शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

नगरसेवकांमुळे निर्माण होते पाण्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:27 AM

अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरणारे अधिकारी नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम करत आहेत

अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिम भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ही जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरणारे अधिकारी नागरिकांना संभ्रमात टाकण्याचे काम करत आहेत. नगरसेवकांमुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप अधिकारी करत आहेत. अधिकाºयांच्या या विधानाला काँग्रेस नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. प्राधिकरण स्वत:चे अपयश लपवत नगरसेवकांना लक्ष्य करत असल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. तसेच नगरसेवकांवर खोटे आरोप करणाºया अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकारी अभियंंत्यांकडे केली आहे.मागील १५ दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात जीवन प्राधिकरणाला अपयश येत आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या पध्दतीने व्हॉल आॅपरेटिंग केले जात असल्याने अनेक भागांना पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक भागांना गरज नसतानाही २० ते २२ तास पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका जावसई गाव, फुलेनगर, कमलाकर नगर, कोहोजगाव, वांद्रापाडा, डीएमसी चाळ, नालंदानगर या भागांना होत आहे. जासवई परिसराला पाणीपुरवठा होत नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना उत्तर देताना अधिकाºयांनी स्वत:ची जबाबदारी ही नगरसेवकांवर ढकलली. नगरसेवकांमुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा आरोप अधिकाºयांनी करून या प्रकरणातून स्वत:ला बाजूला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या नगरसेवकांची नावे अधिकाºयांनी घेतली त्याच नगरसेवकांच्या प्रभागातही पाण्याचा प्रश्न आहे. असे असतानाही अधिकाºयांनी असे आरोप का केले याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक प्रदीप पाटील आणि उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात नागरिकांनी गोंधळ घातला. पाणी द्या नाहीतर खुर्ची खाली करा अशा घोषणा देत अधिकाºयांना धारेवर धरले.जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने ते आपली जबाबदारी दुसºयावर टाकत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. तसेच टँकर लॉबीला खूष करण्यासाठी आणि काही बांधकाम व्यावसायिकांना पाण्याची सोय करण्यासाठी काही भ्रष्ट अधिकारी नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला.