शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर संकट? संपूर्ण शहरात पाणी कपातीची शक्यता; मुंबईत लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 20:05 IST

कोपरी, हाजुरी, गावदेवी, किसनगर आदी भागांना बसणार फटका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मुंबई महापालिकेने आता १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे सुचीत केले आहे. त्याचा फटका आता ठाणे शहराला देखील बसणार आहे. ठाण्यातही आता ही कपात लागू करण्यात आली आहे. परंतु येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही तर मात्र ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून देखील संपूर्ण शहरासाठी पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापालिकेतील सुत्रंनी दिली.

            मुंबई महापालिकेकडून ठाण्याला ६५ दशलक्ष पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणी पुरवठा शहरातील कोपरी, हाजुरी, गावदेवी, किसनगर आदी भागांना होत आहे. परंतु आता मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा फटका या भागांना निश्चितच बसणार आहे. आधीच कोपरीकरांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. पाणी मिळत नाही म्हणून या भागातून अनेकवेळा आंदोलन देखील झालेली आहेत. त्यात आता पुन्हा वाढीव कपातीचा फटका या भागांना बसणार असल्याने नागरीक मेटाकुटीला येणार आहेत.

        दरम्यान जून महिना संपत आला तरी देखील अद्यापही पाऊस म्हणावा तितका बरसला नाही. त्यात भातसा धरणात ४० टक्के तर बारवी धरणात देखील ३५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. दुसरीकडे हवामान खात्याने देखील जुलै महिन्यात पाऊस कमीच पडणार असल्याचा अंदाज वर्तविला असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस होईल असा अंदाजही वर्तविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पाऊस झाला नाही तर मात्र त्याचे विपरित परिणाम पाणी पुरवठय़ावर होणार असल्याचे दिसत आहे. सध्या मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली असली तरी देखील आता ठाणो महापालिका देखील एक आठवडा पावसाची वाट बघणार आहे. किंबहुना इतर प्राधिकरण देखील याच पावसावर अवलंबून आहेत. एक आठवडय़ात पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली आहे. त्यानुसार ही पाणी कपात कदाचित जुलैच्या आठवडय़ापासूनच लागू होईल असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार तसे झाल्यास संपूर्ण ठाणे शहरात रोजच्या रोज पाणी कपात केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

 *पाणी संकट घोंगावत असतांना ठाणो महापालिकेने पाण्याचे नियोजन आखण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार शहरातील विहीरी आणि कुपनलिकांमधील पाण्याचा वापर हा इतर कामांसाठी कसा होऊ शकतो याची चाचपणी पालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार याचे नियोजन आखण्यात आले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणे