शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा
3
PMC Elections 2026: पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; एकदा संधी द्यावी – अजित पवार
4
'त्या' वादग्रस्त मुद्द्यावर BCCI नं आखली 'लक्ष्मणरेषा'; मग खास बैठकीत नेमकं काय शिजलं?
5
अनेक वर्षांपासून बँक अकाऊंटमध्ये पैसे पडलेत? RBI 'या' पोर्टलद्वारे करा चेक, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
6
प्रत्येकाच्या खात्यात ९० लाख जमा करणार! 'या' देशातील नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची थेट ऑफर 
7
Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
8
तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू
9
"ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे अपहरण करावे", पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची जीभ घसरली! इस्रायलने दिले उत्तर
10
मकर संक्रांत २०२६: संक्रांत सण असूनही त्याला 'नकारात्मक' छटा का? रंजक आणि शास्त्रीय कारण माहितीय?
11
Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर; विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य
12
आयफोन, बॉयफ्रेंडला २५ लाखांची कार, ५ कोटींवर डल्ला; हायप्रोफाईल चोरीची धक्कादायक इनसाईड स्टोरी
13
वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप
14
मालेगाव मनपा निवडणुकीकडे प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पाठ; प्रचारासाठी शिंदेसेना, भाजपचा स्थानिक नेत्यांवर भर 
15
NSE आणि BSE मध्ये शनिवारी ट्रेडिंग; वीकेंडला ट्रेडिंग सेशनची गरज का भासली, SEBI चा काय आहे आदेश?
16
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा; बॉयफ्रेंडने कडाक्याच्या थंडीत रोमँटिक अंदाजात अभिनेत्रीला दिलं सरप्राईज
17
Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर
18
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
19
मालकासाठी आयुष्य झिजवलं, पण त्याने मुलाच्या लग्नाला बोलावलं नाही; ६० वर्षीय वृद्धाची पोलीस ठाण्यात धाव
20
"पाळी आली असेल तर पुरावा दाखव", उशीर झाल्याने लेक्चरर्सचे टोमणे; धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

होळीनंतर जिल्ह्याला पाणी दिलासा; पाणीकपात रद्द? महिन्यातून दोनवेळा केली जाते कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:11 IST

कपातीच्या नावाखाली महापालिका व पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून पाइपलाइनची विविध कामे व दुरुस्ती हाती घेतली जात आहेत.

सुरेश लाेखंडे ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका असलेल्या शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ दिवसांतून एकदा, अशी २४ तासांची पाणीकपात लागू केलेली आहे; परंतु आता ती रद्द करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. होळीनंतर ती पूर्णपणे रद्द करून शहरांना त्यांचा आवश्यक तीन हजार ६२१ एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्यामुळे गृहिणींची पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

पाणीकपात रद्द करण्याच्या दृष्टीने गुरुवारी बैठक निश्चित केली होती; पण काही अपरिहार्य कारणास्तव ती रद्द झाली; परंतु पुढील आठवड्यापासून म्हणजे होळीनंतर या पाणी कपातीच्या समस्येला आता पूर्णविराम मिळून ती कायमची रद्द करण्याचा निर्णय होऊ घातला आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिन्यातून दोन वेळा २४ तासांची पाणी कपात लागू केली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे; पण त्याहीपेक्षा महापालिका, नगरपालिका आणि पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांकडून या कपातीच्या कालावधीला धरून दुरुस्तीची कामे काढल्यामुळे पाणी समस्या जिल्ह्यात गंभीर झाली आहे.

कपातीच्या नावाखाली महापालिका व पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून पाइपलाइनची विविध कामे व दुरुस्ती हाती घेतली जात आहेत. त्यामुळे कपातीचा कालावधी संपलेला असतानाही नागरिकांना तीव्र पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे; पण आता ही कपातही रद्द होणार असल्यामुळे संबंधित महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या मागणीस अनुसरून मुबलक पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे सुतोवाच पाटबंधारे विभागाने केले आहे. कारण आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आलेला आहे. 

२.८० कोटी लोकसंख्येला लागते ३६२१ एमएलडी पाणीजिल्ह्यातील भातसा या सर्वाधिक मोठ्या जलाशयासह बारवी धरण, उल्हास नदी, मोरबे, पिसे आदी धरणांतून बृहन्मुंबई महापालिकेसह जिल्ह्यातील ठाणे व उर्वरित पाच महापालिका, दोन नगर परिषदा, दोन नगरपंचायती, बहुतांश ग्रामपंचायती आदींमधील सुमारे दोन कोटी ८० लाख लोकसंख्येला रोज तीन हजार ६२१ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होतो. पण सध्या १५ दिवसांतून २४ तासांची पाणीकपात लागू केल्यामुळे या सुरळीत पाणीपुरवठ्यात खंड पडला होता. तो आता अखंडितपणे सुरू राहणार आहे.

मुंबई महापालिकेला भातसासह मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणातून पाणीपुरवठा होतो. याप्रमाणेच ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा, भातसा, शहाड टेमघर एमआयडीसी आणि पिसे धरणातून होत आहे. नवी मुंबईला ३३० एमएलडी पाणी मोरबे, हेटवणे आणि बारवी धरणातून सुरू आहे. कल्याण-डोंबिवली २६४, भिवंडी ११० व मीरा-भाईंदरला ९१ एमएलडी पाणीपुरवठा शहरांना टेमघर व एमआयडीसीद्वारे सुरू आहे. बदलापूरला ३७, अंबरनाथ ५५, उल्हासनगर १२० एमएलडी पाणीपुरवठा बारवी व उल्हास नदीतून एमआयडीसह महाराष्ट्र जीवन (एमजेपी) प्राधिकरणाकडून रोज होत आहे. शहरांच्या वाढीव लोकसंख्येस अनुसरून या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी बारवी धरणाची उंची दोन मीटरने वाढवली. एमआयडीला १६० एमएलडी पाणीपुरवठाही बारवीतून होत आहे.

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका