शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात योजना राबवूनही पाणी टंचाई हटेना

By अजित मांडके | Updated: March 6, 2024 16:22 IST

४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा.

अजित मांडके, ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील गाव पाड्याना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा पोहोचत असतात. त्यामुळे येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जलजीवन मिशन, विंधन विहीर अशा विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. हर घर नळाद्वारे पाणी या योजनेंतर्गत लाखो कुटुंबियांची पाण्याची भटकंती थांबल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतांना दुसरीकडे, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. 

ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ते अगदी जून-जुलैपर्यंत ही पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. 

त्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्चून टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीरी खोलीकरण, गाळ काढणे, नविन विंधन विहीर घेणे आणि विंधन विहींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात येत असतात. यामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेसह पूरक नळ पाणी पुरवठा योजनेवर सर्वाधिक खर्च अपेक्षित धरण्यात येत असतो. त्यात जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कामे यांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांची पाणी टंचाई मुक्तीकडे वाटचाल सुरु झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

दरम्यान,  असे असले तरी, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता कायम असल्याचे चित्र दिसून येत असून या तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाबा समोर आली आहे.

 ही आहेत गावपाड्यांची संख्या : शहापूर तालुक्यातील गावांची नावे फूगाळे, दांड, काळभोंड, कोथळे, माळ, विहिगाव, उमरावणे, उंबरखांड तर, नाराळवाडी, पारधवाडी, अघणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, कोळीपाडा, वारली पाडा आदी पड्यांची नवे आहेत.

टॅग्स :thaneठाणेwater scarcityपाणी टंचाई