शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

वाहतूककोंडी वाढून पाणीटंचाई तीव्र होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:42 IST

नागरी समस्यांनी त्रस्त असलेली एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरे पाणीटंचाई, वाहतूककोंडीसह इतर पायाभूत सुविधांअभावी त्रस्त होणार आहेत.

- नारायण जाधव ठाणे : रायगड आणि ठाणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या पाच (इंटिग्रेटेड टाउनशिप) अर्थात खासगी एकात्मिक नगरवसाहतींमुळे आधीच नागरी समस्यांनी त्रस्त असलेली एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरे पाणीटंचाई, वाहतूककोंडीसह इतर पायाभूत सुविधांअभावी त्रस्त होणार आहेत. सध्या या पाच वसाहतींच्या पार्श्वभूमीवर विकासक आणि सरकार प्रदेशातील जागांचे भाव वाढणार असल्याचे सांगत असले तरीसर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसणार असून एमएमआरडीएचे नियोजन कागदावरच आहे.पनवेल, पेण-अलिबागसह भिवंडी आणि कल्याण-डोंबिवलीच्या शीळफाटा परिसरात सध्या मोठ्या वेगाने लोकसंख्या वाढत असून वाढत्या लोकसंख्येनुसार या परिसरात वाहतूककोंडी, आरोग्य सुविधा, प्रदूषण यासह शैक्षणिक सुविधांची वानवा यासारख्या अनेक समस्या आहेत. यातजेएनपीटीतून देशातील अन्य भागांत जाणारे कंटेनर या मार्गांवरून धावतात. त्यामुळे येथे वाहतूककोंडी, ध्वनी आणि वायुप्रदूषण नित्याचे आहे. आता वसाहतींमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.पाणीटंचाई तीव्र होणारसध्या महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा असल्याचे एमएमआरडीएने आपल्या २०१६-३६ च्या विकास आराखड्यात म्हटले आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ ते आता २०१७ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. बारवीची उंची आणि मध्य वैतरणा वगळता पाण्याचे स्रोतात तसूभरही वाढ झालेली आहे. सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी जी धरणे प्रस्तावित केली आहेत. त्यांच्यासाठी जमीनच संपादित झालेली नाही.सध्या वसई-विरार आणि मीरा-भार्इंदरला ३०८ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर पाण्याची गरज १३०७ दशलक्ष लीटर आहे. मात्र, सध्या भातसा, तानसा, वैतरणा, बारवी, चिखलोली आणि शहाड -टेमघरमधून १२१२ लीटरच पाणी मिळत आहे. शिवाय कर्जत-खालापूर परिसराला १२ दशलक्ष तर नवी मुंबई विमानतळा परिसरात २७ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. नव्या पाच एकात्मिक वसाहतींमुळे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवणार आहे. (उत्तरार्ध)>कॉरिडोर, मेट्रोवरनजर ठेवून जागाखरेदीएमएमआरडीए क्षेत्रातील ज्या भागांत या पाच टाउनशिप येत आहेत. त्याच भागांतून ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो, कल्याण-तळोजा मेट्रो जाणार आहेत. शिवाय, केंद्र सरकारचा जेएनपीटी ते नवी दिल्ली फ्रेट कॉरिडोर आणि एमएमआरडीएचाच बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर जाणार आहे. यामुळे नगरविकास आणि एमएमआरडीएच्या नियोजन विभागातील काही वरिष्ठांना हाताशी धरून या धनदांडग्या बिल्डरांनी या जागा आधीच खरेदी करून त्याठिकाणी टाउनशिप उभारण्याचा सपाटा लावल्याची चर्चा आहे.