शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

जिल्ह्यात यंदाही पाणीटंचाई, साडेबारा कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:53 IST

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

सुरेश लोखंडे ठाणे : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात जीवघेणी पाणीटंचाई उद्भवणार नसल्याचा होरा होता. मात्र, यंदा ही टंचाई काही महिने उशिराने उद्भवणार असून ८४६ गावपाड्यांना याचा फटका बसण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानुसार यंदाच्या टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने १२ कोटी ६५ लाख रूपयांच्या खर्चाचे नियोजन केले आहे. या खर्चातून फेबु्रवारी अखेरपर्यंत उद्भवणाऱ्या टंचाईवर मात करण्यात येणार आहे.भूजल सर्वेक्षणानुसार यंदा जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील संभाव्य पाणीटंचाईचा अहवाल तयार केला आहे. या पाणीटंचाईवर वेळीच मात करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी विविध कामांसाठी १२ कोटी ६५ लाख रूपये खर्चाचा आराखडा तयार केला. या आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाव्दारे टंचाईवरील उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये तीव्र टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रमुख उपाययोजनेसह नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरी म्हणजे हातपंपांची दुरुस्ती, नवीन बोअरिंग करून हातपंप बसवणे आदी कामे २४६ गावांसह ६०० आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांवर करण्याचे नियोजन आहे. यासाठी १२.६५ कोटींच्या आराखड्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजुरी दिली आहे.>हातपंपांसाठी ३६ लाखांची तरतूदहातपंपाच्या दुरुस्तीसाठी ३६ लाखांची तरतूद आहे. यातून ३५ गावे ८७ पा्यांमधी हातपंप दुुरुस्तीचे नियोजन आहे. एक कोटी ४४ लाख रूपये खर्चातून ५५ गावे आणि १८५ पाड्यांमध्ये बोअरिंग व त्यावर हातपंप बसवण्याचे नियोजन आहे. यासाठी १९ गावे ३२ पाडे शहापूर तालुक्यातील आहेत. त्यावर सर्वाधिक ३२ लाखांच्या खर्चाचे नियोजन आहे. मुरबाडच्या १६ गावे आणि १७ पा्यात यावर्षी बोअरिंग लावण्यासह हातपंपही बसवले जातील. त्यासाठी १९ लाखाच्या खर्चाचे नियोजन केले. भिवंडीतील १३ गावे ८७ पाड्यांमध्ये बोअरिंग व हातपंप घेतले जाणार असून त्यावर ६० लाखांच्या खर्चाचा आराखडा तयार झाला आहे. कल्याणचे चार गावे २५ पाडे या बोअरिंग व हात पंपास पात्र आहेत. त्यासाठी 17लाखांचे नियोजन आहे. अंबरनाथचे तीन गावे २४ पा्यांमध्येही हातपंप, बोअरिंग घेण्याचे नियोजन आहे.>विहिरींचे खोलीकरण नाहीयंदा विहिरींच्या खोलीकरणासह तीमधील गाळ काढण्याचे कामही करण्यात येणार नाही. तर बुडक्याही घेण्याची गरज नसल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. तीव्र पाणीटंचाई १२२ गावे आणि ३०६ पाड्यांमध्ये उद्भवू शकते. यासाठी दोन कोटी ३३ लाख रूपये खर्चाचे नियोजन आहे. टँकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाºया ८७ नळपाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.शहापूर तालुक्यात सर्वाधिक गावेजिल्ह्यात सर्वाधिक शहापूर तालुक्यांमधील ७७ गावे आणि २३३ आदिवासी पा्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी शहापूर तालुक्यास एक कोटी ७१ लाख रूपयांच्या खर्चाचे नियोजन आहे. या खालोखाल मुरबाडच्या ३५ गावांना आणि ५७ पा्यांमधील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. त्यासाठी ४९ लाखांच्या तरतुदीचे नियोजन केले आहे.