शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

उल्हासनगरात जलवाहिनीला गळती, लाखो लिटर पाणी नाल्यात 

By सदानंद नाईक | Updated: March 21, 2025 18:43 IST

शहरांत भुयारी गटार, रस्ते बांधणी, पाणी पुरावठा योजना यासह अन्य विकास कामे सुरु असून रस्ते खोदले जात असल्याने, जलवाहिन्या फुटल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

-सदानंद नाईक, उल्हासनगर उल्हासनगर शहरात एकीकडे पाणीटंचाई निर्माण झाली असताना, दुसरीकडे जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नेताजी गार्डन जवळ गेल्या चार दिवसांपासून जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी दुरस्ती अभावी वाहून जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उल्हासनगर महापालिका पाणी पुरवठा विभागातील अपुऱ्या कर्मचाऱ्या अभावी विकास कामावेळी फुटलेल्या जलवाहिन्या दुरस्ती केल्या जात नाहीत. या जलवाहिन्यातून लाखो लिटर पाणी खाली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 

जलवाहिनी कुठे फुटली आहे? 

कॅम्प नं-५, नेताजी गार्डन परिसरात जलवाहिनी फुटून गेल्या चार दिवसापासून लाखो लिटर पाणी नालीत जात आहे. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तर दुसरीकडे शहरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाली. 

सुभाषटेकडी येथील महिला व नागरिकांनी एकत्र येत महापालिकेचा निषेध करून मातीचे मडके फोडले. संतोषनगर, तानाजीनगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, स्थानिक नागरिकांनी महापालिकेला निवेदन देत आंदोलनाची भूमिका घेतली.

जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती, पाणीपुरवठा बंद

एमआयडीसीचे म्हारळ गाव शहाड गावाठाण येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरस्तीचे काम शुक्रवारी काढल्याने, दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. असे महापालिकेकडून सांगण्यात आले. 

शहरांत भुयारी गटार, रस्ते बांधणी, पाणी पुरावठा योजना यासह अन्य विकास कामे सुरु असून रस्ते खोदले जात असल्याने, जलवाहिन्या फुटल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तर महापालिकेकडे कर्मचारी वर्ग कमी असल्याने, फुटलेल्या जलवाहिन्या अनेक दिवस दुरस्ती केली जात नाही. फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी खाली जात असून अशी परीस्थिती संपूर्ण शहरांत निर्माण झाली आहे.

 दुरस्तीचे काम जलदगतीने

महापालिका पाणी पुरवठा विभागाकडे अपुरा कर्मचारी वर्ग असलातरी विविध माध्यमातून फुटलेल्या जलवाहिन्या दुरस्तीचे काम केले जाते, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी सांगितले. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरUlhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022water shortageपाणीकपात