शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

ठाणे जिल्ह्यात योजना राबवूनही पाणी टंचाई हटेना

By अजित मांडके | Updated: March 6, 2024 16:22 IST

४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा.

अजित मांडके, ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील गाव पाड्याना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा पोहोचत असतात. त्यामुळे येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जलजीवन मिशन, विंधन विहीर अशा विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. हर घर नळाद्वारे पाणी या योजनेंतर्गत लाखो कुटुंबियांची पाण्याची भटकंती थांबल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतांना दुसरीकडे, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. 

ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ते अगदी जून-जुलैपर्यंत ही पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. 

त्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्चून टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीरी खोलीकरण, गाळ काढणे, नविन विंधन विहीर घेणे आणि विंधन विहींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात येत असतात. यामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेसह पूरक नळ पाणी पुरवठा योजनेवर सर्वाधिक खर्च अपेक्षित धरण्यात येत असतो. त्यात जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कामे यांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांची पाणी टंचाई मुक्तीकडे वाटचाल सुरु झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

दरम्यान,  असे असले तरी, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता कायम असल्याचे चित्र दिसून येत असून या तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाबा समोर आली आहे.

 ही आहेत गावपाड्यांची संख्या : शहापूर तालुक्यातील गावांची नावे फूगाळे, दांड, काळभोंड, कोथळे, माळ, विहिगाव, उमरावणे, उंबरखांड तर, नाराळवाडी, पारधवाडी, अघणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, कोळीपाडा, वारली पाडा आदी पड्यांची नवे आहेत.

टॅग्स :thaneठाणेwater scarcityपाणी टंचाई