शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आसनगावच्या नागरिकांना चार ते आठ दिवसांनी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:56 IST

संतापाची लाट : प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे उद्रेक होण्याची शक्यता

आसनगाव : आसनगाव ग्रामपंचायत क्षेत्रात भीषण पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दररोज होणारा पाणीपुरवठा आता चार ते आठ दिवसांनी होतो आहे. त्यामुळ आसनगावच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट आली आहे. विशेषत: महिलांमध्ये संताप असून याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव इंडस्ट्रिअल झोन असल्याने अनेक कंपन्या येथे आहेत. तसेच या परिसरात विकासकांकडून मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी केली जात आहेत. आसनगाव हे रेल्वेस्थानक मुंबईला लागून असल्याने येथे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी देण्यास आसनगावचे प्रशासन असमर्थ असल्याचे दिसते आहे.

आसनगाव शहरात सावरोली-आसनगाव, तासपाडा, आणि निर्मलनगर, कोंडेपाडा या तीन पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा केला जातो. यात सावरोली-आसनगाव ही १० इंच व्यासाची, सहा लाख ९० हजार क्षमतेची फिल्टर पाणीपुरवठा योजना असून यातून गावपट्टा (जुने गाव), संभाजीनगर, शिवांजलीनगर, गावदेवीनगर, कातकरीवाडी, तुळजाईनगर, दिघेनगर, ठक्कर कम्पाउंड, ग्रीन व्ह्यू पार्क बिल्डिंग, विहिरीचापाडा, सावंत पार्क, नरेन मोनिषा अपार्टमेंट, तुलसी विहार, पंचशीलनगर, उमवणेपाडा, दत्तगुरूनगर, सावरोली, पळसपाडा, शिवाजीनगर, मुंढेवाडी, साई मंदिर, आदर्शनगर येथे पाणीपुरवठा केला जातो. तासपाडा ही तीन इंच व्यासाची, ६० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून तासपाडा, शिऱ्याचापाडा आणि रोज गार्डन तर निर्मलनगर, कोंडेपाडा ही तीन इंच व्यासाची, ४० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून निर्मलनगर, गोकुळसृष्टी, संघवी पॅरेडाइज येथे चार ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनियमित पाणीपुरवठ्याने महिला संतप्त आहेत.

पाणीपुरवठा योजना २५ वर्षांपूर्वीचीउपलब्ध पाणीपुरवठा योजना या २०११ च्या जनगणनेनुसार १३ हजार १०४ लोकसंख्येसाठी ठीक होत्या, परंतु आताची लोकसंख्या ही ३० हजारांपेक्षा जास्त असल्याने, तसेच देखभाल दुरुस्ती वेळेवर न झाल्याने, २५ वर्षांपूर्वीची ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली आहे. इतरही पाणीपुरवठा योजना दहा वर्षे जुन्या झाल्याने सततची दुरु स्ती, मध्येच वीजपुरवठा कमीजास्त होणे, मोटारी जळणे, नदीतील पाण्याची पातळी कमी होणे आदी कारणांमुळे पाण्याची समस्या भेडसावते आहे.

ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी पाच कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर असून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठवली आहे. या मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू होईल. - जालिंदर तळपाडे (सरपंच ग्रामपंचायत आसनगाव)

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी २१ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन काही निर्णय सर्वानुमते घेण्यात आले असून समस्यामुक्त होण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. - बी.बी. पाटील, (ग्रामविकास अधिकारी)

टॅग्स :water shortageपाणीटंचाई