शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात यंदाही पाणीटंचाई, साडेबारा कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 01:53 IST

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

सुरेश लोखंडे ठाणे : गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात जीवघेणी पाणीटंचाई उद्भवणार नसल्याचा होरा होता. मात्र, यंदा ही टंचाई काही महिने उशिराने उद्भवणार असून ८४६ गावपाड्यांना याचा फटका बसण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानुसार यंदाच्या टंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने १२ कोटी ६५ लाख रूपयांच्या खर्चाचे नियोजन केले आहे. या खर्चातून फेबु्रवारी अखेरपर्यंत उद्भवणाऱ्या टंचाईवर मात करण्यात येणार आहे.भूजल सर्वेक्षणानुसार यंदा जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील संभाव्य पाणीटंचाईचा अहवाल तयार केला आहे. या पाणीटंचाईवर वेळीच मात करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी विविध कामांसाठी १२ कोटी ६५ लाख रूपये खर्चाचा आराखडा तयार केला. या आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाव्दारे टंचाईवरील उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये तीव्र टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रमुख उपाययोजनेसह नळपाणीपुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरी म्हणजे हातपंपांची दुरुस्ती, नवीन बोअरिंग करून हातपंप बसवणे आदी कामे २४६ गावांसह ६०० आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांवर करण्याचे नियोजन आहे. यासाठी १२.६५ कोटींच्या आराखड्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजुरी दिली आहे.>हातपंपांसाठी ३६ लाखांची तरतूदहातपंपाच्या दुरुस्तीसाठी ३६ लाखांची तरतूद आहे. यातून ३५ गावे ८७ पा्यांमधी हातपंप दुुरुस्तीचे नियोजन आहे. एक कोटी ४४ लाख रूपये खर्चातून ५५ गावे आणि १८५ पाड्यांमध्ये बोअरिंग व त्यावर हातपंप बसवण्याचे नियोजन आहे. यासाठी १९ गावे ३२ पाडे शहापूर तालुक्यातील आहेत. त्यावर सर्वाधिक ३२ लाखांच्या खर्चाचे नियोजन आहे. मुरबाडच्या १६ गावे आणि १७ पा्यात यावर्षी बोअरिंग लावण्यासह हातपंपही बसवले जातील. त्यासाठी १९ लाखाच्या खर्चाचे नियोजन केले. भिवंडीतील १३ गावे ८७ पाड्यांमध्ये बोअरिंग व हातपंप घेतले जाणार असून त्यावर ६० लाखांच्या खर्चाचा आराखडा तयार झाला आहे. कल्याणचे चार गावे २५ पाडे या बोअरिंग व हात पंपास पात्र आहेत. त्यासाठी 17लाखांचे नियोजन आहे. अंबरनाथचे तीन गावे २४ पा्यांमध्येही हातपंप, बोअरिंग घेण्याचे नियोजन आहे.>विहिरींचे खोलीकरण नाहीयंदा विहिरींच्या खोलीकरणासह तीमधील गाळ काढण्याचे कामही करण्यात येणार नाही. तर बुडक्याही घेण्याची गरज नसल्याचे अहवालावरून दिसून येत आहे. तीव्र पाणीटंचाई १२२ गावे आणि ३०६ पाड्यांमध्ये उद्भवू शकते. यासाठी दोन कोटी ३३ लाख रूपये खर्चाचे नियोजन आहे. टँकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाºया ८७ नळपाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.शहापूर तालुक्यात सर्वाधिक गावेजिल्ह्यात सर्वाधिक शहापूर तालुक्यांमधील ७७ गावे आणि २३३ आदिवासी पा्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी शहापूर तालुक्यास एक कोटी ७१ लाख रूपयांच्या खर्चाचे नियोजन आहे. या खालोखाल मुरबाडच्या ३५ गावांना आणि ५७ पा्यांमधील ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. त्यासाठी ४९ लाखांच्या तरतुदीचे नियोजन केले आहे.