शहरं
Join us  
Trending Stories
1
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
2
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
3
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
4
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
5
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
6
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
7
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
8
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
9
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
10
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
11
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
12
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
13
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
14
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
15
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
16
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
17
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
18
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
19
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
20
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!

कोरोनापेक्षा आमच्या गावात पाणीटंचाईचे संकट मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:10 IST

दूधगाववासीयांचा घोटभर पाण्यासाठी आटापिटा

- रवींद्र साळवेमोखाडा :  राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र जिल्ह्यातील काही गावे तहानेने व्याकूळ झालेली असून त्यांना कोरोनापेक्षा पाणीटंचाईचे संकट मोठे वाटत आहे. घोटभर पाण्यासाठी अनेक गावांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तालुक्याच्या मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर वसलेल्या गोमघर ग्रामपंचायतमधील सुमारे १०० कुटुंबांच्या लोकवस्तीचे दुधगाव मार्चच्या सुरुवातीपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे.दुधगावमधील पाणीटंचाईची समस्या आता उग्र बनली असून महिनाभरापूर्वीच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, परंतु अद्यापही टँकर उपलब्ध करून दिले नसल्याने स्थानिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री महिला-पुरुष लहानग्यांना विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. प्रशासनाने वेळेत टँकरने पाणी पुरवले नाही तर आमच्याकडे कोरोनाने नव्हे तर पाणीटंचाईचे बळी जातील. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल येथील युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.या परिसरातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावापासून १ ते २ कि.मी. डोंगर उतारावर एकमेव असलेल्या विहिरीतील पाणी फेब्रुवारीच्या अखेर संपुष्टात येते. तेव्हापासून येथील आदिवासीना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान, टँकरबाबत मोखाडा तालुक्याचे तहसीलदार वैभव पवार यांना विचारले असता याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.बंधाऱ्यांमध्ये पाणीच नाही येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून तीन बंधारे बांधले आहेत, परंतु त्यामध्ये थेंबभरही पाणी नसल्याने काहीच फायदा झालेला नाही.सर्वत्र कोरोनाचे मोठं संकट निर्माण झाले असताना आमच्याकडे मात्र त्यापेक्षाही मोठं संकट पाणीटंचाईचे आहे. आमच्या महिला रात्रीच्या वेळेत लहान मुलांना घेऊन विहिरीवर पाणी भरण्यासाठी जातात. यावेळी एखादी दुर्घटना उद्भवल्या त्याला जबाबदारी कोण?- सोमा वारे, स्थानिक आदिवासी युवा कार्यकर्ता

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई