शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ठाणे जिल्ह्यात योजना राबवूनही पाणी टंचाई हटेना

By अजित मांडके | Updated: March 6, 2024 16:22 IST

४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा.

अजित मांडके, ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील गाव पाड्याना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा पोहोचत असतात. त्यामुळे येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जलजीवन मिशन, विंधन विहीर अशा विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. हर घर नळाद्वारे पाणी या योजनेंतर्गत लाखो कुटुंबियांची पाण्याची भटकंती थांबल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतांना दुसरीकडे, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. 

ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ते अगदी जून-जुलैपर्यंत ही पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. 

त्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्चून टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीरी खोलीकरण, गाळ काढणे, नविन विंधन विहीर घेणे आणि विंधन विहींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात येत असतात. यामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेसह पूरक नळ पाणी पुरवठा योजनेवर सर्वाधिक खर्च अपेक्षित धरण्यात येत असतो. त्यात जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कामे यांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांची पाणी टंचाई मुक्तीकडे वाटचाल सुरु झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

दरम्यान,  असे असले तरी, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता कायम असल्याचे चित्र दिसून येत असून या तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाबा समोर आली आहे.

 ही आहेत गावपाड्यांची संख्या : शहापूर तालुक्यातील गावांची नावे फूगाळे, दांड, काळभोंड, कोथळे, माळ, विहिगाव, उमरावणे, उंबरखांड तर, नाराळवाडी, पारधवाडी, अघणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, कोळीपाडा, वारली पाडा आदी पड्यांची नवे आहेत.

टॅग्स :thaneठाणेwater scarcityपाणी टंचाई