शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आसनगावच्या नागरिकांना चार ते आठ दिवसांनी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:56 IST

संतापाची लाट : प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे उद्रेक होण्याची शक्यता

आसनगाव : आसनगाव ग्रामपंचायत क्षेत्रात भीषण पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दररोज होणारा पाणीपुरवठा आता चार ते आठ दिवसांनी होतो आहे. त्यामुळ आसनगावच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट आली आहे. विशेषत: महिलांमध्ये संताप असून याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव इंडस्ट्रिअल झोन असल्याने अनेक कंपन्या येथे आहेत. तसेच या परिसरात विकासकांकडून मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी केली जात आहेत. आसनगाव हे रेल्वेस्थानक मुंबईला लागून असल्याने येथे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी देण्यास आसनगावचे प्रशासन असमर्थ असल्याचे दिसते आहे.

आसनगाव शहरात सावरोली-आसनगाव, तासपाडा, आणि निर्मलनगर, कोंडेपाडा या तीन पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा केला जातो. यात सावरोली-आसनगाव ही १० इंच व्यासाची, सहा लाख ९० हजार क्षमतेची फिल्टर पाणीपुरवठा योजना असून यातून गावपट्टा (जुने गाव), संभाजीनगर, शिवांजलीनगर, गावदेवीनगर, कातकरीवाडी, तुळजाईनगर, दिघेनगर, ठक्कर कम्पाउंड, ग्रीन व्ह्यू पार्क बिल्डिंग, विहिरीचापाडा, सावंत पार्क, नरेन मोनिषा अपार्टमेंट, तुलसी विहार, पंचशीलनगर, उमवणेपाडा, दत्तगुरूनगर, सावरोली, पळसपाडा, शिवाजीनगर, मुंढेवाडी, साई मंदिर, आदर्शनगर येथे पाणीपुरवठा केला जातो. तासपाडा ही तीन इंच व्यासाची, ६० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून तासपाडा, शिऱ्याचापाडा आणि रोज गार्डन तर निर्मलनगर, कोंडेपाडा ही तीन इंच व्यासाची, ४० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून निर्मलनगर, गोकुळसृष्टी, संघवी पॅरेडाइज येथे चार ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनियमित पाणीपुरवठ्याने महिला संतप्त आहेत.

पाणीपुरवठा योजना २५ वर्षांपूर्वीचीउपलब्ध पाणीपुरवठा योजना या २०११ च्या जनगणनेनुसार १३ हजार १०४ लोकसंख्येसाठी ठीक होत्या, परंतु आताची लोकसंख्या ही ३० हजारांपेक्षा जास्त असल्याने, तसेच देखभाल दुरुस्ती वेळेवर न झाल्याने, २५ वर्षांपूर्वीची ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली आहे. इतरही पाणीपुरवठा योजना दहा वर्षे जुन्या झाल्याने सततची दुरु स्ती, मध्येच वीजपुरवठा कमीजास्त होणे, मोटारी जळणे, नदीतील पाण्याची पातळी कमी होणे आदी कारणांमुळे पाण्याची समस्या भेडसावते आहे.

ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी पाच कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर असून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठवली आहे. या मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू होईल. - जालिंदर तळपाडे (सरपंच ग्रामपंचायत आसनगाव)

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी २१ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन काही निर्णय सर्वानुमते घेण्यात आले असून समस्यामुक्त होण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. - बी.बी. पाटील, (ग्रामविकास अधिकारी)

टॅग्स :water shortageपाणीटंचाई