शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; शहापूरच्या ४२ गांवपाड्यांना १५ टॅकरद्वारे पाणी पुरवठा

By सुरेश लोखंडे | Updated: March 5, 2024 15:43 IST

शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, बृहन्मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात तीव्र पाणी टंचाई सुरू झाली आहे. भिवंडी, मुरबाड तालुक्यातील गावांमध्ये कमी अधीक टंचाई सुरू झाली आहे. मात्र भातसा, तानसा, वैतरणा, मध्यवैतरणा, अप्पर वैतरणा आदी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात तब्बल ४२ गांवपाड्यातील १२ हजार ६८३ लाेकसंख्या तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहे. त्यांना १५ टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.

यंदा जिल्ह्यात उत्तम पाऊस हाेऊनही जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम भागात पाणी टंचाई सुरू झाली आहे. अन्य तालुक्याच्या तुलनेत सध्या शहापूर तालुक्यात या टंचाईने गेल्या वर्षाच्या तुलनेत प्रारंभीच उग्र रूप धेतले आहेत. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत अवध्या आठ टॅंकरव्दारे २६ गांवपाड्यांना पाणी पुरवठा सुरू हाेता. पण यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच टॅंकरची संख्या दुप्पट हाेऊन टंचाईग्रस्त गांवपाड्यांची संख्याही दुपट्टीने वाढल्याचे वास्तव उघड झाले आहे. त्यांच्या या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिष्ज्ञदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून लक्ष केंद्रीत करण्यात आले असून १५ टॅंकरच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.

शहापूरच्या ४२ ग्राम पंचायतींमधील आठ माेठ्या गांवासह ३४ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांचा या टंचाईत समावेश आहे. यामध्ये कसारा ग्राम पंचायतीमधील नारळवाडी, दांड,या गांवासह पारधवाडीचा समावेशअआहे. तर फुगाळे ग्राम पंचायतीसह त्यातील आघाणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, बिबळवाडी आदींचा समवेश आहे. तर कळभाेंडे, काेथळे या ग्राम पंचायतीत टंचाई सुरू झाली. अजनुपमध्ये आठ पाड्यांना टंचाईच्या झळा आहे. काेठारेगावाजवळील काेळीवाडा, विहिगांवसह तीन पाड्यांमध्ये टंचाई आहे. याशिवाय वाशाळा, माळ, वेळूकच्या पाड्यामध्ये टंचाई सुरू आहे. उंबरखांड, वारस्काळ ग्रामपंचायतीमधील सहा पाडे, ढाढरेमधील उंबरवाडी आदी गांवे व आदिवासी पाडे तीव्र पाणी टंचाईला ताेंड देत आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई