शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

जिल्ह्यातील वाढीव पाणीकपातीचे संकट टळले; कपातही कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 00:25 IST

धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे. यासाठी ३० तास पाणीपुरवठा सक्तीने बंद ठेवला जातो. २२ ऑक्टोबरपासून या सक्तीच्या कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या पाणीकपातीत उन्हाळ्यात वाढ होण्याऐवजी ती कमी करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.उन्हाळ्यात नागरिकांना वाढीव पाणीकपातीला सामोरे जावे लागणार असल्याची जिल्ह्यात चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात या वाढीव कपातीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली दीड दिवसाची २२ टक्के पाणीकपात या महिनाअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी करण्याचे संकेत मिळाले आहेत; मात्र २० मार्च रोजी असलेल्या होळीला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानंतर, पाणीसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका, नगरपालिकांमधील जीवघेणी पाणीकपात कमी किंवा रद्द होण्याचे संकेत आहेत.महापालिका, नगरपालिकांना नियमानुसार सुमारे एक हजार १९२ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; मात्र या मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज सुमारे एक हजार ५२१ एमएलडी पाणी उचलले जात आहे. सुमारे ३२९ एमएलडी जादा पाण्याची चोरी होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. यामुळे आॅक्टोबरपासून नागरिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. सक्तीची पाणीकपात व पाणीचोरी बंद करण्यासाठी सक्तीच्या उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. त्यामुळे मंजूर पाणीकोट्यातून आठवडाभर सुमारे २६२.२४ एमएलडी पाण्याची बचत झाली. याशिवाय, रोज होणारी ३०० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची चोरी थांबली. त्यामुळे सद्य:स्थितीला बारवीसह आंध्रा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याची नोंद लघुपाटबंधारे विभागाने घेतली आहे.मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज मनमानी पाणी उचलल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक महिना आधीच जादा पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मंजूर पाणीकोट्यापेक्षा एमआयडीसीच्या सुमारे २०० एमएलडी व कल्याण-डोेंबिवली महापालिका (केडीएमसी)सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलण्यास आळा घालण्यात आला आहे.>जादा पाणी उचलण्यास आळाएमआयडीसी ५८३ एमएलडी या दैनंदिन मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी, तर केडीएमसी त्यांच्या २३४ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची नोंद करण्यात आली होती. या खालोखाल एमजेपी त्यांच्या ९० एमएलडीपेक्षा जास्त व टेमघरने २८५ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलले होते.>मुबलक पाणीपुरवठायंदा २२ टक्के पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. ती आता लवकरच कमी होणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भार्इंदर, भिवंडी महापालिका आदी ठिकाणी उन्हाळ्यात मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी