शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: March 5, 2024 15:43 IST

शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, बृहन्मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहे. भिवंडी, मुरबाड तालुक्यातील गावांमध्ये कमी अधीक टंचाई सुरू झाली आहे. मात्र भातसा, तानसा, वैतरणा, मध्यवैतरणा, अप्पर वैतरणा आदी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात तब्बल ४२ गांवपाड्यातील १२ हजार ६८३ लाेकसंख्या तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. त्यांना १५ टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.

यंदा जिल्ह्यात उत्तम पाऊस हाेऊनही जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात पाणी टंचाई सुरू झाली आहे. अन्य तालुक्याच्या तुलनेत सध्या शहापूर तालुक्यात या टंचाईने गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रारंभीच उग्र रूप धेतले आहेत. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत अवध्या आठ टॅंकरव्दारे २६ गांवपाड्यांना पाणी पुरवठा सुरू हाेता. पण यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच टॅंकरची संख्या दुप्पट हाेऊन टंचाईग्रस्त गांवपाड्यांची संख्याही दुपट्टीने वाढल्याचे वास्तव उघड झाले आहे. त्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिष्ज्ञदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले असून १५ टॅंकरच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.

शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे. यामध्ये कसारा ग्राम पंचायतीमधील नारळवाडी, दांड,या गांवासह पारधवाडीचा समावेशअआहे. तर फुगाळे ग्राम पंचायतीसह त्यातील आघाणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, बिबळवाडी आदींचा समवेश आहे. तर कळभाेंडे, काेथळे या ग्राम पंचायतीत टंचाई सुरू झाली. अजनुपमध्ये आठ पाड्यांना टंचाईच्या झळा आहे. काेठारेगावाजवळील काेळीवाडा, विहिगांवसह तीन पाड्यांमध्ये टंचाई आहे. याशिवाय वाशाळा, माळ, वेळूकच्या पाड्यामध्ये टंचाई सुरू आहे. उंबरखांड, वारस्काळ ग्रामपंचायतीमधील सहा पाडे, ढाढरेमधील उंबरवाडी आदी गांवे व आदिवासी पाडे तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई