शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कसाऱ्यात आठवड्यातून एकदाच येते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 02:28 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या पाणीयोजनेतून आठवड्यातील एकच दिवस ग्रामस्थांसाठी पाणी मिळत आहे.

शहापूर : आगामी १० वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवत, सुमारे ३६ हजार लोकसंख्येला पाणी पुरेल, असा विचार करून कसारावासीयांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होईल, या अपेक्षेने सुरू करण्यात आलेल्या पाणीयोजनेचे लवकरच तीनतेरा वाजणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या पाणीयोजनेतून आठवड्यातील एकच दिवस ग्रामस्थांसाठी पाणी मिळत आहे.यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे अभियंता वसंत आल्हाट यांना विचारले असता, ते म्हणाले की, ही योजना पूर्ण होऊन नियोजनासाठी मोखावणे ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आली आहे. पाण्याची उपलब्धता पाहूनच ग्रामपंचायतीकडून पाण्याचे वाटप केले जाते. त्यामुळे धरणात जितका पाण्याचा साठा असेल, त्यानुसार नियोजन करावे लागते.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या योजनेत कसाºयातील धरणाची उंची वाढवण्यासह जलशुद्धीकरण केंद्र, पाच लाख १० हजार ली. क्षमतेचा भूस्तर जलकुंभ आणि चार लाख २१ हजार लीटर क्षमतेची उंच टाकी, पाण्याची पंपिंग मशिनरी, ऊर्ध्ववाहिनी, वितरणव्यवस्था आदींचा समावेश आहे. २०१८ मध्ये ही योजना सुरू होणार होती. परंतु, ढिसाळ कारभारामुळे योजना सुरू होण्यास २०१९ साल उजाडावे लागले. अखेर, १६ मार्च २०१९ रोजी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू झाली. मात्र, आठवड्यातून एकच दिवस येथील ग्रामस्थांना या योजनेचे पाणी मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आठवडाभराचा पाणीसाठा एकदाच करून ठेवतात.गेल्या वर्षीचे पावसाचे कमी असलेले प्रमाण, कसाºयाची भौगोलिक रचना समतल नसणे, नागमोडी पाइपलाइन असल्याने पुरेसे पाणी सोडता येत नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.आज मुंबई असे किंवा अन्य शहरांत काही ठिकाणी मुबलक पाणी तर काही भागात जेमतेम पुरवठा होत आहे. शहरी भागाला अद्याप टंचाईचे चटके जाणवत नसले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज परिस्थिती गंभीर होत चालली आहे.सरकार, संबंधित यंत्रणांनी वेळेतच पावले उचालायली हवीत. दरवर्षी टंचाई जाणवत हे माहित असूनही कार्यवाही का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आराखडे केवळ केले जातात, मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई