शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आसनगावच्या नागरिकांना चार ते आठ दिवसांनी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:56 IST

संतापाची लाट : प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे उद्रेक होण्याची शक्यता

आसनगाव : आसनगाव ग्रामपंचायत क्षेत्रात भीषण पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दररोज होणारा पाणीपुरवठा आता चार ते आठ दिवसांनी होतो आहे. त्यामुळ आसनगावच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट आली आहे. विशेषत: महिलांमध्ये संताप असून याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव इंडस्ट्रिअल झोन असल्याने अनेक कंपन्या येथे आहेत. तसेच या परिसरात विकासकांकडून मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी केली जात आहेत. आसनगाव हे रेल्वेस्थानक मुंबईला लागून असल्याने येथे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी देण्यास आसनगावचे प्रशासन असमर्थ असल्याचे दिसते आहे.

आसनगाव शहरात सावरोली-आसनगाव, तासपाडा, आणि निर्मलनगर, कोंडेपाडा या तीन पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा केला जातो. यात सावरोली-आसनगाव ही १० इंच व्यासाची, सहा लाख ९० हजार क्षमतेची फिल्टर पाणीपुरवठा योजना असून यातून गावपट्टा (जुने गाव), संभाजीनगर, शिवांजलीनगर, गावदेवीनगर, कातकरीवाडी, तुळजाईनगर, दिघेनगर, ठक्कर कम्पाउंड, ग्रीन व्ह्यू पार्क बिल्डिंग, विहिरीचापाडा, सावंत पार्क, नरेन मोनिषा अपार्टमेंट, तुलसी विहार, पंचशीलनगर, उमवणेपाडा, दत्तगुरूनगर, सावरोली, पळसपाडा, शिवाजीनगर, मुंढेवाडी, साई मंदिर, आदर्शनगर येथे पाणीपुरवठा केला जातो. तासपाडा ही तीन इंच व्यासाची, ६० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून तासपाडा, शिऱ्याचापाडा आणि रोज गार्डन तर निर्मलनगर, कोंडेपाडा ही तीन इंच व्यासाची, ४० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून निर्मलनगर, गोकुळसृष्टी, संघवी पॅरेडाइज येथे चार ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनियमित पाणीपुरवठ्याने महिला संतप्त आहेत.

पाणीपुरवठा योजना २५ वर्षांपूर्वीचीउपलब्ध पाणीपुरवठा योजना या २०११ च्या जनगणनेनुसार १३ हजार १०४ लोकसंख्येसाठी ठीक होत्या, परंतु आताची लोकसंख्या ही ३० हजारांपेक्षा जास्त असल्याने, तसेच देखभाल दुरुस्ती वेळेवर न झाल्याने, २५ वर्षांपूर्वीची ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली आहे. इतरही पाणीपुरवठा योजना दहा वर्षे जुन्या झाल्याने सततची दुरु स्ती, मध्येच वीजपुरवठा कमीजास्त होणे, मोटारी जळणे, नदीतील पाण्याची पातळी कमी होणे आदी कारणांमुळे पाण्याची समस्या भेडसावते आहे.

ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी पाच कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर असून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठवली आहे. या मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू होईल. - जालिंदर तळपाडे (सरपंच ग्रामपंचायत आसनगाव)

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी २१ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन काही निर्णय सर्वानुमते घेण्यात आले असून समस्यामुक्त होण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. - बी.बी. पाटील, (ग्रामविकास अधिकारी)

टॅग्स :water shortageपाणीटंचाई