शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर संकट? संपूर्ण शहरात पाणी कपातीची शक्यता; मुंबईत लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 20:05 IST

कोपरी, हाजुरी, गावदेवी, किसनगर आदी भागांना बसणार फटका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मुंबई महापालिकेने आता १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे सुचीत केले आहे. त्याचा फटका आता ठाणे शहराला देखील बसणार आहे. ठाण्यातही आता ही कपात लागू करण्यात आली आहे. परंतु येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही तर मात्र ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून देखील संपूर्ण शहरासाठी पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापालिकेतील सुत्रंनी दिली.

            मुंबई महापालिकेकडून ठाण्याला ६५ दशलक्ष पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणी पुरवठा शहरातील कोपरी, हाजुरी, गावदेवी, किसनगर आदी भागांना होत आहे. परंतु आता मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा फटका या भागांना निश्चितच बसणार आहे. आधीच कोपरीकरांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. पाणी मिळत नाही म्हणून या भागातून अनेकवेळा आंदोलन देखील झालेली आहेत. त्यात आता पुन्हा वाढीव कपातीचा फटका या भागांना बसणार असल्याने नागरीक मेटाकुटीला येणार आहेत.

        दरम्यान जून महिना संपत आला तरी देखील अद्यापही पाऊस म्हणावा तितका बरसला नाही. त्यात भातसा धरणात ४० टक्के तर बारवी धरणात देखील ३५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. दुसरीकडे हवामान खात्याने देखील जुलै महिन्यात पाऊस कमीच पडणार असल्याचा अंदाज वर्तविला असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस होईल असा अंदाजही वर्तविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पाऊस झाला नाही तर मात्र त्याचे विपरित परिणाम पाणी पुरवठय़ावर होणार असल्याचे दिसत आहे. सध्या मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली असली तरी देखील आता ठाणो महापालिका देखील एक आठवडा पावसाची वाट बघणार आहे. किंबहुना इतर प्राधिकरण देखील याच पावसावर अवलंबून आहेत. एक आठवडय़ात पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली आहे. त्यानुसार ही पाणी कपात कदाचित जुलैच्या आठवडय़ापासूनच लागू होईल असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार तसे झाल्यास संपूर्ण ठाणे शहरात रोजच्या रोज पाणी कपात केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

 *पाणी संकट घोंगावत असतांना ठाणो महापालिकेने पाण्याचे नियोजन आखण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार शहरातील विहीरी आणि कुपनलिकांमधील पाण्याचा वापर हा इतर कामांसाठी कसा होऊ शकतो याची चाचपणी पालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार याचे नियोजन आखण्यात आले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातthaneठाणे