शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: March 5, 2024 15:43 IST

शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, बृहन्मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहे. भिवंडी, मुरबाड तालुक्यातील गावांमध्ये कमी अधीक टंचाई सुरू झाली आहे. मात्र भातसा, तानसा, वैतरणा, मध्यवैतरणा, अप्पर वैतरणा आदी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात तब्बल ४२ गांवपाड्यातील १२ हजार ६८३ लाेकसंख्या तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. त्यांना १५ टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.

यंदा जिल्ह्यात उत्तम पाऊस हाेऊनही जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात पाणी टंचाई सुरू झाली आहे. अन्य तालुक्याच्या तुलनेत सध्या शहापूर तालुक्यात या टंचाईने गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रारंभीच उग्र रूप धेतले आहेत. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत अवध्या आठ टॅंकरव्दारे २६ गांवपाड्यांना पाणी पुरवठा सुरू हाेता. पण यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच टॅंकरची संख्या दुप्पट हाेऊन टंचाईग्रस्त गांवपाड्यांची संख्याही दुपट्टीने वाढल्याचे वास्तव उघड झाले आहे. त्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिष्ज्ञदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले असून १५ टॅंकरच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.

शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे. यामध्ये कसारा ग्राम पंचायतीमधील नारळवाडी, दांड,या गांवासह पारधवाडीचा समावेशअआहे. तर फुगाळे ग्राम पंचायतीसह त्यातील आघाणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, बिबळवाडी आदींचा समवेश आहे. तर कळभाेंडे, काेथळे या ग्राम पंचायतीत टंचाई सुरू झाली. अजनुपमध्ये आठ पाड्यांना टंचाईच्या झळा आहे. काेठारेगावाजवळील काेळीवाडा, विहिगांवसह तीन पाड्यांमध्ये टंचाई आहे. याशिवाय वाशाळा, माळ, वेळूकच्या पाड्यामध्ये टंचाई सुरू आहे. उंबरखांड, वारस्काळ ग्रामपंचायतीमधील सहा पाडे, ढाढरेमधील उंबरवाडी आदी गांवे व आदिवासी पाडे तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई