शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

कसाऱ्यात आठवड्यातून एकदाच येते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 02:28 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या पाणीयोजनेतून आठवड्यातील एकच दिवस ग्रामस्थांसाठी पाणी मिळत आहे.

शहापूर : आगामी १० वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवत, सुमारे ३६ हजार लोकसंख्येला पाणी पुरेल, असा विचार करून कसारावासीयांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होईल, या अपेक्षेने सुरू करण्यात आलेल्या पाणीयोजनेचे लवकरच तीनतेरा वाजणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या पाणीयोजनेतून आठवड्यातील एकच दिवस ग्रामस्थांसाठी पाणी मिळत आहे.यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे अभियंता वसंत आल्हाट यांना विचारले असता, ते म्हणाले की, ही योजना पूर्ण होऊन नियोजनासाठी मोखावणे ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आली आहे. पाण्याची उपलब्धता पाहूनच ग्रामपंचायतीकडून पाण्याचे वाटप केले जाते. त्यामुळे धरणात जितका पाण्याचा साठा असेल, त्यानुसार नियोजन करावे लागते.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या योजनेत कसाºयातील धरणाची उंची वाढवण्यासह जलशुद्धीकरण केंद्र, पाच लाख १० हजार ली. क्षमतेचा भूस्तर जलकुंभ आणि चार लाख २१ हजार लीटर क्षमतेची उंच टाकी, पाण्याची पंपिंग मशिनरी, ऊर्ध्ववाहिनी, वितरणव्यवस्था आदींचा समावेश आहे. २०१८ मध्ये ही योजना सुरू होणार होती. परंतु, ढिसाळ कारभारामुळे योजना सुरू होण्यास २०१९ साल उजाडावे लागले. अखेर, १६ मार्च २०१९ रोजी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू झाली. मात्र, आठवड्यातून एकच दिवस येथील ग्रामस्थांना या योजनेचे पाणी मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आठवडाभराचा पाणीसाठा एकदाच करून ठेवतात.गेल्या वर्षीचे पावसाचे कमी असलेले प्रमाण, कसाºयाची भौगोलिक रचना समतल नसणे, नागमोडी पाइपलाइन असल्याने पुरेसे पाणी सोडता येत नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.आज मुंबई असे किंवा अन्य शहरांत काही ठिकाणी मुबलक पाणी तर काही भागात जेमतेम पुरवठा होत आहे. शहरी भागाला अद्याप टंचाईचे चटके जाणवत नसले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज परिस्थिती गंभीर होत चालली आहे.सरकार, संबंधित यंत्रणांनी वेळेतच पावले उचालायली हवीत. दरवर्षी टंचाई जाणवत हे माहित असूनही कार्यवाही का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आराखडे केवळ केले जातात, मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई