शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

पाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना म्हणजे प्रथमोपचार : निवृत्त लेफ़्टनंट कर्नल सुरेश पाटील यांचे मत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 4:53 PM

सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंधराव्या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्पनिवृत्त लेफ़्टनंट कर्नल सुरेश पाटील यांनी गुंफले.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना हा कायमस्वरूपी उपाय नसून प्रथमोपचार आहे - सुरेश पाटीलछत्रपती शिवरायांनी केलेला जिहाद या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेसुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित  पंधराव्या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प 

ठाणे : महाराष्ट्रातील पाचशे धरणे साफ करवून त्यातील गाळ काढून शेतात टाकला तर हे काळे सोने शेतकऱ्याचे उपन्न दुप्पट तिप्पट इतके वाढवू शकते. तसेच सगळ्या धरणांमधील गाळ निघाल्याने पाणी साठा आपोआप वाहून दुष्काळावर मात करणे सोपे होईल. पाण्यासाठी केला जाणारा जलयुक्त शिवार योजना हा कायमस्वरूपी उपाय नसून प्रथमोपचार आहे असे मत निवृत्त लेफ़्टनंट कर्नल व ग्रीन थम संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.  सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित  पंधराव्या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प निवृत्त लष्करी सैनिकांचे सामाजिक योगदान व १९७१ साली लढाईचे अनुभव या विषयावरील व्याख्यानाने  श्री सिद्धिविनायक मंदिराचे पटांगण येथे गुंफण्यात आले.

यावेळी सुरेश पाटील यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेला जिहाद या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाण्यासाठी भांडणे होतच आहेत. तशीच भांडणे राज्याराज्यात आणि गावागावांमध्ये देखील होत आहे. तरीही  गेल्या अडुसष्ठ वर्षात राज्यातील जुन्या धरणातील गाळ काढण्याच्या कामाला कोणीही हात घातलेला नाही. महात्मा फुले यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी जेव्हा खडकवासला हे धारण बांधले तेव्हा त्याची क्षमता ही ४ टीएमसी होती. इतक्या वर्षात यातील गाळ न काढल्याने आत्ता या धरणाची पाणी क्षमता ही फक्त पावणेदोन टीएमसी इतकीच उरली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये पाणीसमस्या निर्माण होत आहे. निवृत्त झाल्यावर आमच्या ग्रीन थम या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पंधरा लाख ट्रक गाळ काढण्यात आला असून यामुळे धरणामध्ये शून्य पूर्णांक वीस टीएमसी पाणी क्षमता वाढली आहे. काढलेला हा गाळ म्हणजेच काळे सोने शेतीला खत म्हणून घातल्यास शेतीचे उत्पन्न तर वाढेलच पण युरियाची शेतकऱ्याला द्याव्या लागणाऱ्या सरकारी सबसिडीचे कोट्यवधी रुपये वाचतील. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणे गरजेचे असून त्यासाठी सरकारचे आर्थिक पाठबळदेखील गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. युद्धातील आठवणीविषयी बोलताना ते म्हणाले युद्ध करणे सोपे असते. युद्ध होऊ न देण्यासाठी खूप सय्यम लागतो. हल्ली सर्जिकल स्ट्राईक वर बोलले जात आहे मात्र सीमेवर असताना आम्हाला नेहमीच सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो मात्र त्याच्या बातम्या केल्या जात नाहीत. आपल्याला कितीही वाटत असले तरी सध्याच्या परिस्थितीत आपण चीनचे काहीही बिघडवू शकत नाही. आठ दिवसाचे झालेले युद्ध आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीला झेपणारे नाही. अलीकडे अनेक नेते सरळ बोलून मोकळे होतात पाकिस्तानको उडा देंगे. मात्र तुम्हाला बोलायला काय जाते. तुम्ही वर बसलेले असता. आमची जावन पोरे उडणार आहेत त्यामध्ये याचा विचार केला जात नाही. ह्या सैनिकांच्या जाण्याने त्यांच्या आया आणि विधवांवर झोपडपट्ट्यामध्ये राहण्याची वेळ येते, याचा विचार कोणीही करत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकDamधरण