शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पाचशे फूट दरीतून दापुऱ्यात आले पाणी; जलपरीची कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:51 IST

पालकमंत्र्यांची भेट, मराठी तरुणाने सोलर वॉटरपंपाद्वारे साधली किमया

श्याम धुमाळ कसारा : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील पंधरवड्यात शहापूर तालुक्यातील दापूर या अतिदुर्गम अशा आदिवासीवाडीला भेट दिली होती. आदिवासी ग्रामस्थांच्या पाणी, वीज आणि रस्त्यांबाबतच्या समस्या समजल्यानंतर त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर, प्रशासन कामाला लागले आणि गुरु वारी सायंकाळी गावात तब्बल ५०० फूट खोल दरीतून जलपरीद्वारे पाणी गावात आले. त्यावेळी येथील आदिवासींच्या चेहºयावर हास्य पसरले होते.

शहापूर तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. दरवर्षी लागणाºया टँकरपेक्षा यंदा जास्त टँकरची गरज भेडसावत आहे. तालुक्यातील अनेक गावपाड्यांमधील ग्रामस्थांना तानसा, भातसा, वैतरणा नद्यांतील पाणी डोळ्यांनी दिसते; पण ते खोल दरीत असल्याने हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना तब्बल दोन तासांची पायपीट करून दरीत उतरावे लागते.

दरम्यान, अरुण शिंदे या मराठी तरु णाने विदर्भातील नागपूर, भंडारा, नंदुरबार जिल्ह्यांत पाणीटंचाईविरोधात राबवलेल्या मोहिमेत सोलर वॉटरपंपाच्या माध्यमातून १०० ठिकाणी जलपरी योजना राबवून ग्रामस्थांना पाणी मिळवून दिले आहे. त्याच धर्तीवर शहापूर तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या दापूर या गावात प्रायोगिक तत्त्वावर या जलपरीचे काम शिंदे यांनी सुरू केले होते. नाशिक जिल्ह्यातील ब्ल्यू चिप पॉवर एनर्जी कंपनीत जर्मनी, तैवान या देशांतून सोलरसाठी आवश्यक असलेली साधनसामग्री मागवली जाते. सोलरपंप, डीसीपंप, पवनचक्कीच्या माध्यमातून जलपरी बनवली जाते. दापूर गावाच्या मागील बाजूस असलेल्या वैतरणा नदीपात्रातून तब्बल ५०० फूट दरीतून या जलपरीद्वारे पाणी गावात आणले. याच पद्धतीने तालुक्यातील इतर डोंगराळ भागात पाण्यासाठी जलपरी योजना राबवण्याचा प्रस्ताव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराधीन असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते.

आठ दिवसांत सौरदिव्यांनी दापूरसह सावरखेड लखलखणारदापूरमाळ, सावरखेड या गावांची पाणीसमस्या सोडवण्यात यश आले असून या गावांमध्ये आता लवकरच सौरऊर्जेवर चालणाºया दिव्यांची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. याशिवाय, टंचाईग्रस्त गावपाड्यांत पाच हजार लीटरच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले असून, सुमारे शंभरहून अधिक टाक्या वाटण्यात आल्या आहेत.

पालकमंत्र्यांनी आमच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढला. आमची पाण्याची समस्या त्यांच्या प्रयत्नांमुळे सुटल्यात जमा आहे.- विजय शिंगवा, ग्रामस्थ

प्रायोगिक तत्त्वावर जलपरीची योजना दापूर येथे राबवली आहे. ५०० फूट खोल दरीतून पाणी आणण्यात यश मिळाले आहे. आता गावात पाच हजार लीटरची टाकी बसवून, संपूर्ण गावात नळपाणीयोजना राबवणार आहे. या योजनेचा अंदाजे खर्च सहा ते सात लाख रुपये असून, तो स्वत: मी केला आहे. - अरुण शिंदे, जलपरी पाणीयोजना

टॅग्स :Waterपाणी