाच बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर जाणार आहे. यामुळे नगरविकास आणि एमएमआरडीएच्या नियोजन विभागातील काही वरिष्ठांना हाताशी धरून या धनदांडग्या बिल्डरांनी या जागा आधीच खरेदी करून त्याठिकाणी टाउनशिप उभारण्याचा सपाटा लावल्याची चर्चा आहे.