शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

कातकरीवाडीत पाणीटंचाई, ग्रामस्थांची होतेय वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:02 IST

एकमेव बोअरवेलचे पाणी आटले : नदीकिनारी असलेल्या गावांतही चिंता

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई आता नदीकिनारी असलेल्या गावांमध्येही जाणवू लागली आहे. त्यातच, जर आता पावसाळ्याला उशीर झाला तर तालुक्यातील चित्र अतिशय भयावह असेल. यंदा पाणीटंचाईच्या समस्येने सर्वच गावांना ग्रासले असून त्यात आता तालुक्यातील ठिळे गावातील कातकरीवाडीची भर पडली आहे.

ठिळे गावच्या कातकरीवाडीत २५ ते ३० कुटुंबे राहतात. येथील लोकसंख्या १२५ च्या आसपास असून या वाडीसाठी एकमेव बोअरवेल आहे. अनेक दिवसांपासून या बोअरवेलला पाणी येणे बंद झाल्याने गावकऱ्यांची अडचण झाली. त्यांना दूरवरून पाणी आणणे भाग पडू लागले. त्यामुळे वाडीतील महिला हैराण झाल्या आहेत. मात्र, याच गावातील महेश पांडुरंग देसले यांनी या लोकांना मोफत पाणी देणे सुरू केले, ते आजतागायत. आजच्या टंचाईच्या काळात कुणीही एक हंडाभर पाणी देत नसतानाही या गृहस्थाने माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे.

आज वाडीत एकमेव विहीर असून तिने कधीच तळ गाठला आहे. जवळपास कुठेच पाण्याचा स्रोत नसल्याने वाडीतील ग्रामस्थांची गळचेपी झाली आहे. तीन दिवसांपूर्वी एक टँकर विहिरीत टाकला. मात्र, गेल्या दोन दिवसांत टँकर आला नसल्याचे उषा रवींद्र हिलम यांनी सांगितले.

दरम्यान, पाऊस लांबणार अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाचीही पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे.

वाडीत प्यायलाच पाणी नसल्याने ती सर्व माणसे आमच्या बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी येतात. त्यांना आम्ही मोफत पाणी देतो. - मंजुळा देसले

या वाडीला टँकरने पाणी सुरू केले असून दररोज पाणी देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई