शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

पाचशे फूट दरीतून दापुऱ्यात आले पाणी; जलपरीची कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:51 IST

पालकमंत्र्यांची भेट, मराठी तरुणाने सोलर वॉटरपंपाद्वारे साधली किमया

श्याम धुमाळ कसारा : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पंधरवड्यात शहापूर तालुक्यातील दापूर या अतिदुर्गम अशा आदिवासीवाडीला भेट दिली होती. आदिवासी ग्रामस्थांच्या पाणी, वीज आणि रस्त्यांबाबतच्या समस्या समजल्यानंतर त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर, प्रशासन कामाला लागले आणि गुरु वारी सायंकाळी गावात तब्बल ५०० फूट खोल दरीतून जलपरीद्वारे पाणी गावात आले. त्यावेळी येथील आदिवासींच्या चेहºयावर हास्य पसरले होते.

शहापूर तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. दरवर्षी लागणाºया टँकरपेक्षा यंदा जास्त टँकरची गरज भेडसावत आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांमधील ग्रामस्थांना तानसा, भातसा, वैतरणा नद्यांतील पाणी डोळ्यांनी दिसते; पण ते खोल दरीत असल्याने हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना तब्बल दोन तासांची पायपीट करून दरीत उतरावे लागते.

दरम्यान, अरुण शिंदे या मराठी तरु णाने विदर्भातील नागपूर, भंडारा, नंदुरबार जिल्ह्यांत पाणीटंचाईविरोधात राबवलेल्या मोहिमेत सोलर वॉटरपंपाच्या माध्यमातून १०० ठिकाणी जलपरी योजना राबवून ग्रामस्थांना पाणी मिळवून दिले आहे. त्याच धर्तीवर शहापूर तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या दापूर या गावात प्रायोगिक तत्त्वावर या जलपरीचे काम शिंदे यांनी सुरू केले होते. नाशिक जिल्ह्यातील ब्ल्यू चिप पॉवर एनर्जी कंपनीत जर्मनी, तैवान या देशांतून सोलरसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री मागवली जाते. सोलरपंप, डीसीपंप, पवनचक्कीच्या माध्यमातून जलपरी बनवली जाते. दापूर गावाच्या मागील बाजूस असलेल्या वैतरणा नदीपात्रातून तब्बल ५०० फूट दरीतून या जलपरीद्वारे पाणी गावात आणले. याच पद्धतीने तालुक्यातील इतर डोंगराळ भागात पाण्यासाठी जलपरी योजना राबवण्याचा प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराधीन असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते.

आठ दिवसांत सौरदिव्यांनी दापूरसह सावरखेड लखलखणारदापूरमाळ, सावरखेड या गावांची पाणीसमस्या सोडवण्यात यश आले असून या गावांमध्ये आता लवकरच सौरऊर्जेवर चालणाºया दिव्यांची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. याशिवाय, टंचाईग्रस्त गावपाड्यांत पाच हजार लीटरच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले असून, सुमारे शंभरहून अधिक टाक्या वाटण्यात आल्या आहेत.

पालकमंत्र्यांनी आमच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढला. आमची पाण्याची समस्या त्यांच्या प्रयत्नांमुळे सुटल्यात जमा आहे.- विजय शिंगवा, ग्रामस्थ

प्रायोगिक तत्त्वावर जलपरीची योजना दापूर येथे राबवली आहे. ५०० फूट खोल दरीतून पाणी आणण्यात यश मिळाले आहे. आता गावात पाच हजार लीटरची टाकी बसवून, संपूर्ण गावात नळपाणीयोजना राबवणार आहे. या योजनेचा अंदाजे खर्च सहा ते सात लाख रुपये असून, तो स्वत: मी केला आहे. - अरुण शिंदे, जलपरी पाणीयोजना

टॅग्स :Waterपाणी