शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कातकरीवाडीत पाणीटंचाई, ग्रामस्थांची होतेय वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:02 IST

एकमेव बोअरवेलचे पाणी आटले : नदीकिनारी असलेल्या गावांतही चिंता

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई आता नदीकिनारी असलेल्या गावांमध्येही जाणवू लागली आहे. त्यातच, जर आता पावसाळ्याला उशीर झाला तर तालुक्यातील चित्र अतिशय भयावह असेल. यंदा पाणीटंचाईच्या समस्येने सर्वच गावांना ग्रासले असून त्यात आता तालुक्यातील ठिळे गावातील कातकरीवाडीची भर पडली आहे.

ठिळे गावच्या कातकरीवाडीत २५ ते ३० कुटुंबे राहतात. येथील लोकसंख्या १२५ च्या आसपास असून या वाडीसाठी एकमेव बोअरवेल आहे. अनेक दिवसांपासून या बोअरवेलला पाणी येणे बंद झाल्याने गावकऱ्यांची अडचण झाली. त्यांना दूरवरून पाणी आणणे भाग पडू लागले. त्यामुळे वाडीतील महिला हैराण झाल्या आहेत. मात्र, याच गावातील महेश पांडुरंग देसले यांनी या लोकांना मोफत पाणी देणे सुरू केले, ते आजतागायत. आजच्या टंचाईच्या काळात कुणीही एक हंडाभर पाणी देत नसतानाही या गृहस्थाने माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे.

आज वाडीत एकमेव विहीर असून तिने कधीच तळ गाठला आहे. जवळपास कुठेच पाण्याचा स्रोत नसल्याने वाडीतील ग्रामस्थांची गळचेपी झाली आहे. तीन दिवसांपूर्वी एक टँकर विहिरीत टाकला. मात्र, गेल्या दोन दिवसांत टँकर आला नसल्याचे उषा रवींद्र हिलम यांनी सांगितले.

दरम्यान, पाऊस लांबणार अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाचीही पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे.

वाडीत प्यायलाच पाणी नसल्याने ती सर्व माणसे आमच्या बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी येतात. त्यांना आम्ही मोफत पाणी देतो. - मंजुळा देसले

या वाडीला टँकरने पाणी सुरू केले असून दररोज पाणी देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई