शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जिल्ह्यातील वाढीव पाणीकपातीचे संकट टळले; कपातही कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 00:25 IST

धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे. यासाठी ३० तास पाणीपुरवठा सक्तीने बंद ठेवला जातो. २२ ऑक्टोबरपासून या सक्तीच्या कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या पाणीकपातीत उन्हाळ्यात वाढ होण्याऐवजी ती कमी करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.उन्हाळ्यात नागरिकांना वाढीव पाणीकपातीला सामोरे जावे लागणार असल्याची जिल्ह्यात चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात या वाढीव कपातीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली दीड दिवसाची २२ टक्के पाणीकपात या महिनाअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी करण्याचे संकेत मिळाले आहेत; मात्र २० मार्च रोजी असलेल्या होळीला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानंतर, पाणीसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका, नगरपालिकांमधील जीवघेणी पाणीकपात कमी किंवा रद्द होण्याचे संकेत आहेत.महापालिका, नगरपालिकांना नियमानुसार सुमारे एक हजार १९२ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; मात्र या मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज सुमारे एक हजार ५२१ एमएलडी पाणी उचलले जात आहे. सुमारे ३२९ एमएलडी जादा पाण्याची चोरी होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. यामुळे आॅक्टोबरपासून नागरिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. सक्तीची पाणीकपात व पाणीचोरी बंद करण्यासाठी सक्तीच्या उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. त्यामुळे मंजूर पाणीकोट्यातून आठवडाभर सुमारे २६२.२४ एमएलडी पाण्याची बचत झाली. याशिवाय, रोज होणारी ३०० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची चोरी थांबली. त्यामुळे सद्य:स्थितीला बारवीसह आंध्रा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याची नोंद लघुपाटबंधारे विभागाने घेतली आहे.मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज मनमानी पाणी उचलल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक महिना आधीच जादा पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मंजूर पाणीकोट्यापेक्षा एमआयडीसीच्या सुमारे २०० एमएलडी व कल्याण-डोेंबिवली महापालिका (केडीएमसी)सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलण्यास आळा घालण्यात आला आहे.>जादा पाणी उचलण्यास आळाएमआयडीसी ५८३ एमएलडी या दैनंदिन मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी, तर केडीएमसी त्यांच्या २३४ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची नोंद करण्यात आली होती. या खालोखाल एमजेपी त्यांच्या ९० एमएलडीपेक्षा जास्त व टेमघरने २८५ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलले होते.>मुबलक पाणीपुरवठायंदा २२ टक्के पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. ती आता लवकरच कमी होणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भार्इंदर, भिवंडी महापालिका आदी ठिकाणी उन्हाळ्यात मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी