शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर संकट? संपूर्ण शहरात पाणी कपातीची शक्यता; मुंबईत लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 20:05 IST

कोपरी, हाजुरी, गावदेवी, किसनगर आदी भागांना बसणार फटका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मुंबई महापालिकेने आता १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे सुचीत केले आहे. त्याचा फटका आता ठाणे शहराला देखील बसणार आहे. ठाण्यातही आता ही कपात लागू करण्यात आली आहे. परंतु येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही तर मात्र ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून देखील संपूर्ण शहरासाठी पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापालिकेतील सुत्रंनी दिली.

            मुंबई महापालिकेकडून ठाण्याला ६५ दशलक्ष पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणी पुरवठा शहरातील कोपरी, हाजुरी, गावदेवी, किसनगर आदी भागांना होत आहे. परंतु आता मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा फटका या भागांना निश्चितच बसणार आहे. आधीच कोपरीकरांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. पाणी मिळत नाही म्हणून या भागातून अनेकवेळा आंदोलन देखील झालेली आहेत. त्यात आता पुन्हा वाढीव कपातीचा फटका या भागांना बसणार असल्याने नागरीक मेटाकुटीला येणार आहेत.

        दरम्यान जून महिना संपत आला तरी देखील अद्यापही पाऊस म्हणावा तितका बरसला नाही. त्यात भातसा धरणात ४० टक्के तर बारवी धरणात देखील ३५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. दुसरीकडे हवामान खात्याने देखील जुलै महिन्यात पाऊस कमीच पडणार असल्याचा अंदाज वर्तविला असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस होईल असा अंदाजही वर्तविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पाऊस झाला नाही तर मात्र त्याचे विपरित परिणाम पाणी पुरवठय़ावर होणार असल्याचे दिसत आहे. सध्या मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली असली तरी देखील आता ठाणो महापालिका देखील एक आठवडा पावसाची वाट बघणार आहे. किंबहुना इतर प्राधिकरण देखील याच पावसावर अवलंबून आहेत. एक आठवडय़ात पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली आहे. त्यानुसार ही पाणी कपात कदाचित जुलैच्या आठवडय़ापासूनच लागू होईल असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार तसे झाल्यास संपूर्ण ठाणे शहरात रोजच्या रोज पाणी कपात केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

 *पाणी संकट घोंगावत असतांना ठाणो महापालिकेने पाण्याचे नियोजन आखण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार शहरातील विहीरी आणि कुपनलिकांमधील पाण्याचा वापर हा इतर कामांसाठी कसा होऊ शकतो याची चाचपणी पालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार याचे नियोजन आखण्यात आले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणे