शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

जिल्ह्यातील वाढीव पाणीकपातीचे संकट टळले; कपातही कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 00:25 IST

धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे. यासाठी ३० तास पाणीपुरवठा सक्तीने बंद ठेवला जातो. २२ ऑक्टोबरपासून या सक्तीच्या कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या पाणीकपातीत उन्हाळ्यात वाढ होण्याऐवजी ती कमी करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.उन्हाळ्यात नागरिकांना वाढीव पाणीकपातीला सामोरे जावे लागणार असल्याची जिल्ह्यात चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात या वाढीव कपातीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली दीड दिवसाची २२ टक्के पाणीकपात या महिनाअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी करण्याचे संकेत मिळाले आहेत; मात्र २० मार्च रोजी असलेल्या होळीला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानंतर, पाणीसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका, नगरपालिकांमधील जीवघेणी पाणीकपात कमी किंवा रद्द होण्याचे संकेत आहेत.महापालिका, नगरपालिकांना नियमानुसार सुमारे एक हजार १९२ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; मात्र या मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज सुमारे एक हजार ५२१ एमएलडी पाणी उचलले जात आहे. सुमारे ३२९ एमएलडी जादा पाण्याची चोरी होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. यामुळे आॅक्टोबरपासून नागरिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. सक्तीची पाणीकपात व पाणीचोरी बंद करण्यासाठी सक्तीच्या उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. त्यामुळे मंजूर पाणीकोट्यातून आठवडाभर सुमारे २६२.२४ एमएलडी पाण्याची बचत झाली. याशिवाय, रोज होणारी ३०० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची चोरी थांबली. त्यामुळे सद्य:स्थितीला बारवीसह आंध्रा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याची नोंद लघुपाटबंधारे विभागाने घेतली आहे.मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज मनमानी पाणी उचलल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक महिना आधीच जादा पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मंजूर पाणीकोट्यापेक्षा एमआयडीसीच्या सुमारे २०० एमएलडी व कल्याण-डोेंबिवली महापालिका (केडीएमसी)सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलण्यास आळा घालण्यात आला आहे.>जादा पाणी उचलण्यास आळाएमआयडीसी ५८३ एमएलडी या दैनंदिन मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी, तर केडीएमसी त्यांच्या २३४ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची नोंद करण्यात आली होती. या खालोखाल एमजेपी त्यांच्या ९० एमएलडीपेक्षा जास्त व टेमघरने २८५ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलले होते.>मुबलक पाणीपुरवठायंदा २२ टक्के पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. ती आता लवकरच कमी होणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भार्इंदर, भिवंडी महापालिका आदी ठिकाणी उन्हाळ्यात मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी