शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

कोरोनापेक्षा आमच्या गावात पाणीटंचाईचे संकट मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:10 IST

दूधगाववासीयांचा घोटभर पाण्यासाठी आटापिटा

- रवींद्र साळवेमोखाडा :  राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र जिल्ह्यातील काही गावे तहानेने व्याकूळ झालेली असून त्यांना कोरोनापेक्षा पाणीटंचाईचे संकट मोठे वाटत आहे. घोटभर पाण्यासाठी अनेक गावांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तालुक्याच्या मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर वसलेल्या गोमघर ग्रामपंचायतमधील सुमारे १०० कुटुंबांच्या लोकवस्तीचे दुधगाव मार्चच्या सुरुवातीपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे.दुधगावमधील पाणीटंचाईची समस्या आता उग्र बनली असून महिनाभरापूर्वीच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, परंतु अद्यापही टँकर उपलब्ध करून दिले नसल्याने स्थानिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री महिला-पुरुष लहानग्यांना विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. प्रशासनाने वेळेत टँकरने पाणी पुरवले नाही तर आमच्याकडे कोरोनाने नव्हे तर पाणीटंचाईचे बळी जातील. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल येथील युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.या परिसरातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावापासून १ ते २ कि.मी. डोंगर उतारावर एकमेव असलेल्या विहिरीतील पाणी फेब्रुवारीच्या अखेर संपुष्टात येते. तेव्हापासून येथील आदिवासीना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान, टँकरबाबत मोखाडा तालुक्याचे तहसीलदार वैभव पवार यांना विचारले असता याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.बंधाऱ्यांमध्ये पाणीच नाही येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून तीन बंधारे बांधले आहेत, परंतु त्यामध्ये थेंबभरही पाणी नसल्याने काहीच फायदा झालेला नाही.सर्वत्र कोरोनाचे मोठं संकट निर्माण झाले असताना आमच्याकडे मात्र त्यापेक्षाही मोठं संकट पाणीटंचाईचे आहे. आमच्या महिला रात्रीच्या वेळेत लहान मुलांना घेऊन विहिरीवर पाणी भरण्यासाठी जातात. यावेळी एखादी दुर्घटना उद्भवल्या त्याला जबाबदारी कोण?- सोमा वारे, स्थानिक आदिवासी युवा कार्यकर्ता

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई